शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत वीज बचतीचे आॅडिट केव्हा?

By admin | Updated: December 7, 2014 22:43 IST

महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी

अमरावती : महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात प्रकाश विभाग माघारला असून वीजतंत्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याचे चित्र आहे.आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त विनायक औगड यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजांचे मूल्याकंन करण्यासह त्यांनी वेळेवर कार्यालयात पोहचून नागरिकांची कामे ही निर्धारित वेळेत करावी, यासाठी हजेरी ही बायोमॅट्रिक्स प्रणाली लागू केली आहे. मात्र प्रकाश विभागाचे कर्मचारी, वीजतंत्री हे एकदा कार्यालयात पोहचून बॉयोमॅट्रिक्सने थबींग केले की, त्यानंतर गायब होतात. वीजतंत्रीच्या कामकाजाचे मूल्याकंन करणारी यंत्रणा नसल्यामुळे त्यांचा कारभार हा मर्जीनुसारच सुरु आहे. महापालिकेत सुमारे १० वीजतंत्री असून प्रत्येकाला ४० हजार रुपये वेतन आहे. परंतु त्यांच्याकडे कामकाजाची जबाबदारी काय? हे अभियंते देखील सांगू शकत नाही. महावितरणने पथदिवे चालू- बंद करण्याची जबाबदारी झटकण्याचा पवित्रा घेतला असला तरी ही जबाबदारी महापालिका आयुक्तांनी महावितरणवरच सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. वीज देयकांवर नियंत्रण करण्यासाठी पथदिव्यांवर अनावश्यक जास्त क्षमतेचे दिवे काढून त्या जागी कमी प्रकाश क्षमतेचे दिवे लावून वीजेचे आॅडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रकाश विभागाने वीज बचतीचे आॅडीट करण्याच्या या निर्णयाला बगल दिली. याउलट वीजेच्या देयकांची रक्कम वाढतच चालली आहे. पथदिवे चालू- बंद करण्याचा कालावधी निश्चित नसल्यामुळे महावितरणचे कर्मचारी त्यांच्या मर्जीनुसार पथदिवे चालू- बंद करतात. परिणामी वीजेचा अनावश्यक वापर होत असल्याचे वास्तव आहे. पथदिवे चालू- बंद करण्यावर वीज तंत्रीनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र त्यांची वेळकाढू भूमिका असल्याने वीजेचे देयके दरमहिन्याला वाढतच आहे. काही भागातील सकाळी १० वाजेपर्यंत पथदिव्यांवरील दिवे बंद केले जात नाही. याचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागत आहे. ज्या पथदिव्यावर दिवे आवश्यक आहेत, त्या पथदिव्यांवर दिवे नसल्याची ओरड स्वत: नगरसेवकांची आहे. वारंवार तक्रारे नोंदवून देखील त्या पथदिव्यांवर दिवे लावण्याची जबाबदारी वीजतंत्री घेत नाहीत, असा आरोप अनेक सदस्यांच्या आहे. प्रकाश विभागाचे प्रमुख असलेले उपअभियंता अशोक देशमुख यांचा विभागावर अंकुश नसल्याचे दिसून येते. सकाळी कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्सने हजेरी नोंदविली की, त्यानंतर शेवटी जाण्याच्या वेळेतच कार्यालयात ते दाखल होतात. प्रकाश विभागाचे कर्मचारी दिवसभर कुठे गायब होतात? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)