शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रशासकीय बदल्यांचा मुहूृर्त केव्हा ? अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाच्या नव्या आदेशाची प्रतीक्षा

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2024 16:16 IST

Nagpur : सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाच्या ३९ विभागातील हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीयबदल्या रखडल्या आहेत. त्यामुळे या प्रशासकीय बदल्यांचा मुहूर्त केव्हा ? असा सवाल बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा आहे. किंबहुना सप्टेंबरमहिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत असून यंदा प्रशासकीय बदल्या होणार की नाही, याबाबत चित्रअस्पष्ट आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात; मात्र यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबविले नाही; मात्र राज्य शासनाकडून बदली संदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा विभागप्रमुखांना आहे. त्याशिवाय यंदा प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणे अशक्य आहे.

निवडणुका आटोपल्या तरीही सामान्य प्रशासनाकडून चालढकललोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर ६ जून रोजी निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या होतील, असे चित्र हाेते. दरम्यान, मुंबई, कोकण व नाशिक पदवीधर, शिक्षक मतदारसंघात निवडणूक असल्याने बदलीस पात्र हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांना ब्रेक लागला. आता निवडणुका आटोपल्या असताना प्रशासकीय बदल्यांकरिता नवे आदेश निर्गमित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग चालढकल करीत असल्याचे वास्तव आहे.

३१ हजार प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी वेटिंगवरसामान्य प्रशासन विभागाने अद्यापही बदली करण्यासंदर्भात आदेश जारी केले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाच्या ३९ विभागांतील बदलीस पात्र सुमारे ३१ हजार अधिकारी व कर्मचारी वेटिंगवर आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागातील कर्मचारी कधी बदली होणार याकडे नजरा लावून आहेत, तर ज्यांना मलाईदार जागा हव्यात अशा महसूल, कृषी, परिवहन, वनविभाग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मंत्रालयातील पायऱ्या झिजवत आहेत. काहींनी मोक्याच्या जागांसाठी ‘सौदे’देखील केले आहेत. त्यामुळे यंदा बदली न झाल्यास दिलेली ‘लक्ष्मी’ परत मिळणार नाही, या विवंचनेत अनेकांची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTransferबदली