शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

पश्चिम विदर्भात १११.२ टक्के पाऊस; अमरावती जिल्ह्यात १०९.१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:58 IST

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता.

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते २२ ऑगस्टपर्यंत सरासरी ४२३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा ४६१.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३८७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ४३०.७ मिमी पाऊस पडल्याची माहिती जलसंपदा विभागातून प्राप्त झाली आहे.

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात १ जून ते २२ ऑगस्ट दरम्यान ५२७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३५६.६ मिमी झाला. याची टक्केवारी ६७ टक्के इतकी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३९७.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सर्वाधिक ५६६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. चिखलदरा तालुक्यात ६३७ मिमी  सरासरी असताना ४३०.३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

अमरावतीत ४५५.९ मिमी (१०५.३ टक्के), भातकुली ४९८.२ मिमी (१३६.१ टक्के), चांदूर रेल्वे ४०७.७ मिमी (११०.२ टक्के), तिवसा ३६६.९ मिमी (११०.८ टक्के), मोर्शी ४८० मिमी (१२४.८ टक्के), वरूड ५००.७ मिमी (१२४.६ टक्के), दर्यापूर ५४५ मिमी (१८५.२ टक्के), अंजनगाव सुर्जी ४५२ मिमी (१४९.४ टक्के), अचलपूर  ३७७.८ मिमी (९२.९ टक्के), चांदूर बाजार ४१०.४ (१५०.९ टक्के), तर धामणगाव रेल्वे तालुक्यात सरासरी ४८० मिमी पाऊस अपेक्षित असताना ४१०.४ मिमी (८५.५ टक्के)  पावसाची नोंद झालेली आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती