शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राज्यात प्रशासकीय बदल्यांचा मुहूृर्त केव्हा ? अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाच्या नव्या आदेशाची प्रतीक्षा

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2024 16:16 IST

Nagpur : सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाच्या ३९ विभागातील हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीयबदल्या रखडल्या आहेत. त्यामुळे या प्रशासकीय बदल्यांचा मुहूर्त केव्हा ? असा सवाल बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा आहे. किंबहुना सप्टेंबरमहिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत असून यंदा प्रशासकीय बदल्या होणार की नाही, याबाबत चित्रअस्पष्ट आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात; मात्र यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबविले नाही; मात्र राज्य शासनाकडून बदली संदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा विभागप्रमुखांना आहे. त्याशिवाय यंदा प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणे अशक्य आहे.

निवडणुका आटोपल्या तरीही सामान्य प्रशासनाकडून चालढकललोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर ६ जून रोजी निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या होतील, असे चित्र हाेते. दरम्यान, मुंबई, कोकण व नाशिक पदवीधर, शिक्षक मतदारसंघात निवडणूक असल्याने बदलीस पात्र हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांना ब्रेक लागला. आता निवडणुका आटोपल्या असताना प्रशासकीय बदल्यांकरिता नवे आदेश निर्गमित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग चालढकल करीत असल्याचे वास्तव आहे.

३१ हजार प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी वेटिंगवरसामान्य प्रशासन विभागाने अद्यापही बदली करण्यासंदर्भात आदेश जारी केले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाच्या ३९ विभागांतील बदलीस पात्र सुमारे ३१ हजार अधिकारी व कर्मचारी वेटिंगवर आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागातील कर्मचारी कधी बदली होणार याकडे नजरा लावून आहेत, तर ज्यांना मलाईदार जागा हव्यात अशा महसूल, कृषी, परिवहन, वनविभाग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मंत्रालयातील पायऱ्या झिजवत आहेत. काहींनी मोक्याच्या जागांसाठी ‘सौदे’देखील केले आहेत. त्यामुळे यंदा बदली न झाल्यास दिलेली ‘लक्ष्मी’ परत मिळणार नाही, या विवंचनेत अनेकांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTransferबदली