शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

गिधाड संवर्धनाचा अ‍ॅक्शन प्लॅन केव्हा?; चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यात गिधाडांचा संचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 19:38 IST

मानवी साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संवर्धनाचा अ‍ॅक्शन प्लॅन राज्य शासनाकडे तयार नाही. एवढेच नव्हे तर राज्यात गिधाडांची संख्या किती हेदेखील निश्चित नाही.

अमरावती : मानवी साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संवर्धनाचा अ‍ॅक्शन प्लॅन राज्य शासनाकडे तयार नाही. एवढेच नव्हे तर राज्यात गिधाडांची संख्या किती हेदेखील निश्चित नाही. मात्र, शेजारील मध्यप्रदेश सरकारने प्रभावी उपाययोजना करून गिधाडांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ केली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, पेंच, नागपूर व सह्याद्रीच्या भागात गिधाडांचा संचार आढळतो. सजीवांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्गाने गिधाडाला स्वच्छदूत म्हणून जन्माला घातले आहे. मात्र, राज्यात काहीच भागात त्यांची संख्या शिल्लक असल्यामुळे ते भविष्यासाठी धोकादायक मानले जात आहे. गिधाड असलेल्या भागात त्यांच्यासाठी खाद्य उपलब्ध होत नसल्याने तेसुद्धा संख्या रोडावण्याचे कारण मानले जात आहे. मध्यंतरी गिधाडांसाठी रेस्टाँरट ही संकल्पना गडचिरोली, चंद्रपुरात राबविली गेली. त्यामुळे एकट्या गडचिरोलीत गिधाड २५० च्यावर असल्याची नोंद दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, त्यानंतर रेस्टॉरेंट संकल्पनेला काहीअंशी छेद देण्याचा प्रकार झाला.सन १९८०-१९९० च्या दशकात राज्यात गिडाधांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. गिधाड पक्षी हे मेलेली गुरे-ढोरे खाऊन उपजिविका भागवितात. परंतु, काही वर्षांपासून मरणा-या गुराढोरांची संख्या कमी झाली आहे. मात्र, त्यानंतर गुरा, ढोºयांच्या संवर्धन, दूग्धव्यवसायासाठी सोडीयम डॉयक्लोफिनॅकचा वापर वाढला. त्यानंतर गुरा-ढोरांचे नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांचे दूषित मांस गिधाडाच्या खाण्यात आले. परिणामी, गिधाडांना किडनी आजाराने ग्रासले. दरम्यान, गुरा-ढोरांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे गिधाडांची संख्या कमी होत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.

गिधाड ‘आययूसीएन’च्या लाल यादीत युनो प्रणीत आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (आययूसीएन) ने गिधाडांचा होणारा ºहास बघता त्यांना सन २०१६ पासून लाल यादीत टाकले आहे. सन २०१८ च्या यादीतही गिधाड लाल यादीत आहे. वनविभागाने सामाजिक संघटना, पक्षी अभ्यासक, संवर्धकांच्या माध्यमातून गिधाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

पक्षी गणनेनंतरही गिधाडांची संख्या निश्चित नाहीशासन परिपत्रकानुसार दरवर्षी पक्षी गणना केली जाते. मात्र, ज्या भागात गिधाडांचे वास्तव आहे. त्याभागातदेखील गिधाडांची गणना होत किंवा नाही? हे स्पष्ट होऊ शकले नाही. वन्यजीव विभागाकडे गिधाडांच्या संख्येविषयी संभ्रम कायम आहे. 

निसर्गाचे सफाई कर्मचारी म्हणून गिधाड काम करतात. घाण साफ करून ते सजीवांचे आरोग्य सुरक्षित ठेवतात. मात्र, गिधाडांच्या संवर्धनाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार नाही, ही दुर्देवी बाब आहे. शासनाने त्याकरिता पुढाकार घ्यावा.- यादव तरटे पाटील,पक्षी अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती