शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तूर बेभाव, नाफेडची खरेदी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:16 IST

यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत.

ठळक मुद्देहंगामाला सुरुवात : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

रोशन कडू ।आॅनलाईन लोकमततिवसा : यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकºयांच्या कोट्यवधींची तूर मातीमोल दराने व्यापाºयांकडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.यंदाच्या तुरीच्या हंगामात तिवसा तालुक्यात ५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होता. शेतकºयांच्या तुरी बाजारात विक्रीसाठी आलेल्या असतानाही शासनाकडून शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाही. नाइलाजाने शेतकºयांना खासगी व्यापाºयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. हमीभावपेक्षा ९०० रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने तुरीची विक्री करावी लागत आहे. शेतकºयांना बसणारा आर्थिक फटका रोखण्यासाठी तत्काळ शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.तालुक्यात मागील आठ दिवसांपासून तुरीची काढणी सुरू झाली अहे. मात्र, हमीभाव ५४५० असताना खासगी व्यापाºयांकडून केवळ ४५०० रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तत्काळ केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.९०० रुपयांपेक्षा अधिक फरकाने खरेदीतालुक्यातील मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची लागवड झालेली होती. तुरीची काढणी मागील आठ दिवसांपासून सुरू झाली आहे. हमीभाव साडेपाच हजार असताना खासगी व्यापाºयांकडून साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे.दवाळामुळे तुरीचे संपूर्ण पीक वाळलेटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकºयांचे तुरीचे पीक दवाळामुळे वाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन आठवड्यांपासून थंडीचा प्रकोप सुरू असल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील तूर अवेळी वाळली. अशा पिकांचे पंचनामे करून आर्र्थिक मदतीची मागणी होत आहे. तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकरी श्रीनिवास हरिभाऊ काळे यांच्यासह अंबादास काळे, अनसूयाबाई काळे, प्रकाश चांदूरकर, राजेश बंड, मोहन तेलखडे, विनायक जुनघरे, बाळासाहेब भोंडे, अशोक भोडेसह परिसरातील अन्य शेतकºयांचे तूर पिकावर दव गेल्याने हातातोंडाशी आलेले पीक सुकले आहे. या नुकसानामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या संबंधित विभागाने नुकसानाचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.