शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा कलंक केव्हा पुसणार?

By admin | Updated: September 8, 2015 00:17 IST

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही राज्यातील फासे पारधी समाज आजही दऱ्या, खोऱ्यात राहून असह्य जगणे जगत आहे.

राज्यपालांची भेट : फासे पारधी समाजाचा सवालअमरावती : स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही राज्यातील फासे पारधी समाज आजही दऱ्या, खोऱ्यात राहून असह्य जगणे जगत आहे. कोठे चोरी, दरोडे पडल्यास फासे पारधी समाजाला लक्ष्य केले जाते. हा शिरस्ता किती दिवस चालणार, असा सवाल फासे पारधी समाजाचे युवा नेते मतीन भोसले यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या पुढ्यात ठेवला.मुंबई येथे राजभवनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने राज्यपाल राव यांची नुकतीच भेट घेऊन आदिवासी समाजाने व्यथा मांडल्या. यावेळी मतीन भोसले यांनी फासे पारधी समाजाचे प्रश्न, समस्या मांडताना या समाजाला चोरीचा लागलेला कलंक कधी पुसला जाणार, असे म्हणत शासन, प्रशासनस्तरावर होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी करण्यात आली. फासे पारधी समाज हा आदिवासी समाजात गणला जात असला तरी आजही हा समाज अशिक्षित आहे. विकास, शिक्षण, उत्थान या सर्व बाबी फासे पारधी समाजासाठी केवळ कागदोपत्री असल्याचे भोसले यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यपालांसोबतच्या १५ मिनिटाच्या संवादात मतीन भोसले यांनी राज्यातील फासे पारधी समाजाचे जगणे हे विशद केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत आदिवासी समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याची तरतूद केली आहे. मात्र, आदिवासी समाजाच्या नावे बोगस आदिवासी शिरकाव करीत असल्याचा आरोप मतीन भोसले यांनी केला. फासे पारधी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षण, स्वयंरोजगार, नोकरीत वाटा मिळाला पाहिजे, हे मुद्दे त्यांनी प्रखर्षाने मांडले. दरम्यान भोसले यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे फासे पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या आश्रम शाळेला शासकीय अनुदान उपलब्ध करुन देण्याची मागणी रेटून धरली. भूमिहीन फासे पारध्यांना ई-क्लास शेत जमिनीचे पट्टे वाटप, उदरनिर्वाहाचे साधन द्यावे, फासे पारधी समाजाला लागलेला चोरट्यांचा लागलेला कलंक पुसून काढावा, प्रत्येक फासे पारधी समाजाच्या मुलाला शिक्षण अनिवार्य करावे अशा विविध मागण्या रेटून या समाजाची दैनावस्था भोसले यांनी मांडली. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यपालांनी पुढाकार घेत फासे पारधी समाजाच्या समस्या, प्रश्न, व्यथा समजून घेतल्याबद्दल मतीन भोसले यांनी राज्यपालांचे अभार मानले. यावेळी आदिवासी समाजाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, आ. राजू तोडसाम, दशरथ मडावी, किरण कुमरे, विनोद पवार, अजाबराव उके आदी उपस्थित होते.