शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केव्हा?, राज्यासह पंजाबच्या शेतकरी मिशनची नीती आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 17:34 IST

- गजानन मोहोडअमरावती : संसदेत २००८ मध्ये कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याला विरोध झाल्यामुळेच कंपण्याचे फावल्याने राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतक-यासह शेतमजुरांचे हजारो बळी जात आहे. त्यामुळे हा कायदा अस्तिस्वात आणून प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील शेतकरी स्वालंबन मिशन व पंजाबचे शेतकरी मिशनद्वारा केंद्राच्या नीती आयोगाकडे मागणी करण्यात येऊन एकात्मिक व्यवस्थापनासाठी १० शिफारशी ...

- गजानन मोहोड

अमरावती : संसदेत २००८ मध्ये कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याला विरोध झाल्यामुळेच कंपण्याचे फावल्याने राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतक-यासह शेतमजुरांचे हजारो बळी जात आहे. त्यामुळे हा कायदा अस्तिस्वात आणून प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील शेतकरी स्वालंबन मिशन व पंजाबचे शेतकरी मिशनद्वारा केंद्राच्या नीती आयोगाकडे मागणी करण्यात येऊन एकात्मिक व्यवस्थापनासाठी १० शिफारशी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे.बहुराष्ट्रीय कंपण्यांच्या दबावात कीटकनाशकांसाठीचा महत्त्वपूर्ण कायदा २००८ मध्ये फेटाळल्याची बाब आता इतिहासजमा झाल्यानंतर कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे हजारो शेतक-यांचे नाहक बळी जात आहे. त्यामुळे नव्याने २०१७ चा कीकनाशक व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आणावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. या कायद्याच्या नव्याने मसुदा करण्यात यावा व यामध्ये आरोग्य, पर्यावरण, सुरक्षित वापर, कीटकनाशकांच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे शेतक-यांचे जात असलेले बळी, जमिनीची व पर्यावरणाची परिमित स्वरूपात होत असलेली हानी व यासाठी भरपाई आदींची कायद्यात तरतूद या करणे महत्त्वाचे आहे.सध्या अस्तित्वात असणारा कीकनाशक नियंत्रण कायदा हा १९६८ व नियम १९७१ मध्ये या सर्व तरतुदी नसल्यामुळेच नियंत्रण करण्यास अपुरा ठरत आहे. त्यामुळे कीटकनाशकांची विषबाधा होण्याच्या किमान १० हजार घटनांची नोंद होत आहे. ज्या कीटकनाशकांच्या वापरावर युनोद्वारा बंदी गालण्यात आली. ही कीटकनाशके देशातंर्गत खुलेआम विकली जातात हे वास्तव असल्याचा आरोप मिशनचे अध्यक्ष तिवारी यांनी केला आहे.

‘सीएससी’च्या हवाल्याने कृषी मंत्रालयच दोषीसेंटर फॉर सायन्स अँड एन्हायरमेंट (सीएसई) या देशातील अग्रगण्य संस्थेच्या अहवालानुसार कीटकनाशकांच्या असुरक्षित वापरास केंद्रीय कृषी मंत्रालय व राज्याचे कृषी मंत्रालय दोषी असल्याचा आरोप शेतकरी मिशनने केला आहे. त्यामुळे कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, आजारपण व शेतकरी व शेतमजुरांंचे मृत्यू टाळण्यासाठी कीटकनाशक व्यवस्थापनातील अटी तत्काळ दुरूस्त होणे महत्त्वाचे असल्याचे राज्यातील शेतकरी मिशनचे किशोर तिवारी व पंजाब राज्यातील शेतकरी मिशनचे अजय जाखर यांनी पंतप्रधानांचे निदर्शनात आणून दिले आहे.

विदेशी वाणावर बंदी, महाबीजने करावा पुरवठाशेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करायचा असल्यास विदर्भ व मराठवाड्यातील रासायनिक शेतीला बंदी घालून विषमुक्त नैसर्गिक शेतीसाठी प्रतिहेक्टरी २५ हजारांचे किमान ५ वर्षे अनुदान द्यावे. विदेशी कापसाच्या वाणावर बंदी घालण्यात येऊन बियाण्यांचा पुरवठा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कापूस संशोधन केंद्रासह महाबिजने १०० टक्के करावा व शेतकºयांची लूट थांबविण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा तयार करावी, यासह अन्य १० महत्त्वपूर्ण घटकांची शिफारस केंद्र व राज्य शासनाला करण्यात आली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती