शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

रिपाइं-जनविकास फुटीच्या मार्गावर!

By admin | Updated: January 7, 2015 22:43 IST

महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

‘स्थायी’वर नजर : तीन सदस्य बहिर्गमनाच्या तयारीत; विधानसभा निवडणुकीनंतर वेगवान हालचालीअमरावती : महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.२०१२ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ. सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेस तर माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण आघाडीच्या नावे संघटना स्थापन करुन निवडणुकीत नशीब आजमाविले. या दोन्ही नेत्यांना महापालिका निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. जनविकास काँग्रेस सहा तर जनकल्याण आघाडीचा एकच सदस्य निवडून आला. मात्र, महापालिकेत विविध समित्यांवर अधिराज्य मिळवायचे असल्यास गटस्थापनेसाठी नऊ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यामुळे जनकल्याण, जनविकासच्या सदस्यांनी रिपाइं (आठवले गट) चे दोन सदस्य सोबत घेऊन नऊ सदस्यांनी रिपाइं- जनविकास- जनकल्याण या नावाने महापालिकेत गट स्थापन केला. या गटाचे नेते प्रकाश बनसोड हे आहेत. गटाच्या सदस्य संख्येनुसार विषय समिती अथवा स्थायी समितीत सदस्यांची नियुक्ती करण्याचा शिरस्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनील देशमुख, जगदीश गुप्ता भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे महापालिकेत जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडीचे सदस्य वाऱ्यावर आहेत. नेत्यांनी पक्ष बदलविल्यानंतर होणाऱ्या दुर्लक्षामुळे हे सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेत त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे सुध्दा ते हैराण आहेत. या गटातील नऊ सदस्यांपैकी काहीच सदस्यांना महत्वाच्या जागी नियुक्ती मिळविता आली. त्यामुळे इतर सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. महापालिका निवडणुकीत आ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता स्वतंत्र बॅनरखाली होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत चित्र पालटले. जनविकास, जनकल्याण आघाडीच्या सदस्यांना भाजपामध्ये जायचे नसल्याने काही सदस्य बाहेर पडण्याच्या मार्गाला असल्याचे चित्र आहे. एकेकाळचे सुनील देशमुखांचे खंदे समर्थक रतन डेंडुले यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत सुनील देशमुखांविरुध्द प्रचारात रतन डेंडुले यांनी आघाडी देत रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.