शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजार तालुक्यात ११,५५३ बालके कमी वजनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:15 IST

कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी शासनासने जिल्ह्यात विविध योजना राबविल्या असतानाही तालुक्यात सद्यस्थितीत तीव्र कमी वजनाचे १४१, मध्यम कमी वजनाचे १०६१ व सर्वसाधारण वजनाचे ११ हजार ५३१ बालके आहेत. यातील ऊंचीनुसार सॅममध्ये ११, तर मॅममध्ये ४६ असे एकूण ५७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. याचे चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसॅम व मॅममध्ये ५७ बालके : शासनाच्या विविध योजना असताना कुपोषण थांबता थांबेना

चांदूर बाजार : कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी शासनासने जिल्ह्यात विविध योजना राबविल्या असतानाही तालुक्यात सद्यस्थितीत तीव्र कमी वजनाचे १४१, मध्यम कमी वजनाचे १०६१ व सर्वसाधारण वजनाचे ११ हजार ५३१ बालके आहेत. यातील ऊंचीनुसार सॅममध्ये ११, तर मॅममध्ये ४६ असे एकूण ५७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. याचे चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.हा तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे या तालुक्यात आदिवासींची संख्या भरपूर आहे. ग्रामीण स्तरावर कमी वजनाच्या बालकांसाठी व मातेसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागामार्फत, बालविकास सेवा योजनेतून सकस आहार गावोगावी देण्यात येते.ऊंचीनुसार सॅम व मॅममध्ये असणाऱ्या बालकांसाठी त्याच गावात ग्राम बाल विकास केंद्र उघडण्यात आली असून, यात अशा बालकाची संख्या शिरजगाव कसबा, बोरज, जसापूर, देउरवाडा, माधान, कोदोरी, चिंचोली, ब्राह्मणवाडा पाठक, घाटलाडकी, परसोडा, बेलमंडळी, बोराडा, खराळा, बेसखेडा, आसेगाव, राजना, करजगाव, खरपी, तळेगाव मोहना, तुळजापूर गढी, सैदापूर, तोडगाव, बेलज, कुºहा या गावाच्या परिसरामध्ये जास्त दिसून येते.सकस आहाराची चव बदलणे गरजेचेघरची गरीब परिस्थिती व अज्ञानता असल्यामुळे मातेला सकस आहार सहजरीत्या उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम होणाºया बाळावर होऊन मूल कमी वजनाचे जन्माला येतात. शासनासने अनेक योजनांमार्फत अशा मातांना सकस आहार पुरविणे सुरु केला असला तरी यातील कित्येक महिला या सकस आहाराचा उपयोग घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिलांना आवडेल तसा सकस आहार पुरविल्यास गर्भवती महिला आवडीने खाऊ शकतील.गर्भधारणेपासून सकस आहार महत्त्वाचाजन्मजात बाळांकरिता आईचे दूध हे अमृत असते. त्या दुधामुळेच बाळाला शक्ती प्रधान होत असते. त्यामुळे आईच्या गर्भधारणेपासून त्या महिलेस आवशकतेनुसार सकस आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हाच बाळ सुदृढ जन्माला येऊ शकते.