शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-नागपूर, भुसावळ पॅसेंजर धावणार तरी कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:01 IST

अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली अमरावती ते वर्धा, भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अमरावती ते नागपूर, भुसावळ, पॅसेंजर, इंटरसिटी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे लक्ष देत भुसावळ मध्य रेल्वे विभागाने तत्काळ  पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे विभागाने आता रेल्वे गाड्यांचा स्पेशल दर्जा काढून सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, केवळ एकच मेमू सुरू केल्याने पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार, असा प्रश्न आता प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली अमरावती ते वर्धा, भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अमरावती ते नागपूर, भुसावळ, पॅसेंजर, इंटरसिटी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे लक्ष देत भुसावळ मध्य रेल्वे विभागाने तत्काळ  पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने याचा विचार होणे गरजेचे आहे.

केवळ मेमू झाली सुरू - अमरावती  रेल्वेस्थानकाहून अमरावती ते वर्धा, भुसावळ एकच मेमू सुरू आहे.- नागपूर ते अमरावती इंटरसिटी या गाड्या रेल्वे विभागाने सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

जनरल तिकीट बंदचसर्व रेल्वे गाड्या नियमित करण्यात आल्या असल्या तरी आरक्षणाची अट अजूनही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य तिकिटांची विक्री अजूनही बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकिटांची खरेदी करावी लागत आहे.- कोरोनामुळे आधीच रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यातच स्पेशल ट्रेन सुरू झाल्या. मात्र, आता आरक्षणाची अट रद्द करण्याची मागणी होत आहे.

प्रवाशांच्या खिशाला झळ 

पॅसेंजर रेल्वे अजूनही सुरू न झाल्याने अपडाऊन करण्यास अडचण येते. परिणामी, वर्धा येथेच खोलीवर राहावे लागते. अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने खिशालाही चांगलीच झळ बसते.- प्रवीण कस्तुरे, प्रवासी.

रेल्वे विभागाने गाड्या नियमित जरी केल्या तरी आरक्षणाची अट कायम आहे. पॅसेंजर गाड्याही सुरू केलेल्या नाहीत, त्यामुळे अतिरिक्त पैसे मोजावे लागते. खासगी वाहनाने अपडाऊन करावे लागत आहे.- राजेश सपकाळे, प्रवासी

 

टॅग्स :railwayरेल्वे