शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीची मदत केव्हा?

By admin | Updated: May 26, 2015 00:27 IST

राज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानी तसेच शेतीपिकांचे नुकसान ...

घोषणा फसवी : १३ एप्रिलच्या निर्णयाची अंमलबजावणीच नाहीगजानन मोहोड अमरावतीराज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानी तसेच शेतीपिकांचे नुकसान यासाठी विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिल रोजी घेतला. मात्र, ४२ दिवसानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने जिल्ह्यातील ६ हजार १२१ हेक्टर बाधित क्षेत्र मदतीपासून वंचित आहे. गतवर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी उद्ध्वस्त झाला. रबीवर शेतकऱ्यांची आशा असताना २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे हा हंगाम बाधित झाला. या वेळच्या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे २ जण दगावले, तर १२ जण जखमी झाले. ४२ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांच्या आत व ६ हजार १२१ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. १३ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यामधील शेतकऱ्यांना शासनाची सवलत व मदत अजुनही मिळालेली नाही. यावर्षीचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. शासकीय मदत नसल्याने बी-बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतपिके, फळपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शासन निर्णयानुसार मदत मिळणार आहे. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रुपये व बहुवार्षिक फळपिकांकरिता किमान मर्यादा १५०० रुपये राहणार आहे. कोरडवाहू पिकांकरिता १० हजार प्रतिहेक्टर, सिंचनाखालील पिकांकरिता १५ हजार रुपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांकरिता २५ हजार रुपये प्रतिहेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीकरिता २० हजार रुपये प्रतिहेक्टर, २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने केली नसल्याने मदतीची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. चार बाधित तालुक्यांत मदत केव्हा?जिल्ह्यात अवकाळी पावसाने अमरावती, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यांतील ४८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने हे चार बाधित तालुके मदतीपासून वंचित राहिले आहेत.कर्जपुनर्गठन, व्याज, वीज बिल माफीचा निर्णय फसवाशासनाच्या १३ एप्रिलच्या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, तीन महिन्यांच्या कालावधीमधील कर्जावरील व्याजमाफी, वीजबिल माफी, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. ४२ दिवसांपासून अंमलबजावणी नसल्याने मदतीची घोषणा फसवी ठरली आहे. मृतांंचे वारस, जखमींना मदत केव्हा? अवकाळीने बाधित ४९६ गावांमध्ये जीवित हानीदेखील झाली आहे. भातकुली तालुक्यात वीज पडून २ व्यक्ती मृत झाल्या. दर्यापूर ते चांदूररेल्वे तालुक्यात घराची भिंत अंगावर पडून १२ व्यक्ती जखमी झाला होत्या. मृतांंच्या वारसांना व जखमींपर्यंत अंमलबजावणीअभावी मदत पोहोचलेली नाही.