शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पांढऱ्या सोन्याला पहिल्यांदा झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे संकट उद्भवले आहे. याशिवाय बोंड फुटत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही शेतकरी कपाशी काढून हरभरा, गव्हाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. एकूणच कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादनात कमी येत असल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा कापसाच्या उत्पादनात कमी आलेली असतानाच दरात मात्र, झळाळी आलेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. रुईची दरवाढ होत असल्याने यंदा कापूस दहा हजार पार करण्याची शक्यता आहे. दरवाढीच्या आशेमुळे शेतकरीदेखील कापसाची साठवणूक करीत असल्याचे दिसून येते.लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे संकट उद्भवले आहे. याशिवाय बोंड फुटत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही शेतकरी कपाशी काढून हरभरा, गव्हाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. एकूणच कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादनात कमी येत असल्याचे वास्तव आहे. दिवाळीपश्चात कपासाची भाववाढ सुरू झाली. आठ हजारांवर महिनाभर स्थिरावल्यानंतर आता भाव नऊ हजारांवर आलेले आहे. खासगीमध्ये दरवाढ होत असल्याने पणन महासंघाद्वारा यंदा खरेदी होणार नाही, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. कोरोना संसर्ग माघारल्यानंतर कापसाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कापूस पणन महामंडळ (सीसीआय) लादेखील यंदाच्या हंगामात खासगी बाजारात उतरून  कापूस खरेदी करण्याची गरज भासणार नाही, असेच एकूण चित्र आहे.

खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूटकाही शेतकरी गावातील व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करीत आहेत. यामध्ये भाव कमी व शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे दिसून येते. अनेकदा हे व्यापारी अडचणीच्या वेळी मदत करतात व त्याबदल्यात कापसाची खरेदी करतात. गावपातळीवर वजनमापातही हेराफेरी होते.

कापसाचे तालुकानिहाय क्षेत्रजिल्ह्यात यंदा २.२७ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,३०० हेक्टर, चिखलदरा २,३४७, अमरावती १३,६४०, भातकुली १०,९४३, नांदगाव खंडेश्वर ६,०७६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १६,६७८, मोर्शी १६,६७८, वरुड २७,८६४, दर्यापूर ३२,१२०, अंजनगाव सुर्जी १६,४२०, अचलपूर १७,८७१, चांदूरबाजार १७,२६६ व धामणगाव तालुक्यात २१,०८७ हेक्टर क्षेत्र आहे.

राज्यात कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी वाढल्याने कापसाचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांची होल्डिंग कॅपेसिटी वाढली आहे. आणखीन ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दरवाढ अपेक्षित आहे.- नीलेश लोहाणा, कॉटन ब्रोकर 

 

टॅग्स :cottonकापूस