शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

पांढरे सोने झाले काळे; वेचणीच्या काळातच लाल्याचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:57 IST

धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे .

ठळक मुद्देकापसाला बाजारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. त्यापाठोपाठ तूर आणि सोयाबीनची पेरणी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात कपाशीचे पीक उत्तम अवस्थेत असताना, परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे .पहिल्या वेचणीनंतर साधारणपणे दुसऱ्या वेचणीत उत्पादन वाढत असल्याचे गणित असताना, यंदा दुसऱ्या वेचणीतच शेतातील कापूस संपला. साधारणपणे एकरी पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या वेचणीच्या दोन किंटलवर समाधान मानावे लागले. सुरुवातीला कापसाचे पीक समाधानकारक मानले जात होते. यानंतर तालुक्यातील चार मंडळांपैकी धारणी व हरिसाल या दोन कृषी मंडळांमध्ये लाल्याने कहर केला. केवळ सावलीखेडा आणि धूळघाट रोड या मंडळात कापसाचे उत्पादन समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.धारणी तालुक्यात कापूस खरेदी केंद्र पाच-सात वर्षांपासून बंद आहे. खासगी बाजारात शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यंदा कापसाला पाच ते साडेपाच हजार रुपयांपपर्यंत दर आहे. कर्जाची परतफेड आवश्यक असल्याने कापूस व्यापाऱ्यांच्या कह्यात जात असून, काही निवडक मोठ्या शेतकऱ्यांनीच गंजी करून ठेवला आहे.

कापसाला बाजारच नाहीधारणीत कापसाची बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना स्थानिक खासगी व्यापाऱ्यांनाच विकावा लागतो. काही शेतकरी अकोट, मध्य प्रदेशातील देडतलाई, तुकईथड, बºहाणपूर, खंडवा येथे कापूस विकतात. सध्या धारणी शहरात ५२०० रुपये, तर मध्यप्रदेशात ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.मेळघाटातील वातावरण दमट व थंड असल्याने काही भागांमध्ये कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. पावसाचे कमी प्रमाणदेखील कारणीभूत आहे.- अरुण बेठेकरतालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस