शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

बेकरी उत्पादनाची गुणवत्ता काय ?

By admin | Updated: October 3, 2016 00:07 IST

मनभरी उत्पादनाच्या चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढल्यामुळे मनभरीचा कारभार चव्हाट्यावर आला.

पालकमंत्री गप्प का ? : एफडीए केव्हा घेणार नमुने ?अमरावती : मनभरी उत्पादनाच्या चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढल्यामुळे मनभरीचा कारभार चव्हाट्यावर आला. चिवड्यात विषारी प्राणी आढळणाऱ्या मनभरीच्या बेकरी उत्पादनाची गुणवत्ता किती, असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे. मनभरीची नाना बेकरी उत्पादने बाजारात आहेत. या उत्पादनादरम्यान अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमांनुसार पाळाव्या लागणाऱ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते की नाही, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.मनभरी चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढळून आल्यानंतर मनभरीला अन्न व औषधी प्रशासनाने आजपर्यंतही अधिकृतरीत्या नोटीस बजावलेली नाही. एफडीएने मनभरीच्या उत्पादन केंद्रात भेट दिली. तपासणी केली. त्यादरम्यान रजिस्टरमध्ये त्यांनी नोंद केली. त्यात सर्व माल परत बोलवावा, असा शेरा लिहिला. त्यानंतर एफडीएने कारवाईचा शिकंजा हवा तसा आवळलेला नाही. बेकरीची मोठ्या प्रमाणात उत्पादने असताना आणि ती व्यापकरीत्या विकली जात असताना, एकाच ब्रँडच्या या अन्नप्रकाराचे नमुनेही एफडीएने घ्यायला हवे होते. सामान्य ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब उपयोगी ठरली असती. चिवड्याचे उत्पादन जी मंडळी करतात, तीच मंडळी बेकरी प्रोडक्टचेही निर्माते असल्यामुळे सदोषतेच्या शक्यतेची सुई ब्रेड, टोस्ट आदी अन्नप्रकारांकडेही वळतेच. आपण काय खातो, याबाबत सामान्यजन आता कमालीचे सतर्क झाले आहेत. मनभरीच्या सर्वच अन्नपदार्थांचे नमुने एफडीएने घ्यावे. रन्डमली ते घेत रहावे, अशी मागणी नागरिकांनी 'लोकमत'ला पाठविलेल्या पत्रांतून केली आहे. अमरावती जिल्ह्यात एफडीएचे अस्तित्त्व आहे की नाही, स्थिती इतकी खालावलेली आहे. आंब्यांमध्ये कार्बाईड, केळीत इथेनॉल, सफरचंदांना मेण, रघुवीरच्या कचोरीत अळी, शांती रिफ्रेशमेंटच्या कचोरीत गुटख्याचे पाऊच आणि हे सारे कमी झाले म्हणून की काय मनभरीच्या चिवड्यात चक्क पाल, असे चित्र शहरातील अन्नविषयक उत्पादनांच्या विक्रीचे आहे. सामान्यंच्या खाण्यात जहर कालवले जात असतानाही शासन शांत आहे. मनभरी, रघुवीरसारख्या ब्रँडवर जिल्ह्याचे पालकमंत्री कठोर कारवाई करतील काय, असा प्रश्न अमरावतीकरांचा आहे. (प्रतिनिधी)