शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

* कोणत्या भाजीपाल्याला किलोचा काय भाव:-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:15 IST

* कोणत्या भाजीपाल्याला किलोचा काय भाव:- भाजीपाला शेतकरी. ग्राहक वांगी . तीन रुपये ४० रुपये टोमॅटो. सात रुपये. २० ...

* कोणत्या भाजीपाल्याला किलोचा काय भाव:-

भाजीपाला शेतकरी. ग्राहक

वांगी . तीन रुपये ४० रुपये

टोमॅटो. सात रुपये. २० रुपये

भेंडी. पाच रुपये. ४० रुपये

चवळी. सात रुपये. ४० रुपये

पालक. पाच रुपये. ४० रुपये

मेथी. वीस रुपये. ६० रुपये

हिरवी मिरची. पंधरा रुपये. ६० रुपये

पत्ताकोबी. आठ रुपये. ३५ रुपये

फुल कोबी. सात रुपये. ४० रुपये

दोडके. सात रुपये. ४० रुपये

कोथिंबीर. आठ रुपये. ८० रुपये

* शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

कोट

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचे भाव कमालीचे गडगडले असून उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. हिरवी वांगी केवळ दोन ते तीन रुपये किलोप्रमाणे मोजून घ्यावी लागत आहेत. यात तोडाईचा खर्च, शेतापासून रोडपर्यंत वाहून नेण्याचा खर्च, कट्टे आणि बारदाना शेतकऱ्यालाच घ्यावा लागत आहे. उत्पादन खर्च तर सोडाच पण शेतकऱ्याला खिशातून खर्च करावा लागत आहे. जवलापूर, पथरोट परिसरात जवळपास पाचशे एकर हिरव्या वांगीची लागवड आहे. भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांनी वांग्याची तोडाई बंद केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातच ही वांगी सडत आहेत.

- आसिफ मोहम्मद, शेतकरी, पथ्रोट

कोट

स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला बाजारपेठेत विकताना त्याचे भाव अत्यल्प असते. २० किलो भेंडीचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जाते. ती भेंडी तोडायला २० च्या कितीतरी पट अधिक खर्च येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही यातून हाती लागत नाही. हिरवी मिरची १५ रुपये किलोनी मागितली जाते. १५ किलो मिरची तोडायला दोनशे रुपये खर्ची पडतात. काटा हमाली आणि कमिशन हे वेगळेच. कोथिंबीर, पालक, चवळी, दोडके यासह अन्य भाजीपाल्यांचीही तीच गत आहे.

- सुनील कडू, शेतकरी, जवळापूर

* ग्राहकांना परवडेना

कोट

शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात भाजीपाला खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांनी ग्राहकांना माफक दरात भाजीपाला उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. वीस रुपये पावाप्रमाणे कोथिंबीर घ्यावी लागते. ४० रुपये किलोच्या खाली कुठलीही भाजी ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे या महागड्या भाज्या हातमजुरी करणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या नाहीत.

- संजय वानखडे, ग्राहक, कांडली

कोट

बाजारात कडाडलेले भाज्यांचे भाव ग्राहकांना परवडणारे नाहीत. आलू वगळता कुठलाही भाजीपाला 20 रुपये किलोत ग्राहकांना मिळत नाही. बाजारात कांदा 30 ते 40 रुपये किलोच्या खाली नाही. हिरवा भाजीपाला ग्राहकांना 40 ते 60 रुपये किलो प्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. सामान्य ग्राहकांच्या हा भाजीपाला आवाक्याबाहेर आहे.

- विनोद इंगोले, ग्राहक परतवाडा

* भावात एवढा फरक का

कोट

मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात खरेदी नाही. अंगावर दिलेल्या भाजीपाल्याची वेळेत वसुली नाही. एक किंवा दीड दिवसानंतर शिळा भाजीपाला कुणी विकत घेत नाही. तो टाकून द्यावा लागतो. यातच बाहेरून येणारा भाजीपाला आहे. दरम्यान पावसामुळे भाजीपाल्याची गुणवत्ताही कमी अधिक होते. यामुळे शेतकरी ते ग्राहक यात भावात फरक दिसून येतो.

- दीपक चंदेल, व्यापारी अचलपूर