शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

जिल्हास्तरीय समित्यांना मुहूर्त केव्हा?

By admin | Updated: December 15, 2015 00:26 IST

तब्बल १५ वर्षांनंतर सत्तेत आलेले सेना-भाजप सरकारकडे डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांची आंतरिक मतभेद वाढले आहेत.

युतीत धुसफूस : निष्ठावंतांसह समर्थकांमध्ये कालवाकालवअमरावती : तब्बल १५ वर्षांनंतर सत्तेत आलेले सेना-भाजप सरकारकडे डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांची आंतरिक मतभेद वाढले आहेत. वर्षभरापासून जिल्हा आणि तालुकास्तरीय समितीत वर्णी न लागल्याने युतीतील धुसफूस वाढीस लागली आहे. शिवसेनेने दोन महिन्यांपूर्वी आपल्या समर्थकांची यादी संबंधिताना पाठविली. तथापि भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाकडून अद्यापही यादी निश्चित करण्यात न आल्याने युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. सरकार बदलले की महामंडळ आणि जिल्हास्तरीय समित्यांमध्ये आपल्या मागणांची वर्णी लावण्यासाठी या समित्यांची पुनर्रचना केली जाते. नव्या सरकारच्या कार्यकाळातील दुसऱ्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा उगवला असताना समित्या कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. यातच वाशीम जिल्ह्यातील जिल्हा आणि तालुका समित्यांवर युतीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याने इतर जिल्ह्यांतील इच्छुकांच्या आशेला धुमारे फुटले आहेत. सक्रिय व निष्ठावंतांसोबतच नवख्या कार्यकर्त्यांनी या समित्यांवर येण्यासाठी जोरदार 'फिल्डिंग' लावली आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेकडून यादीवर शिक्कामोतर्बजिल्हा शिवसेनेकडून समित्यांवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी कार्यकर्त्यांची यादी पाठविण्यात आली. जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांवर पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड यांनी ‘लोकमत’ ला दिली. तथापि काही लोक राहिलेत त्यांना सामावून घेण्यासाठी भाजपकडूनच याद्या थांबविण्यात आल्याची चर्चा अधिक आहे. सेनेच्या तुलनेत भाजपला अधिक प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी स्थानिक नेतृत्व आग्रही असल्याने समित्या रखडल्याचेही काही कार्यकर्ते सांगतात.७०:३० चा फॉर्म्युलाजिल्ह्यात शिवसेनेकडे खासदारांव्यतिरिक्त लोकप्रतिनिधीत्व नाही. त्यामुळे आपण सत्तेत सहभागी आहोत का, असा प्रश्न शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे. जिल्हा तथा तालुकास्तरीय समित्यांचा फॉर्म्युला उच्चस्तरावर ठरविण्यात आला. त्यानुसार भाजप मित्रपक्ष हा ७० टक्के तर शिवसेनेला ३० टक्के जागा मिळणार आहे, असे जाहीर करण्यात आले. जागा वाटपाचे आकडे जाहीर झाले. पण कार्यकर्त्यांची वर्णी अजूनही लागलेली नाही. पालकमंत्र्यांकडूनही जिल्हास्तरीय समित्यांवरील नियुक्त्या केल्या गेलेल्या नाहीत. या विषयावर कुणीही औपचारिकरीत्या बोलण्यास धजावत नसले, तरी शिवसेनेसोबत भाजप आणि रिपाइं कार्यकर्त्यांमधील तगमग वाढली आहे.कार्यकर्त्यांचे वर्ष प्रतीक्षेत गेले१५ वर्षांनंतर सत्तेत आलेल्या युतीच्या कार्यकर्त्यांना महामंडळ नाही तर किमान जिल्हास्तरीय समिती मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र अख्खे वर्ष कार्यकर्त्यांनी प्रतीक्षेतच घालवले. आता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने अन्य कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे. तथापि शिवसेनेच्या तुलनेत भाजपमध्ये अधिक सुंदोपसुंदी असल्याने त्यांच्याच याद्यांवर शेवटचा हात फिरवला गेलेला नाही. त्यामुळे सेनाही अडकली आहे.