शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याला पहिल्यांदा झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे संकट उद्भवले आहे. याशिवाय बोंड फुटत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही शेतकरी कपाशी काढून हरभरा, गव्हाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. एकूणच कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादनात कमी येत असल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा कापसाच्या उत्पादनात कमी आलेली असतानाच दरात मात्र, झळाळी आलेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. रुईची दरवाढ होत असल्याने यंदा कापूस दहा हजार पार करण्याची शक्यता आहे. दरवाढीच्या आशेमुळे शेतकरीदेखील कापसाची साठवणूक करीत असल्याचे दिसून येते.लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे संकट उद्भवले आहे. याशिवाय बोंड फुटत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही शेतकरी कपाशी काढून हरभरा, गव्हाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. एकूणच कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादनात कमी येत असल्याचे वास्तव आहे. दिवाळीपश्चात कपासाची भाववाढ सुरू झाली. आठ हजारांवर महिनाभर स्थिरावल्यानंतर आता भाव नऊ हजारांवर आलेले आहे. खासगीमध्ये दरवाढ होत असल्याने पणन महासंघाद्वारा यंदा खरेदी होणार नाही, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. कोरोना संसर्ग माघारल्यानंतर कापसाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कापूस पणन महामंडळ (सीसीआय) लादेखील यंदाच्या हंगामात खासगी बाजारात उतरून  कापूस खरेदी करण्याची गरज भासणार नाही, असेच एकूण चित्र आहे.

खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूटकाही शेतकरी गावातील व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करीत आहेत. यामध्ये भाव कमी व शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे दिसून येते. अनेकदा हे व्यापारी अडचणीच्या वेळी मदत करतात व त्याबदल्यात कापसाची खरेदी करतात. गावपातळीवर वजनमापातही हेराफेरी होते.

कापसाचे तालुकानिहाय क्षेत्रजिल्ह्यात यंदा २.२७ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,३०० हेक्टर, चिखलदरा २,३४७, अमरावती १३,६४०, भातकुली १०,९४३, नांदगाव खंडेश्वर ६,०७६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १६,६७८, मोर्शी १६,६७८, वरुड २७,८६४, दर्यापूर ३२,१२०, अंजनगाव सुर्जी १६,४२०, अचलपूर १७,८७१, चांदूरबाजार १७,२६६ व धामणगाव तालुक्यात २१,०८७ हेक्टर क्षेत्र आहे.

राज्यात कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी वाढल्याने कापसाचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांची होल्डिंग कॅपेसिटी वाढली आहे. आणखीन ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दरवाढ अपेक्षित आहे.- नीलेश लोहाणा, कॉटन ब्रोकर 

 

टॅग्स :cottonकापूस