शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाचा मार्ग अजूनही खडतरच !

By admin | Updated: January 12, 2016 00:15 IST

अल्पवयात येणारे मातृत्व, योग्य आहाराचा अभाव आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, वर्षभरातच होणारी दुसरी गर्भधारणा अशा विविध कारणांनी आईचा मार्ग खडतर बनला आहे.

११ वर्षांची आकडेवारी : प्रसूतीदरम्यान २२ माता, २४ नवजात शिशुंचा मृत्यूमोहन राऊ त अमरावतीअल्पवयात येणारे मातृत्व, योग्य आहाराचा अभाव आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, वर्षभरातच होणारी दुसरी गर्भधारणा अशा विविध कारणांनी आईचा मार्ग खडतर बनला आहे. मागील ११ वर्षांत जिल्ह्यात प्रसूती दरम्यान २२ माता व २४ नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़आईपण आल्याशिवाय स्त्री जन्माचे सार्थक होत नाही़ अपत्य हे स्त्रीला निसर्गाने दिलेले मोलाचे वरदान आहे़ दाम्पत्याच्या जीवनाचा खरा अर्थ व आनंद अनुभवायचा असेल तर अपत्य हवेच आणि ते सुदृढही हवे. सुरक्षित मातृत्व असण्यासाठी मूलही वेळेवर होणे गरजेचे आहे़ परंतु अलीकडे मातृत्वाची प्रक्रिया अधिकच असुरक्षित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गर्भधारणेच्या काळात होतेय दुर्लक्ष पूर्वीच्या काळी गर्भवती महिलेकडून पाच ते नऊ महिन्यांपर्यंत विहिरीचे पाणी काढणे, जात्यावर दळण दळणे, घर सारवणे, कुटुंबातील सर्वांचा स्वयंपाक बनविणे, अशी कामे कुटुंबप्रमुख महिला करून घेत असत. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गर्भावस्थेत प्रकृतीकडे महिला लक्ष देऊ शकत नाहीत. यातील दुसरी बाजू म्हणजे आजही ग्रामीण भागात मुलींना शारीरिक व मानसिक वाढ होण्यापूर्वीच बोहल्यावर चढविले जातात़ त्यामुळे गर्भधारणेत अनेक प्रकारच्या अडचणी येतात. प्रसुतीकाळात गर्भार महिलेची विशेषत्वाने काळजी घेतली जात नाही़ गर्भधारणेपासून तर प्रसूतीपर्यंतच्या कालावधीत तपासणी न करता अनेक महिला थेट प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहेत़ योग्य ते उपचार न झाल्यामुळे जिल्ह्यात ११ वर्षांत २२ माता व २४ नवजात शिशू दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष हवे.प्रसूती केंद्रात सुविधांचा अभाव विशेषत: शहरातील महिलांमध्ये या घटना कमी घडल्या असल्या तरी कामानिमित्त होणारी धावपळ, रोजचा प्रवास, उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे यामुळे महिलांना धाप-दमा यांसह कावीळ सारख्या साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम प्रसूतीवेळी जाणवत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात संबंधित महिलेची प्रसूती करावी, असा शासनाचा आदेश आहे़ परंतु या उपकेंद्रात योग्य सुविधा नसल्याचे चित्र आहे़ अनेक उपकेंद्रांत प्रकाश व्यवस्था नाही, तर रात्रीच्या वेळी हे उपकेंद्र बंद असतात़ तालुका आरोग्य अधिकारी उपकेंद्राच्या आरोग्य सेविकांना नोटीस बजावतात. यानंतरही यात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे़योग्य तपासणीची गरजयोग्य मातृत्वासाठी गर्भकाळात दोन महिन्यांतून एकदा सोनोग्राफी होणे अगत्याचे आहे. प्रसूतीसाठी सर्वसोई नियुक्त रूग्णालयात दाखल व्हावे, योग्य आहार, व्यायाम व विश्रांती घेणे गरजेचे आहे़ वेळीच रक्त, लघवी, तपासून घ्यावीत, पूर्व आजारांची कल्पना डॉक्टरांना द्यावी, आशा स्वयंसेविकांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे, दोन मुलांमध्ये किमान २ वर्षांचे अंतर ठेवावे, जुळे बाळ असल्यास दर महिन्याला तपासणी करावी, अल्पवयात लग्न करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, उघड्यावरील अन्न पाणी घेऊ नये. या बाबींची काळजी घेतल्यास आईपणाचा मार्ग सुकर होण्यात मदत होईल.बदलत्या जीवनशैलीत गर्भावस्थेच्या काळात महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते़ परंतु वाढत्या मानसिक तणावात काळजी घेतली जात नाही व अशातच माता किंवा शिशूचा मृत्यू होतो़ योग्य वेळी तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे़- शोभा राठी, महिला चिकित्सक.