शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

पिकांवर खुरपडींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,१४,९९२ हेक्टरमध्ये पेरणी झाली, ही ५९.३९ टक्केवारी आहे. पावसाची उघडीप असल्याने सोयाबीनच्या पेरण्या माघारल्या होत्या. मात्र, विखुरत्या स्वरुपात मृगसरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी सुरू केली असता, पावसाचा खोळंबा झाल्याने पिकांवर किडींचे नवे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देपावसाच्या उघडीपमुळे नवे संकट, भर पावसाळ्यात तुषार सिंचन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन आठवड्यांपासून पावसाची उघडीप असल्याने कोवळ्या पिकांचा खुरपडी (मिलीपेड) फडशा पाडत आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात तुषार सिंचन संच बाहेर निघाले असले तरी जिरायती क्षेत्रात मात्र, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.जिल्ह्यात १० जूनला मान्सूनचे आगमन झाले असलेतरी मान्सून सक्रिय झालाच नाही. महिनाभरात केवळ दोनच दिवस सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरण्या झालेल्या भागातील कोवळी पिके दिवसाच्या उन्हात माना टाकत आहे. याशिवाय सोयाबीन पिकांवर वाणी,  पैसा, नागवानी अळी आदी खुरपडींनी हल्ला चढविला. पिकांचे नुकसान होत असल्याने वेळीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,१४,९९२ हेक्टरमध्ये पेरणी झाली, ही ५९.३९ टक्केवारी आहे. पावसाची उघडीप असल्याने सोयाबीनच्या पेरण्या माघारल्या होत्या. मात्र, विखुरत्या स्वरुपात मृगसरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी सुरू केली असता, पावसाचा खोळंबा झाल्याने पिकांवर किडींचे नवे संकट उभे ठाकले आहे.  कृषी विभागाच्या सद्यस्थितीत अहवालानुसार, धारणी तालुक्यात २३,९४७ हेक्टर, चिखलदरा १०,८२६, अमरावती ४२,२९१, भातकुली १५,३६०, नांदगाव खंडेश्वर ५३,६६१, चांदूर रेल्वे २८,७९६, तिवसा ३५,८९३, मोर्शी ४३,०७३, वरूड २६,६१४, दर्यापूर १२,२३३ अंजनगाव सुर्जी २३,७३५, अचलपूर २१,५५६, चांदूर बाजार २६,२४० व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५०,७६३ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. 

का उद्‌भवले संकट?खुरपडी हा किडीचा प्रकार जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर जगणारा आहे. हे सेंद्रिय पदार्थ पावसाअभावी कडक झाल्यामुळे खाण्यायोग्य स्थितीत नाहीत. त्यामुळे या किडींद्वारा कोवळी पिके, अंकूर, कोवळी पाने कुरतडून खात आहेत. ज्या ठिकाणी बीजप्रक्रिया करण्यात आलेली नाही तेथे किडींद्वारा नुकसान होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

ही करावी धुरळणीज्या ठिकाणी वाणीचा आकार मोठा व संख्या जास्त असेल तेथे हाताने गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे. याशिवाय पिकांच्या ओळीत १.५ टक्के क्लोरोपारीफॉस भुकटी २० ते २५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी वारा शांत असताना धुरळणी  करावी. पंपाचे नोझल सैल करून क्लोरोपारीफॉस २० टक्के प्रवाही हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात ३७.५ मिली मिसळून फवारणी करावी, एकरी ४०० लिटर द्रावण याप्रमाणे फवारणी करावी, हे उपाय किडीवर लेबल क्लेमच्या शिफारसीप्रमाणे असल्याचे एसएओ विजय चवाळे, प्रादेशिक संशोधन केंद्राचे डाॅ अनिल ठाकरे यांनी केले आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी