शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू झाल्यात, महाविद्यालये केव्हा उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

विद्यार्थी संघटनांचे आंदोलन, कॉलेज उघडण्याच्या तारखेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख चढ-उतार होत असताना इयत्ता पाचवी ...

विद्यार्थी संघटनांचे आंदोलन, कॉलेज उघडण्याच्या तारखेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख चढ-उतार होत असताना इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, जिल्ह्यातील महाविद्यालये बंदच आहे. नवीन वर्षात जानेवारीपासून कॉलेज उघडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, कॉलेज सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. महाविद्यालये केव्हा सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यासह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे. अभाविपने मंगळवारी महाविद्यालये उघडा आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गामुळे महाविद्यालये बंद आहे. शिक्षण क्षेत्रात हा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक उपक्रम, परीक्षा, अभ्यासक्रम आदी विस्कळीत झाले आहे. २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तेव्हापासून शाळेची पहिली घंटा वाजली. आता २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट पाहावयास मिळत आहे. मात्र, अद्यापही महाविद्यालये बंदच आहे. हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून, उन्हाळी २०२१ परीक्षांचा पत्ता नाही. विद्यापीठाने चालू शैक्षणिक सत्र जाहीर केले असले तरी त्याचा पुरता बाेजवारा उडाला आहे. पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन कॉलेजचे विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. असे असताना नेमकी महाविद्यालयेच बंद का? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

---------------------

एकृूण महाविद्यालये - ११८

एकूण विद्यार्थी- ९८, ७७५

-------------------

शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण?

कोरोनामुळे गत १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे मिळता असले तरी विज्ञान व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. विद्यार्थी हे महाविद्यालये सरू होणाच्या प्रतीक्षेत आहेत. महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

--------------------

कोट

महाविद्यालये सुरू होणे आता काळाची गरज झाली आहे. किती दिवस शिक्षणापासून विद्यार्थी दूर राहतील, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष शिकवणीसाठी महाविद्यालये सुरू करण्यासाठी ‘कॉलेज उघडा’ हे आंदोलन करण्यात आले.

- रवी दांडगे, अभाविप.

---------

कोट

यूजीसीच्या निर्देशानुसार कॉलेज, विद्यापीठाचे शिक्षण सुरू करणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना अगोदरच निवेदन सादर केले आहे. शासन जर सर्व काही सुरू करण्यावर भर देत असल तर महाविद्यालये, विद्यापीठच बंद का?. त्यामुळे कॉलेज लवकर सुरू व्हायला हवे.

- योगेश चव्हाण, एआयएसएफ.

--------------------

कोट

१० महिन्यांपासून घरी असल्याने कंटाळा आला आहे. वर्गात शिक्षण घेण्याचा वेगळा अनुभव येतो. आता कॉलेज सुरू झाले पाहिजे. उन्हाळी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा आहे. परीक्षांचा ताण आला आहे. महाविद्यालये लवकर सुरू झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

- पूजा रोकडे, विद्यार्थिनी, बडनेरा.

-----

कोट

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होत आहे. गत १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहे. नवीन शैक्षणिक सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. परीक्षा, निकालाची काळजी आहे. आता महाविद्यालये सुरु झाली पाहिजे. शासनाने त्यादिशेने सकारात्मक विचार करावा.

- निखिल गोरे, विद्यार्थी, मोर्शी

------------------------