शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

अवकाळीची मदत केव्हा?

By admin | Updated: May 26, 2015 00:27 IST

राज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानी तसेच शेतीपिकांचे नुकसान ...

घोषणा फसवी : १३ एप्रिलच्या निर्णयाची अंमलबजावणीच नाहीगजानन मोहोड अमरावतीराज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानी तसेच शेतीपिकांचे नुकसान यासाठी विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिल रोजी घेतला. मात्र, ४२ दिवसानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने जिल्ह्यातील ६ हजार १२१ हेक्टर बाधित क्षेत्र मदतीपासून वंचित आहे. गतवर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी उद्ध्वस्त झाला. रबीवर शेतकऱ्यांची आशा असताना २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे हा हंगाम बाधित झाला. या वेळच्या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे २ जण दगावले, तर १२ जण जखमी झाले. ४२ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांच्या आत व ६ हजार १२१ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. १३ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यामधील शेतकऱ्यांना शासनाची सवलत व मदत अजुनही मिळालेली नाही. यावर्षीचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. शासकीय मदत नसल्याने बी-बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतपिके, फळपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शासन निर्णयानुसार मदत मिळणार आहे. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रुपये व बहुवार्षिक फळपिकांकरिता किमान मर्यादा १५०० रुपये राहणार आहे. कोरडवाहू पिकांकरिता १० हजार प्रतिहेक्टर, सिंचनाखालील पिकांकरिता १५ हजार रुपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांकरिता २५ हजार रुपये प्रतिहेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीकरिता २० हजार रुपये प्रतिहेक्टर, २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने केली नसल्याने मदतीची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. चार बाधित तालुक्यांत मदत केव्हा?जिल्ह्यात अवकाळी पावसाने अमरावती, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यांतील ४८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने हे चार बाधित तालुके मदतीपासून वंचित राहिले आहेत.कर्जपुनर्गठन, व्याज, वीज बिल माफीचा निर्णय फसवाशासनाच्या १३ एप्रिलच्या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, तीन महिन्यांच्या कालावधीमधील कर्जावरील व्याजमाफी, वीजबिल माफी, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. ४२ दिवसांपासून अंमलबजावणी नसल्याने मदतीची घोषणा फसवी ठरली आहे. मृतांंचे वारस, जखमींना मदत केव्हा? अवकाळीने बाधित ४९६ गावांमध्ये जीवित हानीदेखील झाली आहे. भातकुली तालुक्यात वीज पडून २ व्यक्ती मृत झाल्या. दर्यापूर ते चांदूररेल्वे तालुक्यात घराची भिंत अंगावर पडून १२ व्यक्ती जखमी झाला होत्या. मृतांंच्या वारसांना व जखमींपर्यंत अंमलबजावणीअभावी मदत पोहोचलेली नाही.