शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

महापालिकेत वीज बचतीचे आॅडिट केव्हा?

By admin | Updated: December 7, 2014 22:43 IST

महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी

अमरावती : महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात प्रकाश विभाग माघारला असून वीजतंत्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याचे चित्र आहे.आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त विनायक औगड यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजांचे मूल्याकंन करण्यासह त्यांनी वेळेवर कार्यालयात पोहचून नागरिकांची कामे ही निर्धारित वेळेत करावी, यासाठी हजेरी ही बायोमॅट्रिक्स प्रणाली लागू केली आहे. मात्र प्रकाश विभागाचे कर्मचारी, वीजतंत्री हे एकदा कार्यालयात पोहचून बॉयोमॅट्रिक्सने थबींग केले की, त्यानंतर गायब होतात. वीजतंत्रीच्या कामकाजाचे मूल्याकंन करणारी यंत्रणा नसल्यामुळे त्यांचा कारभार हा मर्जीनुसारच सुरु आहे. महापालिकेत सुमारे १० वीजतंत्री असून प्रत्येकाला ४० हजार रुपये वेतन आहे. परंतु त्यांच्याकडे कामकाजाची जबाबदारी काय? हे अभियंते देखील सांगू शकत नाही. महावितरणने पथदिवे चालू- बंद करण्याची जबाबदारी झटकण्याचा पवित्रा घेतला असला तरी ही जबाबदारी महापालिका आयुक्तांनी महावितरणवरच सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. वीज देयकांवर नियंत्रण करण्यासाठी पथदिव्यांवर अनावश्यक जास्त क्षमतेचे दिवे काढून त्या जागी कमी प्रकाश क्षमतेचे दिवे लावून वीजेचे आॅडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रकाश विभागाने वीज बचतीचे आॅडीट करण्याच्या या निर्णयाला बगल दिली. याउलट वीजेच्या देयकांची रक्कम वाढतच चालली आहे. पथदिवे चालू- बंद करण्याचा कालावधी निश्चित नसल्यामुळे महावितरणचे कर्मचारी त्यांच्या मर्जीनुसार पथदिवे चालू- बंद करतात. परिणामी वीजेचा अनावश्यक वापर होत असल्याचे वास्तव आहे. पथदिवे चालू- बंद करण्यावर वीज तंत्रीनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र त्यांची वेळकाढू भूमिका असल्याने वीजेचे देयके दरमहिन्याला वाढतच आहे. काही भागातील सकाळी १० वाजेपर्यंत पथदिव्यांवरील दिवे बंद केले जात नाही. याचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागत आहे. ज्या पथदिव्यावर दिवे आवश्यक आहेत, त्या पथदिव्यांवर दिवे नसल्याची ओरड स्वत: नगरसेवकांची आहे. वारंवार तक्रारे नोंदवून देखील त्या पथदिव्यांवर दिवे लावण्याची जबाबदारी वीजतंत्री घेत नाहीत, असा आरोप अनेक सदस्यांच्या आहे. प्रकाश विभागाचे प्रमुख असलेले उपअभियंता अशोक देशमुख यांचा विभागावर अंकुश नसल्याचे दिसून येते. सकाळी कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्सने हजेरी नोंदविली की, त्यानंतर शेवटी जाण्याच्या वेळेतच कार्यालयात ते दाखल होतात. प्रकाश विभागाचे कर्मचारी दिवसभर कुठे गायब होतात? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)