शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

मृगाच्या हत्तीने फिरविली पाठ आर्द्राचा मोर तारेल काय?

By admin | Updated: June 25, 2014 00:10 IST

पावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्र सुरू ठेवते.

सुरेश सवळे - चांदूरबाजारपावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्र सुरू ठेवते. यंदा मृग नक्षत्राच्या हत्ती या वाहनापासून ‘स्वाती’चा ‘घोडा’ या वाहनापर्यंत किमान पाऊस असल्याचा अंदाज यापूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाल्यानंतरही पावसाने जोर धरला नाही. मृग नक्षत्राच्या हत्तीने यावर्षी पाठ फिरविल्याने १५ दिवसात केवळ ३६.६६ मी.मी. पाऊस झाल्याने शेतकरी पार भांबावून गेला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्राचा मोर तारेल आणि पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या दोन दिवसात कोरडेच पडल्याने शेतकऱ्यांची पेरणी पार रखडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २२२ मी.मी. पाऊस कमी झाला आहे. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत २४८ मी.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र ३६.६६ मी.मी. वरच समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत तालुक्यात कापूस ५७४२ हेक्टर, सोयाबीन ८२७४ हेक्टर, तूर २७४१ हेक्टर, ज्वारी १४६ हेक्टर, मूग ५० हेक्टर, उडीद ३५ हेक्टर असे एकूण १६ हजार ९६८ हेक्टर जमिनीत खरिपाची पेरणी झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ९५ हेक्टर कपाशीची पेरणी झाली आहे.८ जूनला मृग नक्षत्र लागले. या नक्षत्रात सहसा पावसाचे आगमन सुनिश्चित समजल्या जाते. गत वर्षी मान्सून १० जूनलाच विदर्भात धडकला होता. हा पाऊस अनेक दिवस सक्रिय राहिल्याने जून महिन्यात तब्बल २४८ मी.मी. पाऊस बरसला. यावेळी २४ जूनपर्यंत केवळ ३६.६६ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने दांडी मारल्याने बळीराजाला सर्वाधिक चिंता लागली आहे. आणखी उशीर झाल्यास खरीप पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मृगाच्या हत्तीने सोंड फिरविल्यामुळे अपेक्षा भंग झालेल्या शेतकऱ्यांची आर्द्रा या नक्षत्रावर लक्ष लागून आहे. हे नक्षत्र दमदार पावसाचे मानले जाते. याचे वाहन मोर असल्याने थांबून-थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिले चरण सध्या तरी कोरडे दिसत आहे. तरीही दुसऱ्या चरणात अर्थात २६ ते ३० जून दरम्यान चांगल्या पावसाचे योग आहेत असे महाराष्ट्रीय पंचांगात नमूद आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानुसार मान्सूनने विदर्भात धडक दिली असली तरी नैर्ऋत्येकडून येणाऱ्या मोसमी पावसाच्या वाऱ्याचा जोर कमी आहे.