शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

११०० कोटींचे कर्जवाटप केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:34 IST

प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देकृषिमंत्र्याच्या गृहजिल्ह्यातील वास्तव : बँका जुमानेना, जिल्हा प्रशासनाचा अंकुश कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ कोटींचे वाटप बाकी असल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटपास जिल्ह्यातील बँकाचे असहकार्य आहे. मागील हंगामातदेखील बँकांचा नन्नाचा पाढा होता. वारंवार सूचना देऊनही राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेट बँक आॅफ इंडिया व जिल्ह्यात लीड बँक असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाची खाती बंद केली तसेच काही प्रकरणात व्यवस्थापकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. परिणामी या बँकांची नामुष्की झाल्याने त्यांनी कर्जवाटपाचा टक्का वाढविला होता. तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीदेखील बँक व्यवस्थापनाला निकराचा इशारा दिला होता. त्याच्या परिणामी कर्जवाटपाची गती वाढली होती. यंदा मात्र केवळ इशारे दिले जात असल्याने बँक व्यवस्थापनावर फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री तथा कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याद्वारे प्रत्यक्ष कृती केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०१९ पासून कर्जवाटप सुरू झाले. प्रत्यक्षात जून अखेरपासून सुरुवात झाली. जिल्हा बँकेनेदेखील सुरुवातीला धडाका लावला व आता प्रक्रिया रखडली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का सुरुवातीपासून मंदावला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा टक्का अद्याप वाढलेला नाही. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी २ लाख ६० हजार ५७० शेतकऱ्यांना १६८५ कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्ष्यांक होते. त्यातुलनेत सद्यस्थितीत बँकांनी ३९ हजार ९७० शेतकºयांना ४३१ कोटी ८७ लाखांचे वाटप केले. अद्यापही ११५३ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप झालेले नाही.असे आहे बँकनिहाय कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँकांना यंदाच्या खरिपासाठी १,६६,५७० शेतकºयांना ११४०.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत २१,०५६ शेतकऱ्यांना २७४.१६ कोटींचे वाटप करण्यात आले . ही टक्केवारी २४ आहे.ग्रामीण बँकांना यंदाच्या खरिपासाठी २,००० शेतकऱ्यांना १४.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत ४१० शेतकºयांना ४.४४ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३१ आहे.जिल्हा बँकेला यंदाच्या खरिपासाठी ९२,००० शेतकºयांना ५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत १८,५०४ शेतकºयांना १५३.२७ कोटींचे वाटप करण्यात आल. ही टक्केवारी २९ आहे.शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी बँकांद्वारे कर्जमेळावे घेतले जात आहे. हेतुपुरस्सर कर्ज नाकारले जात असल्यास त्या व्यवस्थापकावर गुन्हा नोंदविला जाईल- अनिल बोंडेपालकमंत्रीसर्वच बँकाना कर्जवाटपाचा टक्का वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँका कर्ज देत नसल्यास शेतकऱ्यांनी सहकार किंवा महसूल विभागाकडे तक्रार करावी.- शैलेश नवाल जिल्हाधिकारी