शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर जिल्हा निर्मितीची स्वप्नपूर्ती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:22 IST

अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी गत तीन वर्षांपासून शासनदरबारी कागदावर फिरत आहे. लोकप्रतिनिधींच्या या महत्त्वपूर्ण मागणीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. राज्य विधिमंडळाचे नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात अचलपूर जिल्हा निर्मितीबाबत आ. बच्चू कडू हे आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनात तापणार मुद्दा : फाईल तीन वर्षांपासून अडकली लालफीतशाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी गत तीन वर्षांपासून शासनदरबारी कागदावर फिरत आहे. लोकप्रतिनिधींच्या या महत्त्वपूर्ण मागणीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. राज्य विधिमंडळाचे नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात अचलपूर जिल्हा निर्मितीबाबत आ. बच्चू कडू हे आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.राज्यात अचलपूरसह १७ जिल्ह्यांचा प्रस्ताव काँग्रेसच्या कार्यकाळातील आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने अवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीदेखील गठित केली. या समितीने शासनाला अहवालसुद्धा सादर केला. मात्र, तीन वर्षांपासून या अहवालावर विद्यमान शासनकर्ते ‘ब्र’देखील काढत नसल्याची ओरड आहे.अचलपूर जिल्हा निर्मितीमागील हेतू, विकासात्मक दृष्ट्या मागासलेपण, पायाभूत, मूलभूत सुविधांचा अभाव अशा कारणांचा अंतर्भाव करण्यात आला होता. मात्र, शासनकर्ते बदलताच अचलपूर जिल्हा निर्मितीचा विषय मागे पडल्याचे चित्र आहे. नव्या अचलपूर जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावात चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सूर्जी, धारणी, चिखलदरा या तालुक्यांचा समावेश नव्या जिल्ह्यात करण्यात आला आहे तसेच चुर्णी व आसेगाव या दोन तालुक्यांचादेखील प्रस्ताव राहणार आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख त्यानंतर आ. बच्चू कडू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने अचलपुरात प्रशासकीय इमारतींसह आरोग्य, शिक्षण, सार्वत्रिक सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत. परंतु, नवीन जिल्हा निर्मितीनंतर प्रशासकीय खर्चाचा बोजा वाढणार असल्याच्या भीतीने राज्य शासन या महत्त्वाच्या विषयांना बगल देत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.अद्यापही अचलपूर जिल्हा निर्मितीचा विषय वेटिंगवर असल्याचे वास्तव आहे. यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा निर्मितीची घोषणा केली असली तरी लाखो नागरिकांच्या या स्वप्नाची पूर्तता कधी होणार, हे तूर्तास गुलदस्त्यात आहे.मुघल काळात अचलपूर होती राजधानीमुघल काळात अचलपूर हे राजधानीचे शहर होते. त्यावेळी एलिचपूर असे या शहराचे नाव होते. सीपी अँड बेरार प्रांत अस्तित्वात असतानादेखील अचलपूर जिल्हा होता. अचलपूर शहराला ऐतिहासिक, प्राचीन वारसा आहे. अचलपूर जिल्हा झाल्यास मेळघाटचे कुषोपण, बाल- माता मृत्यूवर नियंत्रण मिळविणे सुकर होईल. विदर्भातील काही मोजक्याच ‘अ’ वर्ग नगरपालिकांपैकी अचलपूर एक आहे. प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या जिल्हा निर्मितीसाठी सर्वच सुविधा अचलपूरला प्राप्त आहेत. केवळ जिल्हा निर्मितीची शासनाकडून घोषणा होणे बाकी आहे.नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण अद्यापही ठरले नाही. मात्र, धोरण ठरताच अचलपूरला प्राधान्य दिले जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आला आहे.- बच्चू कडूआमदार, अचलपूर