शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

संस्थेला अध्यक्षाचा लाभ काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:22 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मावळते अध्यक्ष अरूण शेळके हे संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे तिसºयांदा उमेदवार आहेत.

ठळक मुद्देश्री शिवाजी शिक्षण संस्था : सदस्यांचा सवाल, भ्रष्टाचाराचा वाढता आलेख रोखण्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मावळते अध्यक्ष अरूण शेळके हे संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे तिसºयांदा उमेदवार आहेत. दोन टर्म अध्यक्षपद भूषविलेल्या शेळके यांचा संस्थेला नेमका लाभ झाला तरी काय, असा प्रश्न संस्थेच्या मतदारांमध्ये मंथनाचा प्रमुख विषय झाला आहे.डॉ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेली श्री शिवाजी शिक्षण संस्था ही राज्यातील दुसºया क्रमांकाची शिक्षण संस्था आहे. सुरुवातच दृढ संकल्पातून झालेल्या या संस्थेचा व्याप वटवृक्षाप्रमाणे पसरला. बहुजनांना सावली मिळावी, या हेतुने अनेकांनी मोकळ्या हाताने दान देऊन संस्थेची भरभराट करविली. शेळके हे शिक्षित आणि फ्रेश असल्यामुळे संस्थेच्या सर्वांगिण प्रगतीच्या विचाराने शिवपरीवाराने त्यांच्या हाती सुत्रे सोपविली होती; तथापि तेच मतदार आता निवड चुकल्याचे बोलू लागले आहेत.उदात्त हेतुच्या संस्थेला काही देण्यासाठी सत्ताधिकाºयाचे वैचारीक अधिष्ठानही त्याच तोलामोलाचे असावे लागेल, असा मुद्दा आता शेळकेंच्या कार्यशैलीमुळे महत्त्वपूर्ण झाला आहे. चटकन आठवेल असे कुठलेही कार्य शेळकेंच्या काळात संस्थेसाठी झालेले नाही. संस्थेमुळे शेळकेंना काय मिळाले, याची चटकन आठवण व्हावी, असे अनेक मुद्दे मात्र आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेला शेळके यांनी दिले तरी काय, असा थेट सवाल त्यामुळेच उपस्थित होतो आहे.संस्थेच्या सभासदांच्या मुलांना सदस्यत्त्व न देणे, भाऊसाहेबांच्या नावाला डाग लावणारे कार्य डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा ऋग्णालयात घडणे, महाविद्यालय बंद करण्याच्या हालचाली होणे, मर्जीतील लोकांचा भरणा करून त्यांना कामाविना वेतन देणे, एमबीबीएस, एमडीच्या जागांमधून कोट्यवधींचे व्यवहार होणे, मौल्यवान जागा निमूटपणे अतिक्रमित होऊ देणे या बाबी उघड आहेतच; तथापि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या अमरावतीतील घराची स्थितीही पालटू शकली नसल्याचा मुद्दा उपस्थित होतो आहे.संस्थेच्या भरवशावर शेळके यांना मिळू शकलेले आणि शेळकेंच्या व्यक्तिमत्त्वातून संस्थेला मिळू शकलेले, अशा सर्व मुद्यांचा हिशेब मतदारांनी मांडणे सुरू केले आहे. 'अ‍ॅड.शेळके पॅनेल'ला त्यामुळेच अडसर ठरेल तो अध्यक्षपादाच्या उमेदवाराचाच!परीवर्तन पॅनेलमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा असल्यामुळे संस्थेत राजकारणाचा शिरकाव नको, हा अजेंडा मतदारांमध्ये अजूनही महत्त्वपूर्ण आहे. या पॅनेलचे चेहरे संस्थेच्या दृष्टीने परके आहेत. विकास पॅनेल, लोकमहर्षी पॅनेलचा प्रभाव मतदारांच्या मनावर अद्यापही बिंबू शकला नसल्याने त्यांना मार्ग अडचणीचा आहे. मतदार सर्वच पॅनेलचे विश्लेषण करीत असल्याने ना यावेळी लाट दिसत, ना 'आपला माणूस' हा मुद्दा जाणवत.