शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रस्ते केव्हा घेणार मोकळा श्वास?

By admin | Updated: January 19, 2015 23:56 IST

अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

अमरावती : अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील एकच नव्हे तर तीन संकुलांच्या लिजची मुदत संपल्यानंतरही प्रशासनाकडून ते हटविण्यासाठी कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.टांगा पडाव ते वलगाव मार्ग, बापट चौक ते तहसील तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यालगतच्या लिज संपलेल्या संकुलांमुळे वाहतूक विस्कळीत होते. पादचाऱ्यांनाही त्रास होतो. या तीनही संकुलांचे लीज काही वर्षांपूर्वीच संपले असून संकुलातील व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करुन राजरोसपणे व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. टांगा पाडाव ते वलगाव मार्गावर दर ५ ते १० मिनिटांनी ‘ट्रॅफीक जाम’ होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. असे असताना रस्त्यालगतचे अतिक्रमीत संकुल का हटविले जात नाही? याची कारणमिमांसा केल्यास बरेच गौडबंगाल उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर काही जणांना व्यवसाय करता यावा, यासाठी त्यावेळी जिल्हा प्रशासनाने लिजवर जागा दिल्या होत्या. नाममात्र भाडे घेऊन व्यावसायिकांना जागा देण्यामागे प्रशासनाचा उद्देश चांगला होता. मात्र, लिजच्या जागेवर असलेले हे अतिक्रमित संकुल आजमितीस अपघातासाठी कारणीभूत ठरु लागले आहेत. ज्यांनी नाममात्र भाडे देऊन जागा वापरली, ते कोट्यधीश झाले. परंतु लीज संपल्यानंतरही प्रशासनाला जागा परत देण्याची त्यांची मानसिकता नाही. महानगरातील प्रमुख मार्गावर हे तीन संकुल असून त्यांचे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे. परकोट भिंतीच्या बाजूला असलेल्या या अतिक्रमीत संकुलांमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. बापट चौक ते तहसील मार्गावरील संकुलांची हिच परिस्थिती आहे.