शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:35 IST

शहरातील काही हॉटेलमध्ये नागरिकांना दूषित पाणी देण्यात येते.

ठळक मुद्देएफडीए झोपेत : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील काही हॉटेलमध्ये नागरिकांना दूषित पाणी देण्यात येते. यावर कुणाचेही नियंत्रण नसून एफडीएने विशेष मोहीम राबवून पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यास दूषित पाणी नमुन्यांचे सत्य बाहेर निघेल. दूषित पाण्यातून अनेक प्रकारचे जलजन्य आजार होत असून पाणी नमुन्यांची तपासणी केव्हा, असा प्रश्न निर्माण होत आहे.शहरात शेकडो हॉटेल आहेत. पण काही हॉटेलमध्ये आरो लावलेले नाहीत. अन्न व प्रशासन विभागाच्यावतीने नेहमीत पाणी नमुने घेण्यात येत नाही. पावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने कावीळ, कॉलेरा, टायफाईड, अतिसार व इतर आजार होण्याची शक्यता बळावते. जिल्हाभरातून जुलै महिन्यात १२७० पाणी नमुने तपासणासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत आले होते. यापैकी १५२ नमुन्यांमध्ये कॉलोफार्म बॅक्टरीयाचे प्रमाण आढळून आले होते. हा जिवाणू जलजन्य आजार होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे हॉटेल चहाच्या कँटीनसमध्येही पाणी बाहेरून आणण्यात येते. या ठिकाणी योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे हे पाणी ग्राहकांच्या पिण्यात आल्याने यातून जलजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवावे व सदर नमुने सदोष आढळल्यास त्या हॉटेलचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. हॉटेल चालकाला जेव्हा महापालिकेकडून किंवा एफडीए विभागाकडून परवाना मिळतो, त्या परवान्यातच हॉटेल चालकांनी पाणी नमुन्यांची तपासणी करून घ्यावी व सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून तसे प्रमाणपत्र मिळवून घ्यावे, अशी तरतूद आहे. पण अनेक हॉटेलचालक प्रत्येक वस्तुंचे दामदुप्पट दर घेतात. मात्र नागरिकांना पाहिजे तशा सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना याठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे व दूषित पाण्यामुळे आजार मोफत मिळतात. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाºयांनी पाणी नमुने तपासणीची विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यताज्या पिण्याच्या पाण्यात कॉलिफार्म बॅक्टेरीया पॉझिटिव्ह आढळतो, ते पाणी नमुने दूषित मानले जातात. अनेक हॉटेल्समध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भात कुठलीही काळजी घेतली जात नाही. पिण्याच्या पाण्याचे ग्लास अस्वच्छ जागेवर ठेवले जातात. हॉटेल्समध्ये बोरवलचे किंवा विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे या पाण्यात जर कॉलिफार्म बॅक्टेरीया असेल तर जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेनेसुद्धा पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले पाहिजे, अशी मागणी काही जागरुक नागरिकांनी केली आहे.