शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तूर बेभाव, नाफेडची खरेदी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:16 IST

यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत.

ठळक मुद्देहंगामाला सुरुवात : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

रोशन कडू ।आॅनलाईन लोकमततिवसा : यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकºयांच्या कोट्यवधींची तूर मातीमोल दराने व्यापाºयांकडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.यंदाच्या तुरीच्या हंगामात तिवसा तालुक्यात ५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होता. शेतकºयांच्या तुरी बाजारात विक्रीसाठी आलेल्या असतानाही शासनाकडून शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाही. नाइलाजाने शेतकºयांना खासगी व्यापाºयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. हमीभावपेक्षा ९०० रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने तुरीची विक्री करावी लागत आहे. शेतकºयांना बसणारा आर्थिक फटका रोखण्यासाठी तत्काळ शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.तालुक्यात मागील आठ दिवसांपासून तुरीची काढणी सुरू झाली अहे. मात्र, हमीभाव ५४५० असताना खासगी व्यापाºयांकडून केवळ ४५०० रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तत्काळ केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.९०० रुपयांपेक्षा अधिक फरकाने खरेदीतालुक्यातील मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची लागवड झालेली होती. तुरीची काढणी मागील आठ दिवसांपासून सुरू झाली आहे. हमीभाव साडेपाच हजार असताना खासगी व्यापाºयांकडून साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे.दवाळामुळे तुरीचे संपूर्ण पीक वाळलेटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकºयांचे तुरीचे पीक दवाळामुळे वाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन आठवड्यांपासून थंडीचा प्रकोप सुरू असल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील तूर अवेळी वाळली. अशा पिकांचे पंचनामे करून आर्र्थिक मदतीची मागणी होत आहे. तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकरी श्रीनिवास हरिभाऊ काळे यांच्यासह अंबादास काळे, अनसूयाबाई काळे, प्रकाश चांदूरकर, राजेश बंड, मोहन तेलखडे, विनायक जुनघरे, बाळासाहेब भोंडे, अशोक भोडेसह परिसरातील अन्य शेतकºयांचे तूर पिकावर दव गेल्याने हातातोंडाशी आलेले पीक सुकले आहे. या नुकसानामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या संबंधित विभागाने नुकसानाचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.