शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ गर्जना यात्रेचे वरूडात स्वागत

By admin | Updated: March 2, 2015 00:33 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली.

वरुड : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा नुकतीच काढण्यात आली असून ही यात्रा रविवारी तालुक्यात पोहचली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी केले.स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढा अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेकांनी रणशिंग फुंकले प्रवाहासोबत वाहून जाणारे अनेक होते. परंतु जुने विदर्भवादी आजही आपल्या शब्दावर ठाम आहेत. येणारे नवीन चेहरे मात्र वाट मिळेल तिकडे गेलेत. निवडणूक काळात उमेदवारांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून मते मिळवली. परंतु दिलेले आश्वासन फोल ठरताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला जाग आणण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात आली. याची सुुरूवात गांधी पुतळा, व्हेरायटी चौैैक, नागपूर व समारोप मेळावा गडचिरोली येथे होणार आहे. जवळपास २ हजार १०० कि. मी. अंतराची ही यात्रा आहे. ती यात्रा वरुड तालुक्यात आली. यावेळी तालुक्यातील बेनोडा, जरूड त्यानंतर स्थानिक महात्मा फुले चौैैकात सभा घेण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला शक्तीशाली बनविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव चटप बोलताना म्हणाले की, नागपूर करार अंतर्गत १९५६ मध्ये विदर्भप्रांत महाराष्ट्रात सामील झाला. त्यानंतर विदर्भावर अन्याय वाढतच गेला. नागपूर कराराचे पालन राज्यसरकारने केले नाही. त्यामुळे सिंचन उद्योगधंदे रोजगार, प्रादेशिक विकास इत्यादी बाबींचा बॅकलॉग सतत वाढतच गेला. परीणामत: शेती, पाणी, कोळसा, कापुस, वीज, मॅग्नीज, वनसंपत्ती सर्व प्रकारचा कच्चा माल व उद्योग धंदे, नोकऱ्या, विकास सर्वप्रकारे पश्चिम महाराष्ट्रत असे चित्र उभे झाले आहे. आमच्या वाटेला काय तर मागासलेपणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण प्रदूषणामुळे कर्करोग, दमा यासारखे दुर्धर रोग, नक्षलवाद यांनी आपण ग्रस्त व त्रस्त आहोत. या सर्व बाबीतून बाहेर पडायचे असेल तर यावर एकच उपाय स्वतंत्र विदर्भ राज्य यासाठी 'विदर्भ मिळवू औैैैंदा' या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार वामनराव चटप, संजय कोल्हे, दिलीप भोयर, प्रमोद कुटे, दिलीप यावलकर, शिवहरी सावरकर, दिलीप लव्हाळे, बाबाराव माकोडे, विनायक देशमुख, रघुनाथ खुजे, धनपालसिंग चंदेल, विनय फरकाडे, देवेंद्र गोरडे, साहेबराव पाटील, बाबाराव तडस, प्रकाश ठाकरे, रामरावजी वानखडे, ज्ञानेश्वर निकाजु, रामचंद्र पाटील, सुनील पावडे, अनिल वानखडे, अण्णासाहेब घोरमाडे, गजानन उपासे, पुरूषोत्तम वानखडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)