शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दुचाकीस्वारांवर कारवाई चारचाकी वाहनांचे काय ?

By admin | Updated: February 16, 2016 00:19 IST

बेशिस्त अमरावतीकर वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महिनाभरापासून ‘वाहने उचलून आणून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू आहे.

फौजदारी कारवाईला मर्यादा : वाहनचालकांचीही जबाबदारीअमरावती : बेशिस्त अमरावतीकर वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महिनाभरापासून ‘वाहने उचलून आणून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत केवळ दुचाकींना लक्ष्य केले जात आहे. त्या तुलनेत बेशिस्त चारचाकीचालक मात्र बिनधास्त वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत असल्याचे चित्र आहे. जामरची अत्यल्प संख्या पाहता वाहतूक शाखेनेही चारचाकी वाहनांवरील फौजदारी कारवाई सुरू असली तरी त्या कारवाईच्या मर्यादा स्पष्ट आहेत. शहराच्या अनेक चौकांत दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहने रस्ता अडवून आणि वाहतुकीस अडथळा करून उभी राहत असताना त्यांच्यावर नाममात्र कारवाई केली जाते. अलीकडे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. हा प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र अशा कारवार्इंवर मर्यादा असते. ज्याप्रमाणात दुचाकींवर कारवाई केली जाते, त्याप्रमाणेच रस्ता अडवून ठेवणाऱ्या आणि नो-पार्किंग स्थळी चारचाकी वाहनांना ‘जामर’ लावून त्यांच्यावर कारवाईचा दंडुका उगारावा, अशी अपेक्षा अनेक दुचाकीस्वारांनी व्यक्त केली आहे. नो-पार्किंग असताना तासन्तास उभी करण्यात येणारी चारचाकी वाहने अतिक्रमणात भर टाकणारी आहे. शासकीय कार्यालयालगत चारचाकी वाहनांची सर्वाधिक पार्किंग अवैधरीत्या केली जाते. (प्रतिनिधी)चारचाकी वाहन चालकांचा त्रागादुचाकीस्वाराच्या तुलनेत चारचाकी वाहनचालक अधिक प्रमाणात पोलिसांशी भिडतात. प्रसंगी राजकीय पदाधिकारी वा संघटनांचा दबावसुद्धा पोलिसांवर येतो. त्यामुळे दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहनचालकांवरील कारवाईचा आकडा अल्प आहे. त्याचबरोबर जामरची संख्या अल्प असल्यानेही चारचाकीची अवैध पार्किंग केली जाते. त्यावर अंकुश राहिलेला नाही. दुचाकींवरच बडगाशहरात अवैध पार्किंगचा व्याप वाढल्याने वाहतूक शाखेकडून ‘नो पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. दुचाकीस्वारांवरच प्रत्येकी शे-सव्वाशे रुपयांचा बडगा उगारला जातो. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये असंतोष उफाळत आहे. वाहनचालकांची जबाबदारी नाही का ?बहुतांश वाहनचालक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करतात. चारचाकी वाहनचालक मोठ्या रुबाबात रस्त्यानजीक वा कधीकधी रस्त्यावर वाहन उभे करून आपल्या कामाला निघून जातात. आपल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होतो का, हे पहायला बहुतांश वाहनचालकांकडे वेळ नसतो. शासकीय कार्यालय परिसरात तर उच्चभ्रू नागरिक ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये बिनधास्तपणे वाहने पार्क करतात. वाहतूक नियंत्रणाची जेवढी जबाबदारी पोलिसांची तेवढीच महापालिकेची आणि सर्वात आधी वाहन चालकांची आहे, हे समजून घ्यायला हवे. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात चार चाकींच्या रांगाजिल्हाधिकारी कार्यालय, एसपी कार्यालयांसह जिल्हा परिषद आणि न्यायालयाबाहेरच्या परिसरात वाहतुकीस अडथळा येईल, अशारितीने धनदांडग्यांची चारचाकी वाहने बिनधास्तपणे रस्त्यावर पार्क केली जातात. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. जामरची संख्या कमी असली तरी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या चार चाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे. कुणालाही पाठीशी घातले जात नाही. - बळीराम डाखोरे,प्रभारी एसीपी, वाहतूक शाखा, शहर आयुक्तालय