शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

चार दिवस उटण्याच्या सुगंधात दरवळणार

By admin | Updated: November 10, 2015 00:35 IST

धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा व भाऊबीज या चार सांस्कृतिक विचारधारेशी दिवाळी हा सण जोडला आहे.

उत्सव : आज नरक चतुर्दशी, उद्या दिवाळीसुमित हरकुट  चांदूरबाजारधनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा व भाऊबीज या चार सांस्कृतिक विचारधारेशी दिवाळी हा सण जोडला आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळी या सणाला अधिक महत्त्व असले तरी मातीची पणती, अभ्यंगस्रान व उटण्याने चार दिवस सुगंध दरवळतो.मानवी शरीर पंचतत्त्वापासून बनले आहे. माती ही पंचतत्त्वापैकी एक आहे. त्यामुळे मातीच्याच दिव्याचे महत्त्व दिवाळीला आहेत. दिवा म्हणजे ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक असून शास्त्रानुसार पुण्यकाळात धनसंपत्तीची देवी लक्ष्मी भ्रमणासाठी बाहेर पडली असताना ज्या घरात कलह, दारिद्र्य, रोग व आर्थिक चणचण आहे, परंतु त्या घरात मातीचा दिवा असेल तर त्या घरात लक्ष्मी विराजमान होते, अशी आख्यायिका आहे. धनत्रयोदशीपासून घरासमोर दिवे लावण्याची परंपरा आहे, दिव्यामुळे वास्तुदोष दूर होतो तर वातावरणातील नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा दरवळते. दिवाळीच्या चार दिवसांत अभ्यंगस्रानाला महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात त्वचेवर ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होतो. प्रत्येक क्षणी त्वचा ही निसर्गाशी जुळवून घेत असते. दिवाळीच्या काळात थंडीला सुरुवात होते. निसर्गात चंद्राचा प्रभाव वाढतो. सूर्य दक्षिणायनात जातो, हवेत शीतलता व शरीर आतून उष्णता या दोन्ही घटनांमुळे त्वचा फाटते. त्यामुळे तिळाच्या तेलाने अंग चोळून स्रान करणे म्हणजे अभ्यंगस्रान होय. त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते.आयुर्वेदशास्त्रानुसार उटण्याला अधिक महत्त्व आहे. घरगुती स्वरुपात उटणे म्हणजे हळद, आंबेहळद, दुधाची साय, मंजीरा, आवळा आदीचे मिश्रण केल्यास उटणे तयार होऊ शकते. सध्या उटणे केवळ दीपावली अभ्यंगस्रानापुरता महत्त्वाचा मानतात.