शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

किती जणांना होऊन गेला कोराना हे सांगणारा 'सेरो सर्व्हे' करणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

कोरोना झाला म्हणजे नुसता ताप, सर्दी, खोकलाच नव्हे तर सद्यस्थितीत नोंद होणाऱ्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरासह जिल्ह्यात किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे कळायचा एकमेव मार्ग हा ‘सेरो’ सर्व्हेक्षण आहे. जी शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत तेथे हे सर्व्हेक्षण करण्यात यावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि स्थानिक महापालिका प्रशासनही सकारात्मक आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था : पुणे, औरंगाबाद, जळगावात अंमलबजावणी

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमण होऊ गेलेल्यांची, कारोना लढासाठीच्या अ‍ँटिबॉडिज् त्यांच्या शरीरात उपलब्ध असल्याची ओळख पटविणारी सेरोलॉजिकल चाचणी करणारे सर्व्हेक्षण अमरावती जिल्ह्यात शासनाच्या आदेशानंतर महिना उलटूनही करण्यात आलेले नाही. जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही ढिलाईयुरू आहे.आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांनी हे सर्वेक्षण करण्याचे आदेश १० ऑगस्टला दिले आहेत. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात पाच हजारांवर कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठीच्या अ‍ॅन्टीबॉडी (प्रतिपिंड) किती नागरिकांच्या शरीरात तयार झाल्या आहेत, याचा कुठलाही डेटा जिल्ह्यात उपलब्ध नाही.कोरोना झाला म्हणजे नुसता ताप, सर्दी, खोकलाच नव्हे तर सद्यस्थितीत नोंद होणाऱ्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरासह जिल्ह्यात किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे कळायचा एकमेव मार्ग हा ‘सेरो’ सर्व्हेक्षण आहे. जी शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत तेथे हे सर्व्हेक्षण करण्यात यावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि स्थानिक महापालिका प्रशासनही सकारात्मक आहे. किती नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता हे समजल्यास प्रशासनालाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करणे सोईचे होणार आहे. जिल्ह्यात ४ एप्रिलला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतरच्या पाच महिन्यात कोरोना संक्रमितांची संख्या ग्रामीणमध्ये साधारणपणे २५०० तर महापालिका क्षेत्रात ५,००० च्या वर नोंद झालेली आहे. संसर्ग झाल्यानंतरच्या १५ दिवसानंतर या आजाराच्या ‘आयजीएम व आयजीजी’ अ‍ॅन्टीबॉडीज संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार होतात. संसर्गातून बरे झाल्यानंतरही बरेच महिने त्या टिकू शकतात. या चाचण्या करुन एसएआरएस- सीओव्ही-२ चा संसर्ग होऊन गेलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे प्रमाण समजण्यासाठी ‘सेरो’ सर्व्हे ही चाचणी महत्वाची ठरणार आहे.शहरात ०.६२ नागरिकांना संसर्गमहापालिका क्षेत्राची लोकसंख्या ८ लाख आहे. या परिस्थितीत ५ हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे व ही संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनूसार शहरातील संसर्गाचे प्रमाण हे ०.६२ टक्के आहे. या पेक्षा कमी प्रमाण असणाºया शहरात ‘सेरो’ सर्व्हे झालेला असतांना अमरावतीमध्ये रखडलेला आहे.काय आहे सेरोलॉजिकल सर्व्हेएखाद्या विशिष्ठ कारणांसाठी अनेकांची रक्त तपासणी केली जाते. त्याला ‘सेरोलॉजिकल सर्व्हे’ असे वैद्यकशास्त्रात म्हटल्या जाते. या तपासणीद्वारे रक्तात काही आजाराचे प्रतिपिंड (अ‍ॅन्टीबॉडी) तयार झालेले आहेत का, याविषयीचे पृथक्करण केल्या जाते. त्या व्यक्तीच्या श्रिरातील प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करुन आजारास सामोरे जाण्याच्या प्रतिकार शक्तीचे अनुमान बांधल्या जातात व यावर संसर्गाचे प्रमाणाचाही अंदाज येतो. यासाठी हे सर्वेक्षण आवश्यक आहे.‘सेरो’ सर्व्हेक्षण कशासाठी?उच्च जोखीम असलेल्या आरोग्य सेवा कर्मचारी, कामगार, इम्युनो कॉप्रोमाईज्ड व्यक्ती, कंटेनमेंट झोनमधील व्यक्ती संक्रमित झाल्या होत्या काय, हे सर्व्हेक्षणातून स्पष्ट होते. यासोबतच प्रत्येक वॉर्डात रॅण्डम पद्धतीने नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करुन त्यांच्यामध्ये अ‍ॅन्टीबॉडी तयार झालेल्या आहेत का, शहरात हर्ड इम्युनिटी (सामुहिक प्रतिकारक शक्ती) याची माहिती होऊन उपाययोजनांची दिशा ठरविली जाते.जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सर्व्हेक्षण करता येणार नाही. मात्र, काही प्रमाणात कमी आल्यानंतर सेरो सर्व्हेक्षण केल्या जाईल.शैलेश नवालजिल्हाधिकारी‘सेरो’ सर्व्हेसाठी कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक पाहिजे. यामध्ये प्रत्येक चाचणीला ६०० रुपये खर्च येईल. तो कोण करणार, आम्ही सहकार्य करायला तयार आहे.डॉ अनिल रोहनकरजिल्हाध्यक्ष, आयएमए.जिल्ह्यात ‘सेरो’ सर्व्हेक्षण करण्यासंदर्भात शासनाच्या अद्याप सुचना नाहीत. यासंदर्भात काय निकष आहेत. याची आपनास माहिती नाही.श्यामसुंदर निकम.जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या