शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा तालुक्यात अप्पर वर्धा धरणाचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:19 IST

वर्धा नदीपात्र आटल्याने तिवसा शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी दुपारी ३ वाजतापासून अप्पर वर्धा धरणातून पाच तास पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देआजपासून नियमित टँकर : नागरिकांसह जनावरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वर्धा नदीपात्र आटल्याने तिवसा शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी दुपारी ३ वाजतापासून अप्पर वर्धा धरणातून पाच तास पाणी सोडण्यात आले. रात्री ८ वाजता धरणाचे गेट बंद करण्यात आले. ते पाणी बुधवारी सकाळी ९ वाजता ३७ तासांनंतर तिवसा तालुक्यातील जावरा नदीपात्रात पोहोचले.तिवसा, गुरुदेवनगर, भारवाडी यासह तालुक्यांतील अर्ध्या गावांना वर्धा नदीपात्रातून पाणीपुरवठा होतो. मात्र, यंदा ही नदी आटली आहे. त्यामुळे तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. वर्धा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी सोमवारी आंदोलन केले होते. त्यामुळे सोमवारी दुपारी ३ वाजता अप्पर वर्धा धरणाचे दोन गेट पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही दरवाजे त्याच रात्री ८ वाजता पुन्हा बंद करण्यात आले. पाच तास धरणातून विसर्ग झाला. हे पाणी वर्धा नदीने तिवसा तालुक्यातील जावरा गावातील नदीपात्रात बुधवारी सकाळी ९ वाजता पोहोचले. दुपारपर्यंत ते फत्तेपूर गावाच्या काही अंतरावर येऊन थांबले.गुरुवारपासून टँकरज्या ठिकाणी नदीत तिवसा, गुरुदेवनगर, भारवाडीची पाणीपुरवठा योजना आहे, त्या ठिकाणी पाणी पोहोचणे कठीण आहे. कारण या पाण्याला जास्त प्रवाह नाही. ते ठिकाण अद्याप सहा किमी अंतरावर आहे. मात्र, जावरा नदीपात्रात चार फूट पाणी जमा झाले. यामुळे जनावरांची पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटली आहे. गुरुवारी सकाळपासून तिवसा शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पिण्याच्या पाण्यासाठी राजकारण चुकीचे आहे. तालुक्यातील नागरिकांना नियमितपणे पाणीपुरवठा करणे प्रशासनाचे काम आहे. अप्पर वर्धा धरणात जलसाठा उपलब्ध असताना अडवणूक केली. आता आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसाशहराला पाणीपुरवठा करणारी वर्धा नदी आटल्याने अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडणे गरजेचे होते. आ. ठाकूर यांनी पाण्याचा मुद्दे रेटून धरल्याने या आंदोलनाला यश आले. आता गुरुवारपासून तिवसा येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल.- वैभव वानखडे, नगराध्यक्षआमदार यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाचे फलित म्हणून प्रकल्पाचे पाणी आले. पाणीटंचाईच्या भागात आता टँकरने पाणीपुरवठा होईल. जनतेचा आंदोलनात सक्रिय सहभाग होता.- पांडुरंग मक्रमपुरे, सरपंच, गुरुदेवनगर

टॅग्स :water shortageपाणीटंचाई