शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पूरग्रस्तांच्या मरण यातनांचा अंत कधी ?

By admin | Updated: October 18, 2015 00:31 IST

२००७ च्या महापुरानंतर करण्यात आलेल्या पुनर्वसनग्रस्त मागील आठ वर्षांत मरणायतना भोगत आहे.

संदीप मानकर अमरावती२००७ च्या महापुरानंतर करण्यात आलेल्या पुनर्वसनग्रस्त मागील आठ वर्षांत मरणायतना भोगत आहे. ६ तालुक्यांतील अनेक लाभार्थ्यांना अद्यापही आपल्या हक्काचे घर मिळाले नाही. शासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे पुरेसा निधीच उपलब्ध न झाल्यामुळे आठ वर्षांत ६० टक्के पुनर्वसन करण्यात आले. काही गावांत फक्त १०० टक्के झाले तर अनेकांना आपल्या हक्काचे घर मिळू शकले नाही. जिल्ह्यातील दर्यापूर, अमरावती, भातकुली, अंजनगाव, मोर्शी व चांदूरबाजार आदी तालुक्यात अनेक नद्यांना आलेल्या महापुरामुळे ४ हजार १२२ कुटूंब बेघर झाले. शासनाने ४३ गावात पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून दिली. परंतु वेळोवेळी अपुऱ्या निधीमुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.प्रत्येक लाभार्थ्याला एक लक्ष रुपये घरे बांधणीसाठी देऊ केले. पण वाढत्या महागाईमुळे हे अशक्य आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या गावात पुनर्वसनपूर्ण झाले आहेत तेथे रस्ता, वीज, पाणी द्या, नागरीसुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत. पुनर्वसनग्रस्तांची घरे बांधणीसाठी प्रशासनाने शासनाकडे ४२ कोटी २ लक्ष ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी आठ वर्षांत १८ कोटी ५४ लाख ६० हजार एवढा निधी शासनाने व तो लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने वाटप झाला. चालू वर्षात १२ कोटी ८५ लाख ६५ हजारांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. नागरी सुविधेसाठी यामध्ये रस्ते, पाणी व गटार ११ कोटी व विजेसाठी ३३लाख ७५ हजारांची गरज आहे.