शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

रस्ते केव्हा घेणार मोकळा श्वास?

By admin | Updated: January 19, 2015 23:56 IST

अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

अमरावती : अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील एकच नव्हे तर तीन संकुलांच्या लिजची मुदत संपल्यानंतरही प्रशासनाकडून ते हटविण्यासाठी कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.टांगा पडाव ते वलगाव मार्ग, बापट चौक ते तहसील तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यालगतच्या लिज संपलेल्या संकुलांमुळे वाहतूक विस्कळीत होते. पादचाऱ्यांनाही त्रास होतो. या तीनही संकुलांचे लीज काही वर्षांपूर्वीच संपले असून संकुलातील व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करुन राजरोसपणे व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. टांगा पाडाव ते वलगाव मार्गावर दर ५ ते १० मिनिटांनी ‘ट्रॅफीक जाम’ होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. असे असताना रस्त्यालगतचे अतिक्रमीत संकुल का हटविले जात नाही? याची कारणमिमांसा केल्यास बरेच गौडबंगाल उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर काही जणांना व्यवसाय करता यावा, यासाठी त्यावेळी जिल्हा प्रशासनाने लिजवर जागा दिल्या होत्या. नाममात्र भाडे घेऊन व्यावसायिकांना जागा देण्यामागे प्रशासनाचा उद्देश चांगला होता. मात्र, लिजच्या जागेवर असलेले हे अतिक्रमित संकुल आजमितीस अपघातासाठी कारणीभूत ठरु लागले आहेत. ज्यांनी नाममात्र भाडे देऊन जागा वापरली, ते कोट्यधीश झाले. परंतु लीज संपल्यानंतरही प्रशासनाला जागा परत देण्याची त्यांची मानसिकता नाही. महानगरातील प्रमुख मार्गावर हे तीन संकुल असून त्यांचे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे. परकोट भिंतीच्या बाजूला असलेल्या या अतिक्रमीत संकुलांमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. बापट चौक ते तहसील मार्गावरील संकुलांची हिच परिस्थिती आहे.