शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महावेध कधी घेणार अचूक हवामानाचा वेध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:10 IST

शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती व त्या अनुषंगाने हवामानविषयक सल्ला देण्यासाठी एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत स्वंयचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे८९ केंद्रे कार्र्यान्वित : मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनासाठी रखडली यंत्रणा

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती व त्या अनुषंगाने हवामानविषयक सल्ला देण्यासाठी एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत स्वंयचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या महावेध प्रकल्पासाठी ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ या कंपनीसोबत शासनाचा ७ वर्षांचा सेवा करार झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी प्रकल्प खोळंबल्याने मोफतचा सल्ला मिळण्यासाठी शेतकºयांना किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.शेतीमध्ये अलीकडे प्रगत तंत्राचा वापर वाढतो आहे. बदलत्या हवामानासोबत जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारा माहिती दिली जाते. मात्र, ती पुरेशी व गावपातळीची नसते. यामुळे शेतकऱ्यांना दर १० मिनिटाला गावनिहाय हवामान स्थितीची माहिती व्हावी, यासाठी शासनाद्वारा ‘महावेध’ प्रकल्प साकारण्यात येऊन‘स्कॉयमेट वेदर कंपनी’सोबत ७ वर्षांचा करार करण्यात आला. त्या अनुषंगाने प्रत्येक महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत ही स्वंयचलित हवामान केंद्र सुरू झालीत. याचा डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत असला तरी तालुक्यांना व कृषी विभागाला मात्र पाठविलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाशिवाय या प्रकल्पाची सेवा सुरू होणार नाही. त्यामुळे सात वर्षांच्या करारारातील एक वर्षाचा कालावधी वाया गेल्याचे वास्तव आहे.राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारा दर १० मिनिटांनी पुण्यातील सर्व्हरला माहिती पाठविण्यात येणार आहे व नंतर ती जिल्हा व तालुक्याला पाठविण्यात येईल. यासाठी लॉग इन आयडी व पासवर्ड स्कॉयमेटद्वारा संबंधितांना देण्यात येणार आहे. एसएमएसद्वारे ती शेतकऱ्यांनाही पाठविण्यात येईल. मात्र, नऊ महिन्यांपासून महावेधद्वारा अचूक हवामानाचा वेध देण्यात आलेला नाही, हेच वास्तव आहे.दर १० मिनिटाला या घटकांची नोंदया स्वयंचलित हवामान केंद्रांत तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाºयांचा वेग आणि दिशा या हवामान घटकांची दर १० मिनिटांनी माहिती/नोंद लॉगरमध्ये घेतली जाणार आहे. दर तासाभरात ही माहिती पुण्याच्या सर्व्हरला पाठविली जाईल. त्यानंतर जिल्हा व तालुक्याला पाठविली जाईल. या माहितीच्या आधारे पीकविमा व इतर जनसुविधा सोईस्कर होणार आहे.२६ जानेवारीला ‘महावेध’चे उद्घाटनशेतकऱ्यांना दररोज हवामानाची माहिती एसएमएसद्वारे मिळावी, यासाठी जिल्हातील ८९ व राज्यातील २०६५ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र, उद्घाटनाअभावी सेवा अद्याप सुरू झालेली नाही. २६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सेवेचे उद्घाटन करतील, त्यानंतरच ही सुविधा आगामी ७ वर्षे स्कॉयमेट वेदर सर्व्हिसद्वारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.शेतकऱ्यांसाठी ‘स्कॉयमेट’चे अ‍ॅपशेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज दर १० मिनिटांनी मिळावा, यासाठी महावेध प्रकल्पाची केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात सेवा सुरू झालेली नाही. स्कॉयमेट वेदर सर्व्हिसद्वारा शेतकऱ्यांसाठी वेदर अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. याद्वारेही शेतकºयांना हवामानाची माहिती मिळू शकते, असे सेवा पुरविणाऱ्या संस्थेने सांगितले.

राज्यात २०६५ मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. दर १० मिनिटांनी हवामानाचा डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत आहे. येत्या २६ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन होऊन शेतकऱ्यांना हवामानाचा संदेश देण्यात येईल.- भूषण रिनके,विदर्भ व्यवस्थापक, महावेध