शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत वीज बचतीचे आॅडिट केव्हा?

By admin | Updated: December 7, 2014 22:43 IST

महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी

अमरावती : महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात प्रकाश विभाग माघारला असून वीजतंत्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याचे चित्र आहे.आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त विनायक औगड यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजांचे मूल्याकंन करण्यासह त्यांनी वेळेवर कार्यालयात पोहचून नागरिकांची कामे ही निर्धारित वेळेत करावी, यासाठी हजेरी ही बायोमॅट्रिक्स प्रणाली लागू केली आहे. मात्र प्रकाश विभागाचे कर्मचारी, वीजतंत्री हे एकदा कार्यालयात पोहचून बॉयोमॅट्रिक्सने थबींग केले की, त्यानंतर गायब होतात. वीजतंत्रीच्या कामकाजाचे मूल्याकंन करणारी यंत्रणा नसल्यामुळे त्यांचा कारभार हा मर्जीनुसारच सुरु आहे. महापालिकेत सुमारे १० वीजतंत्री असून प्रत्येकाला ४० हजार रुपये वेतन आहे. परंतु त्यांच्याकडे कामकाजाची जबाबदारी काय? हे अभियंते देखील सांगू शकत नाही. महावितरणने पथदिवे चालू- बंद करण्याची जबाबदारी झटकण्याचा पवित्रा घेतला असला तरी ही जबाबदारी महापालिका आयुक्तांनी महावितरणवरच सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. वीज देयकांवर नियंत्रण करण्यासाठी पथदिव्यांवर अनावश्यक जास्त क्षमतेचे दिवे काढून त्या जागी कमी प्रकाश क्षमतेचे दिवे लावून वीजेचे आॅडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रकाश विभागाने वीज बचतीचे आॅडीट करण्याच्या या निर्णयाला बगल दिली. याउलट वीजेच्या देयकांची रक्कम वाढतच चालली आहे. पथदिवे चालू- बंद करण्याचा कालावधी निश्चित नसल्यामुळे महावितरणचे कर्मचारी त्यांच्या मर्जीनुसार पथदिवे चालू- बंद करतात. परिणामी वीजेचा अनावश्यक वापर होत असल्याचे वास्तव आहे. पथदिवे चालू- बंद करण्यावर वीज तंत्रीनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र त्यांची वेळकाढू भूमिका असल्याने वीजेचे देयके दरमहिन्याला वाढतच आहे. काही भागातील सकाळी १० वाजेपर्यंत पथदिव्यांवरील दिवे बंद केले जात नाही. याचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागत आहे. ज्या पथदिव्यावर दिवे आवश्यक आहेत, त्या पथदिव्यांवर दिवे नसल्याची ओरड स्वत: नगरसेवकांची आहे. वारंवार तक्रारे नोंदवून देखील त्या पथदिव्यांवर दिवे लावण्याची जबाबदारी वीजतंत्री घेत नाहीत, असा आरोप अनेक सदस्यांच्या आहे. प्रकाश विभागाचे प्रमुख असलेले उपअभियंता अशोक देशमुख यांचा विभागावर अंकुश नसल्याचे दिसून येते. सकाळी कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्सने हजेरी नोंदविली की, त्यानंतर शेवटी जाण्याच्या वेळेतच कार्यालयात ते दाखल होतात. प्रकाश विभागाचे कर्मचारी दिवसभर कुठे गायब होतात? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)