शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संस्थेला अध्यक्षाचा लाभ काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:22 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मावळते अध्यक्ष अरूण शेळके हे संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे तिसºयांदा उमेदवार आहेत.

ठळक मुद्देश्री शिवाजी शिक्षण संस्था : सदस्यांचा सवाल, भ्रष्टाचाराचा वाढता आलेख रोखण्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मावळते अध्यक्ष अरूण शेळके हे संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे तिसºयांदा उमेदवार आहेत. दोन टर्म अध्यक्षपद भूषविलेल्या शेळके यांचा संस्थेला नेमका लाभ झाला तरी काय, असा प्रश्न संस्थेच्या मतदारांमध्ये मंथनाचा प्रमुख विषय झाला आहे.डॉ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेली श्री शिवाजी शिक्षण संस्था ही राज्यातील दुसºया क्रमांकाची शिक्षण संस्था आहे. सुरुवातच दृढ संकल्पातून झालेल्या या संस्थेचा व्याप वटवृक्षाप्रमाणे पसरला. बहुजनांना सावली मिळावी, या हेतुने अनेकांनी मोकळ्या हाताने दान देऊन संस्थेची भरभराट करविली. शेळके हे शिक्षित आणि फ्रेश असल्यामुळे संस्थेच्या सर्वांगिण प्रगतीच्या विचाराने शिवपरीवाराने त्यांच्या हाती सुत्रे सोपविली होती; तथापि तेच मतदार आता निवड चुकल्याचे बोलू लागले आहेत.उदात्त हेतुच्या संस्थेला काही देण्यासाठी सत्ताधिकाºयाचे वैचारीक अधिष्ठानही त्याच तोलामोलाचे असावे लागेल, असा मुद्दा आता शेळकेंच्या कार्यशैलीमुळे महत्त्वपूर्ण झाला आहे. चटकन आठवेल असे कुठलेही कार्य शेळकेंच्या काळात संस्थेसाठी झालेले नाही. संस्थेमुळे शेळकेंना काय मिळाले, याची चटकन आठवण व्हावी, असे अनेक मुद्दे मात्र आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेला शेळके यांनी दिले तरी काय, असा थेट सवाल त्यामुळेच उपस्थित होतो आहे.संस्थेच्या सभासदांच्या मुलांना सदस्यत्त्व न देणे, भाऊसाहेबांच्या नावाला डाग लावणारे कार्य डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा ऋग्णालयात घडणे, महाविद्यालय बंद करण्याच्या हालचाली होणे, मर्जीतील लोकांचा भरणा करून त्यांना कामाविना वेतन देणे, एमबीबीएस, एमडीच्या जागांमधून कोट्यवधींचे व्यवहार होणे, मौल्यवान जागा निमूटपणे अतिक्रमित होऊ देणे या बाबी उघड आहेतच; तथापि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या अमरावतीतील घराची स्थितीही पालटू शकली नसल्याचा मुद्दा उपस्थित होतो आहे.संस्थेच्या भरवशावर शेळके यांना मिळू शकलेले आणि शेळकेंच्या व्यक्तिमत्त्वातून संस्थेला मिळू शकलेले, अशा सर्व मुद्यांचा हिशेब मतदारांनी मांडणे सुरू केले आहे. 'अ‍ॅड.शेळके पॅनेल'ला त्यामुळेच अडसर ठरेल तो अध्यक्षपादाच्या उमेदवाराचाच!परीवर्तन पॅनेलमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा असल्यामुळे संस्थेत राजकारणाचा शिरकाव नको, हा अजेंडा मतदारांमध्ये अजूनही महत्त्वपूर्ण आहे. या पॅनेलचे चेहरे संस्थेच्या दृष्टीने परके आहेत. विकास पॅनेल, लोकमहर्षी पॅनेलचा प्रभाव मतदारांच्या मनावर अद्यापही बिंबू शकला नसल्याने त्यांना मार्ग अडचणीचा आहे. मतदार सर्वच पॅनेलचे विश्लेषण करीत असल्याने ना यावेळी लाट दिसत, ना 'आपला माणूस' हा मुद्दा जाणवत.