शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

चांदूर बाजार तालुक्यात ११,५५३ बालके कमी वजनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:15 IST

कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी शासनासने जिल्ह्यात विविध योजना राबविल्या असतानाही तालुक्यात सद्यस्थितीत तीव्र कमी वजनाचे १४१, मध्यम कमी वजनाचे १०६१ व सर्वसाधारण वजनाचे ११ हजार ५३१ बालके आहेत. यातील ऊंचीनुसार सॅममध्ये ११, तर मॅममध्ये ४६ असे एकूण ५७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. याचे चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसॅम व मॅममध्ये ५७ बालके : शासनाच्या विविध योजना असताना कुपोषण थांबता थांबेना

चांदूर बाजार : कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी शासनासने जिल्ह्यात विविध योजना राबविल्या असतानाही तालुक्यात सद्यस्थितीत तीव्र कमी वजनाचे १४१, मध्यम कमी वजनाचे १०६१ व सर्वसाधारण वजनाचे ११ हजार ५३१ बालके आहेत. यातील ऊंचीनुसार सॅममध्ये ११, तर मॅममध्ये ४६ असे एकूण ५७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. याचे चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.हा तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे या तालुक्यात आदिवासींची संख्या भरपूर आहे. ग्रामीण स्तरावर कमी वजनाच्या बालकांसाठी व मातेसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागामार्फत, बालविकास सेवा योजनेतून सकस आहार गावोगावी देण्यात येते.ऊंचीनुसार सॅम व मॅममध्ये असणाऱ्या बालकांसाठी त्याच गावात ग्राम बाल विकास केंद्र उघडण्यात आली असून, यात अशा बालकाची संख्या शिरजगाव कसबा, बोरज, जसापूर, देउरवाडा, माधान, कोदोरी, चिंचोली, ब्राह्मणवाडा पाठक, घाटलाडकी, परसोडा, बेलमंडळी, बोराडा, खराळा, बेसखेडा, आसेगाव, राजना, करजगाव, खरपी, तळेगाव मोहना, तुळजापूर गढी, सैदापूर, तोडगाव, बेलज, कुºहा या गावाच्या परिसरामध्ये जास्त दिसून येते.सकस आहाराची चव बदलणे गरजेचेघरची गरीब परिस्थिती व अज्ञानता असल्यामुळे मातेला सकस आहार सहजरीत्या उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम होणाºया बाळावर होऊन मूल कमी वजनाचे जन्माला येतात. शासनासने अनेक योजनांमार्फत अशा मातांना सकस आहार पुरविणे सुरु केला असला तरी यातील कित्येक महिला या सकस आहाराचा उपयोग घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिलांना आवडेल तसा सकस आहार पुरविल्यास गर्भवती महिला आवडीने खाऊ शकतील.गर्भधारणेपासून सकस आहार महत्त्वाचाजन्मजात बाळांकरिता आईचे दूध हे अमृत असते. त्या दुधामुळेच बाळाला शक्ती प्रधान होत असते. त्यामुळे आईच्या गर्भधारणेपासून त्या महिलेस आवशकतेनुसार सकस आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हाच बाळ सुदृढ जन्माला येऊ शकते.