शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

अवकाळीची मदत केव्हा?

By admin | Updated: May 26, 2015 00:27 IST

राज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानी तसेच शेतीपिकांचे नुकसान ...

घोषणा फसवी : १३ एप्रिलच्या निर्णयाची अंमलबजावणीच नाहीगजानन मोहोड अमरावतीराज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानी तसेच शेतीपिकांचे नुकसान यासाठी विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिल रोजी घेतला. मात्र, ४२ दिवसानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने जिल्ह्यातील ६ हजार १२१ हेक्टर बाधित क्षेत्र मदतीपासून वंचित आहे. गतवर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी उद्ध्वस्त झाला. रबीवर शेतकऱ्यांची आशा असताना २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे हा हंगाम बाधित झाला. या वेळच्या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे २ जण दगावले, तर १२ जण जखमी झाले. ४२ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांच्या आत व ६ हजार १२१ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. १३ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यामधील शेतकऱ्यांना शासनाची सवलत व मदत अजुनही मिळालेली नाही. यावर्षीचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. शासकीय मदत नसल्याने बी-बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतपिके, फळपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शासन निर्णयानुसार मदत मिळणार आहे. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रुपये व बहुवार्षिक फळपिकांकरिता किमान मर्यादा १५०० रुपये राहणार आहे. कोरडवाहू पिकांकरिता १० हजार प्रतिहेक्टर, सिंचनाखालील पिकांकरिता १५ हजार रुपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांकरिता २५ हजार रुपये प्रतिहेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीकरिता २० हजार रुपये प्रतिहेक्टर, २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने केली नसल्याने मदतीची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. चार बाधित तालुक्यांत मदत केव्हा?जिल्ह्यात अवकाळी पावसाने अमरावती, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यांतील ४८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने हे चार बाधित तालुके मदतीपासून वंचित राहिले आहेत.कर्जपुनर्गठन, व्याज, वीज बिल माफीचा निर्णय फसवाशासनाच्या १३ एप्रिलच्या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, तीन महिन्यांच्या कालावधीमधील कर्जावरील व्याजमाफी, वीजबिल माफी, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. ४२ दिवसांपासून अंमलबजावणी नसल्याने मदतीची घोषणा फसवी ठरली आहे. मृतांंचे वारस, जखमींना मदत केव्हा? अवकाळीने बाधित ४९६ गावांमध्ये जीवित हानीदेखील झाली आहे. भातकुली तालुक्यात वीज पडून २ व्यक्ती मृत झाल्या. दर्यापूर ते चांदूररेल्वे तालुक्यात घराची भिंत अंगावर पडून १२ व्यक्ती जखमी झाला होत्या. मृतांंच्या वारसांना व जखमींपर्यंत अंमलबजावणीअभावी मदत पोहोचलेली नाही.