शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

११०० कोटींचे कर्जवाटप केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:34 IST

प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देकृषिमंत्र्याच्या गृहजिल्ह्यातील वास्तव : बँका जुमानेना, जिल्हा प्रशासनाचा अंकुश कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटपास जिल्ह्यातील बँकाचे असहकार्य आहे. मागील हंगामातदेखील बँकांचा नन्नाचा पाढा होता. वारंवार सूचना देऊनही राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेट बँक आॅफ इंडिया व जिल्ह्यात लीड बँक असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाची खाती बंद केली तसेच काही प्रकरणात व्यवस्थापकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. परिणामी या बँकांची नामुष्की झाल्याने त्यांनी कर्जवाटपाचा टक्का वाढविला होता. तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीदेखील बँक व्यवस्थापनाला निकराचा इशारा दिला होता. त्याच्या परिणामी कर्जवाटपाची गती वाढली होती. यंदा मात्र केवळ इशारे दिले जात असल्याने बँक व्यवस्थापनावर फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री तथा कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याद्वारे प्रत्यक्ष कृती केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०१९ पासून कर्जवाटप सुरू झाले. प्रत्यक्षात जून अखेरपासून सुरुवात झाली. जिल्हा बँकेनेदेखील सुरुवातीला धडाका लावला व आता प्रक्रिया रखडली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का सुरुवातीपासून मंदावला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा टक्का अद्याप वाढलेला नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी २ लाख ६० हजार ५७० शेतकऱ्यांना १६८५ कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्ष्यांक होते. त्यातुलनेत सद्यस्थितीत बँकांनी ३९ हजार ९७० शेतकºयांना ४३१ कोटी ८७ लाखांचे वाटप केले. अद्यापही ११५३ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप झालेले नाही.असे आहे बँकनिहाय कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँकांना यंदाच्या खरिपासाठी १,६६,५७० शेतकºयांना ११४०.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत २१,०५६ शेतकऱ्यांना २७४.१६ कोटींचे वाटप करण्यात आले . ही टक्केवारी २४ आहे.ग्रामीण बँकांना यंदाच्या खरिपासाठी २,००० शेतकऱ्यांना १४.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ४१० शेतकºयांना ४.४४ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३१ आहे.जिल्हा बँकेला यंदाच्या खरिपासाठी ९२,००० शेतकºयांना ५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत १८,५०४ शेतकºयांना १५३.२७ कोटींचे वाटप करण्यात आल. ही टक्केवारी २९ आहे.शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी बँकांद्वारे कर्जमेळावे घेतले जात आहे. हेतुपुरस्सर कर्ज नाकारले जात असल्यास त्या व्यवस्थापकावर गुन्हा नोंदविला जाईल- अनिल बोंडेपालकमंत्रीसर्वच बँकाना कर्जवाटपाचा टक्का वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँका कर्ज देत नसल्यास शेतकऱ्यांनी सहकार किंवा महसूल विभागाकडे तक्रार करावी.- शैलेश नवाल जिल्हाधिकारी