शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

गावकऱ्यांना घरपोच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 11, 2016 00:14 IST

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या

वणी (बेलखेड) ग्रामपंचायतचा उपक्रम : पाण्याचा दर फक्त २५ पैसे लिटरसुमित हरकुट चांदूरबाजारसंपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या गावाने आपल्या गावकऱ्यांना शुद्ध व थंडगार पाणी घरपोच पुरवठा करण्याचा नावीन्यपूर्ण भर उन्हाळ्यात राबविला आहे. हा उपक्रम राबविणारी विदर्भातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. पाणी म्हणजे जीवन. याच पाण्यासाठी यापुढील महायुद्ध होईल असे भविष्य अनेकदा वर्तविण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना सरकारलाही तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी राज्यातील एखादी ग्रामपंचायत स्वत:हून पुढे येऊन आपल्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असेल तर शासनाला आनंदच होतो. तोही पाणी पुरवठा शुद्ध व थंडगार पाण्याचा घरपोच होत असेल तर शासनासह गावातील नागरिकांच्याही आनंदाला पारावर नसते. असाच काहीसा सर्व ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरणारा उपक्रम वणी (बेलखेड) ग्रामपंचायतने राबविला आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गावकऱ्यांसाठी कायमस्वरुपी शुद्धी व थंड पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १४ व्या वित्त आयोगातील केंद्र सरकारद्वारा देण्यात येणारा ५ लाख ३० हजार रुपयाचा निधी खर्च करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतने घेतला. त्यासाठी कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या बोअरवेलवर आरओ मशीन बसविण्याचा विचार सर्वानुमते घेण्यात येऊन त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली. काम पूर्ण होताच त्या ठिकाणी पाण्याचे एटीएम बसविण्यात आले. याचा शुभारंभ डिसेंबरमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एक रुपया टाकून चार लिटर शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था झाली. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करीत त्यांना फिल्टर पाणी देण्याची व्यवस्था तर झाली. परंतु गावकऱ्यांना थंड पाणी देऊन ग्रामपंचायतला दररोज आवक कमी होईल याचाही विचार ग्रामपंचायतने सुरू केला. त्याप्रमाणे फिल्टर मशीनसोबत चिलर मशीन बसवून २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध व थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करून पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करुन पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटर प्रमाणे असणारे शुद्ध पाणी ही ग्रामपंचायत आपल्या गावकऱ्यांना फक्त २५ पैसे प्रति लिटर इतक्या कमी दरात पाणी पिण्यासाठी पुरविते हे या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या नाविण्यपूर्ण पाणी पुरवठा योजना राबविल्याबद्दल सरपंच सूरज चव्हाण, उपसरपंच मंगेश देशमुख, सदस्य संगीता हिवराळे, देवका वासनिक, नंदा नवाडे, वैशाली जावरकर, गुलनाज परवीन नवशाद, उमेश कोठाळे, नितीन अलोणे व सचिव धनंजय देशमुख यांचे गावकऱ्यांसह तालुक्यातही सर्वांकडून कौतुक होत आहे. या पिण्याचे पाण्याचे वैशिष्ट्य असे की, ग्रामपंचायतकडून फक्त ४९ टिडीएस असलेले पाणी गावकऱ्यांना देण्यात येत आहे.