शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

देवमाळीच्या गणेश मंगलम्वर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:48 IST

परतवाडा नजीकच्या देवमाळी ग्रामसभेत येथील गणेश मंगल कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवत ते बंद करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी सर्वानुमते घेण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा ठराव : जिल्हाधिकाºयांना निवेदन, रहिवासी भागातील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतवाडा नजीकच्या देवमाळी ग्रामसभेत येथील गणेश मंगल कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवत ते बंद करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी सर्वानुमते घेण्यात आला. मात्र, वारंवार स्मरणपत्रे व जिल्हाधिकाºयांचा आदेश असतानासुद्धा अद्याप कारवाई झाली नाही. रहिवासी भागात असलेल्या या मंगल कार्यालयाचे बांधकाम अवैध आहे.गणेश मंगल कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव १० फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या तहकूब ग्रामसभेत विषय क्रमांक ९ नुसार घेण्यात आला होता. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी गौरीनंदन काथेकर होते. सभेला सरपंच विद्या चौधरी, अचलपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश सरोदे, ईश्वरदास सातंगे, विनायक किचंबरे, ग्रामसचिव रमेश कावडकर आदी उपस्थित होते. ग्रामसभेला उपस्थित असलेल्या अनेकांनी मंगल कार्यालयासंदर्भात अनेक आक्षेप नोंदविले. अखेर आवाजी मतदानाने हे मंगल कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला.ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३ (२-अ) नुसार जिल्हाधिकाºयांकडे कार्यवाहीच्या परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आला. वारंवार स्मरणपत्र पाठविल्यावर यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने याची तक्रार थेट राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना २६ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आली. यानंतर १९ मे २०१७ रोजी ४५ हून अधिक स्थानिकांनी स्वाक्षºया केलेले स्मरणपत्र पाठविण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी ५ जुलै रोजी कारवाईचे आदेश अचलपूर तहसीलदारांना दिले. तथापि, कोणतीही कार्यवाही झाली नाही. याप्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.आठ प्लॉट एकत्रगणेश मंगल कार्यालयासाठी प्लॉट क्रमांक १, २, ३, ४ व १९, २०, २१, २२ यांना एकत्र करून ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीच्या तिप्पट बांधकाम केले. वास्तविक, रहिवासी जागेचा व्यावसायिक कामासाठी नियमबाह्य वापर केला जात आहे. याशिवाय मंगल कार्यालयासाठी आवश्यक परवानगी घेतल्याची नोंद नाही, असे ग्रामपंचायतीच्या ठरावात नमूद आहे.मंगल कार्यालयावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. ती का केली जात नाही, हे समजण्यापलीकडे आहे. परिसरातील नागरिकांना हे सभागृह येथे नको आहे.- नरेंद्र राईकवार, नागरिकगणेश मंगलम्संदर्भात जिल्हाधिकाºयांचे पत्र मिळाले. अनधिकृत अकृषक जमिनीचा वापर केल्याप्रकरणी ५ एप्रिल २०१७ रोजी २८,६३१ रुपयांचा दंड ठोठावला आहे.- निर्भय जैन,तहसीलदार, अचलपूर 

नागरिकांना होतो त्रासमंगल कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी आहे, असा दावा संचालकांनी केला; मात्र रात्री उशिरापर्यंत चालणारे डीजे, ढोल, बँड, फटाके, आतषबाजी व रस्त्यावर वाहने पार्क करीत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. समारंभानंतर शिल्लक राहिलेल्या व शिळ्या अन्नाची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.