शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर खुरपडींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,१४,९९२ हेक्टरमध्ये पेरणी झाली, ही ५९.३९ टक्केवारी आहे. पावसाची उघडीप असल्याने सोयाबीनच्या पेरण्या माघारल्या होत्या. मात्र, विखुरत्या स्वरुपात मृगसरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी सुरू केली असता, पावसाचा खोळंबा झाल्याने पिकांवर किडींचे नवे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देपावसाच्या उघडीपमुळे नवे संकट, भर पावसाळ्यात तुषार सिंचन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन आठवड्यांपासून पावसाची उघडीप असल्याने कोवळ्या पिकांचा खुरपडी (मिलीपेड) फडशा पाडत आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात तुषार सिंचन संच बाहेर निघाले असले तरी जिरायती क्षेत्रात मात्र, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.जिल्ह्यात १० जूनला मान्सूनचे आगमन झाले असलेतरी मान्सून सक्रिय झालाच नाही. महिनाभरात केवळ दोनच दिवस सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरण्या झालेल्या भागातील कोवळी पिके दिवसाच्या उन्हात माना टाकत आहे. याशिवाय सोयाबीन पिकांवर वाणी,  पैसा, नागवानी अळी आदी खुरपडींनी हल्ला चढविला. पिकांचे नुकसान होत असल्याने वेळीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,१४,९९२ हेक्टरमध्ये पेरणी झाली, ही ५९.३९ टक्केवारी आहे. पावसाची उघडीप असल्याने सोयाबीनच्या पेरण्या माघारल्या होत्या. मात्र, विखुरत्या स्वरुपात मृगसरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी सुरू केली असता, पावसाचा खोळंबा झाल्याने पिकांवर किडींचे नवे संकट उभे ठाकले आहे.  कृषी विभागाच्या सद्यस्थितीत अहवालानुसार, धारणी तालुक्यात २३,९४७ हेक्टर, चिखलदरा १०,८२६, अमरावती ४२,२९१, भातकुली १५,३६०, नांदगाव खंडेश्वर ५३,६६१, चांदूर रेल्वे २८,७९६, तिवसा ३५,८९३, मोर्शी ४३,०७३, वरूड २६,६१४, दर्यापूर १२,२३३ अंजनगाव सुर्जी २३,७३५, अचलपूर २१,५५६, चांदूर बाजार २६,२४० व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५०,७६३ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. 

का उद्‌भवले संकट?खुरपडी हा किडीचा प्रकार जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर जगणारा आहे. हे सेंद्रिय पदार्थ पावसाअभावी कडक झाल्यामुळे खाण्यायोग्य स्थितीत नाहीत. त्यामुळे या किडींद्वारा कोवळी पिके, अंकूर, कोवळी पाने कुरतडून खात आहेत. ज्या ठिकाणी बीजप्रक्रिया करण्यात आलेली नाही तेथे किडींद्वारा नुकसान होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

ही करावी धुरळणीज्या ठिकाणी वाणीचा आकार मोठा व संख्या जास्त असेल तेथे हाताने गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे. याशिवाय पिकांच्या ओळीत १.५ टक्के क्लोरोपारीफॉस भुकटी २० ते २५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी वारा शांत असताना धुरळणी  करावी. पंपाचे नोझल सैल करून क्लोरोपारीफॉस २० टक्के प्रवाही हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात ३७.५ मिली मिसळून फवारणी करावी, एकरी ४०० लिटर द्रावण याप्रमाणे फवारणी करावी, हे उपाय किडीवर लेबल क्लेमच्या शिफारसीप्रमाणे असल्याचे एसएओ विजय चवाळे, प्रादेशिक संशोधन केंद्राचे डाॅ अनिल ठाकरे यांनी केले आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी