शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट, मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:26 IST

प्रवाशांचा प्रतिसाद अल्प; ११५ बसेस पैकी ३७ फेऱ्याच मुक्कामी अमरावती : कोरोना संसर्गामुळे थांबलेली एसटी बसची चाके पुन्हा कोविड-१९ ...

प्रवाशांचा प्रतिसाद अल्प; ११५ बसेस पैकी ३७ फेऱ्याच मुक्कामी

अमरावती : कोरोना संसर्गामुळे थांबलेली एसटी बसची चाके पुन्हा कोविड-१९ ची दुसरी लाट ओसरल्यानंतर धावू लागल्या आहेत. एसटी बसेस पूर्ण क्षमतेने धावत असल्या तरी ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद ५० ते ६० टक्के मिळत आहे. परिणामी विभागात ११५ मुक्कामी बसपैकी केवळ ३७ फेऱ्याच आजघडीला सुरू आहेत. ज्या ठिकाणी मुक्कामी गाड्या जायच्या त्या गावातील प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांनाही मुक्कामी बस कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे ८ एसटी आगार आहेत. यातील सर्वच आगारातून ग्रामीण भागात रात्री मुक्कामी बसेस खेडेगावात सोडल्या जातात. महामंडळाकडून बसेस सोडण्याची तयारी असली तरी बसेला पाहिजे तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नाही. यामुळे महामंडळाचा इंधनाचा खर्चही वसूल होत नाही. आर्थिक नुकसान होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अद्यापही ७७ मुक्कामी फेऱ्या बंद आहेत. मुक्कामीे बस बंद असल्याने या गाड्या कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.

बॉक्स

शहर भागात गाड्या अधिक

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर विभागातून मध्यम व लांबपल्ल्याच्या तसेच जिल्हांतर्गत शहरी भागात धावणाऱ्या एसटी बसेसना प्रवाशाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी प्रवाशामुळे बसेसही हाऊसफुल्ल भरून धावत आहेत.

बाॅक्स

मुक्कामी गाड्यांचे काय?

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातून तसेच दर्यापूर, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आगारातून सध्या ११५ पैकी ३७ मुक्कामी बसेस जात आहेत. ७७ मुक्कामी बसेस केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक़्स

ग्रामीण भागातील गाड्यांना थंड प्रतिसाद

एसटी महामंडळाकडून ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बसेस मध्ये ५० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. यात खर्च वसूल होत नाही. याशिवाय अनेक ठिकाणी मुक्कामी बसेसला थांबण्यासाठी जागाही मिळत नाही.

कोट

आमच्या गावात अगोदर एसटी बस मुक्कामी यायची मात्र कोरोनापासून ही बस बंद आहे. त्यामुळे कामासाठी बाहेरगावी जायचे असल्यास खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुक्कामी बस आता सुरू करणे आवश्यक आहे.

- राजेंद्र कावरे, प्रवासी

कोट

कोरोनामुळे बसेस बंद होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. त्यामुळे मुक्कामी बसेसही सुरू कराव्यात, सणासुदीचे दिवस तोंडावर असल्याने बस सुरू होणे गरजेचे आहे.

कोट

ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद ५० ते ६० टक्केच आहे. ज्या ठिकाणी प्रवासी प्रतिसाद आहे. अशा बस सुरू केल्या आहेत. उर्वरित मुक्कामी बस आगामी सणाचे दिवस लक्षात घेता टप्याटप्याने सुरू केल्या जातील.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक