शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

चार दिवस उटण्याच्या सुगंधात दरवळणार

By admin | Updated: November 10, 2015 00:35 IST

धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा व भाऊबीज या चार सांस्कृतिक विचारधारेशी दिवाळी हा सण जोडला आहे.

उत्सव : आज नरक चतुर्दशी, उद्या दिवाळीसुमित हरकुट  चांदूरबाजारधनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा व भाऊबीज या चार सांस्कृतिक विचारधारेशी दिवाळी हा सण जोडला आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळी या सणाला अधिक महत्त्व असले तरी मातीची पणती, अभ्यंगस्रान व उटण्याने चार दिवस सुगंध दरवळतो.मानवी शरीर पंचतत्त्वापासून बनले आहे. माती ही पंचतत्त्वापैकी एक आहे. त्यामुळे मातीच्याच दिव्याचे महत्त्व दिवाळीला आहेत. दिवा म्हणजे ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक असून शास्त्रानुसार पुण्यकाळात धनसंपत्तीची देवी लक्ष्मी भ्रमणासाठी बाहेर पडली असताना ज्या घरात कलह, दारिद्र्य, रोग व आर्थिक चणचण आहे, परंतु त्या घरात मातीचा दिवा असेल तर त्या घरात लक्ष्मी विराजमान होते, अशी आख्यायिका आहे. धनत्रयोदशीपासून घरासमोर दिवे लावण्याची परंपरा आहे, दिव्यामुळे वास्तुदोष दूर होतो तर वातावरणातील नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा दरवळते. दिवाळीच्या चार दिवसांत अभ्यंगस्रानाला महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात त्वचेवर ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होतो. प्रत्येक क्षणी त्वचा ही निसर्गाशी जुळवून घेत असते. दिवाळीच्या काळात थंडीला सुरुवात होते. निसर्गात चंद्राचा प्रभाव वाढतो. सूर्य दक्षिणायनात जातो, हवेत शीतलता व शरीर आतून उष्णता या दोन्ही घटनांमुळे त्वचा फाटते. त्यामुळे तिळाच्या तेलाने अंग चोळून स्रान करणे म्हणजे अभ्यंगस्रान होय. त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते.आयुर्वेदशास्त्रानुसार उटण्याला अधिक महत्त्व आहे. घरगुती स्वरुपात उटणे म्हणजे हळद, आंबेहळद, दुधाची साय, मंजीरा, आवळा आदीचे मिश्रण केल्यास उटणे तयार होऊ शकते. सध्या उटणे केवळ दीपावली अभ्यंगस्रानापुरता महत्त्वाचा मानतात.