शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांना घरपोच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 11, 2016 00:14 IST

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या

वणी (बेलखेड) ग्रामपंचायतचा उपक्रम : पाण्याचा दर फक्त २५ पैसे लिटरसुमित हरकुट चांदूरबाजारसंपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या गावाने आपल्या गावकऱ्यांना शुद्ध व थंडगार पाणी घरपोच पुरवठा करण्याचा नावीन्यपूर्ण भर उन्हाळ्यात राबविला आहे. हा उपक्रम राबविणारी विदर्भातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. पाणी म्हणजे जीवन. याच पाण्यासाठी यापुढील महायुद्ध होईल असे भविष्य अनेकदा वर्तविण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना सरकारलाही तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी राज्यातील एखादी ग्रामपंचायत स्वत:हून पुढे येऊन आपल्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असेल तर शासनाला आनंदच होतो. तोही पाणी पुरवठा शुद्ध व थंडगार पाण्याचा घरपोच होत असेल तर शासनासह गावातील नागरिकांच्याही आनंदाला पारावर नसते. असाच काहीसा सर्व ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरणारा उपक्रम वणी (बेलखेड) ग्रामपंचायतने राबविला आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गावकऱ्यांसाठी कायमस्वरुपी शुद्धी व थंड पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १४ व्या वित्त आयोगातील केंद्र सरकारद्वारा देण्यात येणारा ५ लाख ३० हजार रुपयाचा निधी खर्च करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतने घेतला. त्यासाठी कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या बोअरवेलवर आरओ मशीन बसविण्याचा विचार सर्वानुमते घेण्यात येऊन त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली. काम पूर्ण होताच त्या ठिकाणी पाण्याचे एटीएम बसविण्यात आले. याचा शुभारंभ डिसेंबरमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एक रुपया टाकून चार लिटर शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था झाली. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करीत त्यांना फिल्टर पाणी देण्याची व्यवस्था तर झाली. परंतु गावकऱ्यांना थंड पाणी देऊन ग्रामपंचायतला दररोज आवक कमी होईल याचाही विचार ग्रामपंचायतने सुरू केला. त्याप्रमाणे फिल्टर मशीनसोबत चिलर मशीन बसवून २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध व थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करून पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करुन पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटर प्रमाणे असणारे शुद्ध पाणी ही ग्रामपंचायत आपल्या गावकऱ्यांना फक्त २५ पैसे प्रति लिटर इतक्या कमी दरात पाणी पिण्यासाठी पुरविते हे या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या नाविण्यपूर्ण पाणी पुरवठा योजना राबविल्याबद्दल सरपंच सूरज चव्हाण, उपसरपंच मंगेश देशमुख, सदस्य संगीता हिवराळे, देवका वासनिक, नंदा नवाडे, वैशाली जावरकर, गुलनाज परवीन नवशाद, उमेश कोठाळे, नितीन अलोणे व सचिव धनंजय देशमुख यांचे गावकऱ्यांसह तालुक्यातही सर्वांकडून कौतुक होत आहे. या पिण्याचे पाण्याचे वैशिष्ट्य असे की, ग्रामपंचायतकडून फक्त ४९ टिडीएस असलेले पाणी गावकऱ्यांना देण्यात येत आहे.