शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

११०० कोटींचे कर्जवाटप केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:34 IST

प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देकृषिमंत्र्याच्या गृहजिल्ह्यातील वास्तव : बँका जुमानेना, जिल्हा प्रशासनाचा अंकुश कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटपास जिल्ह्यातील बँकाचे असहकार्य आहे. मागील हंगामातदेखील बँकांचा नन्नाचा पाढा होता. वारंवार सूचना देऊनही राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेट बँक आॅफ इंडिया व जिल्ह्यात लीड बँक असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाची खाती बंद केली तसेच काही प्रकरणात व्यवस्थापकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. परिणामी या बँकांची नामुष्की झाल्याने त्यांनी कर्जवाटपाचा टक्का वाढविला होता. तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीदेखील बँक व्यवस्थापनाला निकराचा इशारा दिला होता. त्याच्या परिणामी कर्जवाटपाची गती वाढली होती. यंदा मात्र केवळ इशारे दिले जात असल्याने बँक व्यवस्थापनावर फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री तथा कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याद्वारे प्रत्यक्ष कृती केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०१९ पासून कर्जवाटप सुरू झाले. प्रत्यक्षात जून अखेरपासून सुरुवात झाली. जिल्हा बँकेनेदेखील सुरुवातीला धडाका लावला व आता प्रक्रिया रखडली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का सुरुवातीपासून मंदावला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा टक्का अद्याप वाढलेला नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी २ लाख ६० हजार ५७० शेतकऱ्यांना १६८५ कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्ष्यांक होते. त्यातुलनेत सद्यस्थितीत बँकांनी ३९ हजार ९७० शेतकºयांना ४३१ कोटी ८७ लाखांचे वाटप केले. अद्यापही ११५३ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप झालेले नाही.असे आहे बँकनिहाय कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँकांना यंदाच्या खरिपासाठी १,६६,५७० शेतकºयांना ११४०.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत २१,०५६ शेतकऱ्यांना २७४.१६ कोटींचे वाटप करण्यात आले . ही टक्केवारी २४ आहे.ग्रामीण बँकांना यंदाच्या खरिपासाठी २,००० शेतकऱ्यांना १४.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ४१० शेतकºयांना ४.४४ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३१ आहे.जिल्हा बँकेला यंदाच्या खरिपासाठी ९२,००० शेतकºयांना ५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत १८,५०४ शेतकºयांना १५३.२७ कोटींचे वाटप करण्यात आल. ही टक्केवारी २९ आहे.शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी बँकांद्वारे कर्जमेळावे घेतले जात आहे. हेतुपुरस्सर कर्ज नाकारले जात असल्यास त्या व्यवस्थापकावर गुन्हा नोंदविला जाईल- अनिल बोंडेपालकमंत्रीसर्वच बँकाना कर्जवाटपाचा टक्का वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँका कर्ज देत नसल्यास शेतकऱ्यांनी सहकार किंवा महसूल विभागाकडे तक्रार करावी.- शैलेश नवाल जिल्हाधिकारी