शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

अतिक्रमणातून मोकळा श्वास कधी ?

By admin | Updated: December 28, 2016 01:45 IST

राजकमल, जयस्तंभ, गांधी, सरोज, चित्रा, इतवारा येथील उद्योग वर्गाच्या इमारती अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत.

दुकानासमोरील जागा भाड्याने : अनेकांना धनलाभ, महापालिकेसह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष अमरावती : राजकमल, जयस्तंभ, गांधी, सरोज, चित्रा, इतवारा येथील उद्योग वर्गाच्या इमारती अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत. अनेक बड्या प्रतिष्ठानधारकांनी स्वमालकीचा दुकानासमोरील जागा चक्क भाड्याने दिल्या असून अनेकांना यातून धनलाभ होत आहे. या अतिक्रमणाकडे महापालिकेसह शहर वाहतूक शाखेने दुर्लक्ष चालविले आहे. आज एकीकडे मध्यवस्तीतील हा परिसर विकसित म्हणून ओळखल्या जातो. तरी या प्रभागात वाढते अतिक्रमण ही समस्या दिवसागणिक गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे परिसराची अवस्था वाईट होत चालली आहे. शहराचे मुख्य बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या भागात भरमसाठ व्यावसायिक संकुले उभी राहली, तथापि पार्किंगची सुविधा न ठेवल्याने वाहनांच्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजकमल, चित्रा, सरोज, अंबादेवी रोड, बडनेरा रस्ता, राजापेठ, नमुना या भागात अनधिकृत पार्किंग समस्या वाढत चालली आहे. वाढत्या अतिक्रमणाने रस्ते अरुंद बनलेत. सरोज चौकातून जवाहर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची भलीमोठी पार्किंग लागत असल्याने या रस्त्याने पादचाऱ्याने चालावे तरी कसे? असे चित्र आहे. या परिसरात सध्या अनेक नवे बांधकाम सुरु असून पार्किंगसाठी मात्र जागाच सोडली नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने त्याची दखल घेणे गरजेचे आहे. पण पालिका या प्रश्नाकडे लक्ष देतान दिसत नाही. शहराची या हृदयस्थानी वाहनांच्या संख्येसोबतच अनधिकृ पार्किंग आणि फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे काम झाल्याने इमारतीही वाढल्या. मात्र रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. (प्रतिनिधी) रघुवीरमुळे वाहतूक कोंडी श्याम चौकातील रघुवीरसमोर चारचाकी वाहनांची भलीमोठी पार्किंग लागत असल्याने या मार्गावर रोज दुपारी - संध्याकाळी ‘जाम’ लागतो. रघुवीरची पार्किंग व्यवस्था टॉकीजच्या आता असताना बिनबोभाटपणे रस्त्यावर वाहने लावण्याच्या सूचना रघुवीरकडून केल्या जातात. पालिका प्रशासन मात्र रघुवीरबाबत मौन धारण करून आहे. हॉटेल्सचे पार्किंग बेपत्ता राजकमल चौकात नव्याने दोन हॉटेल्स लागली आहेत. मात्र या दोन्ही हॉटेल्सकडे पार्किंग व्यवस्थाही ग्राहकांसह तेथील मालक, कर्मचाऱ्यांच्या वाहने भररस्त्यावर उभी केली जातात. मात्र या हॉटेलधारकांना नोटीस बजावण्याचे सौजन्य पालिकेला दाखविता आलेली नाही.