शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

तिवसा तालुक्यात मिळणार अप्पर वर्धाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:47 IST

भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून मागणीची दखल

तिवसा : भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.पाणीटंचाई अधिक गडद झाल्याने अप्पर वर्धा नदीचे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी व धरण विभागाला केली होती. त्याची दखल घेत वर्धा नदीच्या पात्रात रविवारपासून दोन दिवस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.यावर्षी पावसाळा कमी झाल्याने व पाण्याची पातळी खाली गेल्याने अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अप्पर वर्धा धरणाला पाणी सोडण्यात येणार असल्याने मोर्शी, तिवसा व धामनगाव रेल्वे या तालुक्याला याचा फायदा होणार आहे. अप्पर वर्धा धरणात आजघडीला १६.७९ टक्केच पाणीसाठा ुशिल्लक आहे. मागील वर्षी तो पाणीसाठा ३७ टक्के होता. दरम्यान, अप्पर वर्धामध्येच मर्यादित पाणीसाठा असल्याने दोन दिवस नदीपात्रात सोडले जाणारे पाणी अल्पच असेल, असा अनेकांचा होरा आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यास मोझरी व तिवसा पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ होणार असल्याची बाब आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली.धामणगाव तालुक्याच्या २९ गावांना दिलासाधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यातील २९ गावांना दिलासा मिळणार आहे. बगाजी सागर धरणात अल्प पाणी साठा असल्याने शहरातील पंचवीस हजार नागरिकांना दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्याची पाळी नगर परिषदेवर आली होती. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे अप्पर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.गरज भासल्यास आणखी पाणीअमरावती : मुख्यमंत्र्यांकडे ६ मे रोजी नागपूर येथे भाजपाच्यावतीने मागणी केल्यानुसार अप्पर वर्धा धरणातून १२ मे रोजी रात्री १२ वाजता नदीपात्रात १० घनमीटर पाणी सोडले जाईल. यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी उपलब्ध होण्यास मदत व नागरिकांना, गुरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. राज्य सरकार दुष्काळी उपाययोजना राबविण्यास तत्पर असून, गरज भासल्यास आणखी पाणी धरणातून सोडले जाण्याची माहिती भाजप नेत्या निवेदिता दिघडे चौधरी यांनी दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई