शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

राज्यात प्रशासकीय बदल्यांचा मुहूृर्त केव्हा ? अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाच्या नव्या आदेशाची प्रतीक्षा

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2024 16:16 IST

Nagpur : सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाच्या ३९ विभागातील हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीयबदल्या रखडल्या आहेत. त्यामुळे या प्रशासकीय बदल्यांचा मुहूर्त केव्हा ? असा सवाल बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा आहे. किंबहुना सप्टेंबरमहिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत असून यंदा प्रशासकीय बदल्या होणार की नाही, याबाबत चित्रअस्पष्ट आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात; मात्र यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबविले नाही; मात्र राज्य शासनाकडून बदली संदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा विभागप्रमुखांना आहे. त्याशिवाय यंदा प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणे अशक्य आहे.

निवडणुका आटोपल्या तरीही सामान्य प्रशासनाकडून चालढकललोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर ६ जून रोजी निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या होतील, असे चित्र हाेते. दरम्यान, मुंबई, कोकण व नाशिक पदवीधर, शिक्षक मतदारसंघात निवडणूक असल्याने बदलीस पात्र हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांना ब्रेक लागला. आता निवडणुका आटोपल्या असताना प्रशासकीय बदल्यांकरिता नवे आदेश निर्गमित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग चालढकल करीत असल्याचे वास्तव आहे.

३१ हजार प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी वेटिंगवरसामान्य प्रशासन विभागाने अद्यापही बदली करण्यासंदर्भात आदेश जारी केले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाच्या ३९ विभागांतील बदलीस पात्र सुमारे ३१ हजार अधिकारी व कर्मचारी वेटिंगवर आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागातील कर्मचारी कधी बदली होणार याकडे नजरा लावून आहेत, तर ज्यांना मलाईदार जागा हव्यात अशा महसूल, कृषी, परिवहन, वनविभाग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मंत्रालयातील पायऱ्या झिजवत आहेत. काहींनी मोक्याच्या जागांसाठी ‘सौदे’देखील केले आहेत. त्यामुळे यंदा बदली न झाल्यास दिलेली ‘लक्ष्मी’ परत मिळणार नाही, या विवंचनेत अनेकांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTransferबदली