शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गावकऱ्यांना घरपोच पाणीपुरवठा

By admin | Updated: April 11, 2016 00:14 IST

संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या

वणी (बेलखेड) ग्रामपंचायतचा उपक्रम : पाण्याचा दर फक्त २५ पैसे लिटरसुमित हरकुट चांदूरबाजारसंपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या गावाने आपल्या गावकऱ्यांना शुद्ध व थंडगार पाणी घरपोच पुरवठा करण्याचा नावीन्यपूर्ण भर उन्हाळ्यात राबविला आहे. हा उपक्रम राबविणारी विदर्भातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. पाणी म्हणजे जीवन. याच पाण्यासाठी यापुढील महायुद्ध होईल असे भविष्य अनेकदा वर्तविण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना सरकारलाही तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी राज्यातील एखादी ग्रामपंचायत स्वत:हून पुढे येऊन आपल्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असेल तर शासनाला आनंदच होतो. तोही पाणी पुरवठा शुद्ध व थंडगार पाण्याचा घरपोच होत असेल तर शासनासह गावातील नागरिकांच्याही आनंदाला पारावर नसते. असाच काहीसा सर्व ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरणारा उपक्रम वणी (बेलखेड) ग्रामपंचायतने राबविला आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गावकऱ्यांसाठी कायमस्वरुपी शुद्धी व थंड पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १४ व्या वित्त आयोगातील केंद्र सरकारद्वारा देण्यात येणारा ५ लाख ३० हजार रुपयाचा निधी खर्च करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतने घेतला. त्यासाठी कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या बोअरवेलवर आरओ मशीन बसविण्याचा विचार सर्वानुमते घेण्यात येऊन त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली. काम पूर्ण होताच त्या ठिकाणी पाण्याचे एटीएम बसविण्यात आले. याचा शुभारंभ डिसेंबरमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एक रुपया टाकून चार लिटर शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था झाली. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करीत त्यांना फिल्टर पाणी देण्याची व्यवस्था तर झाली. परंतु गावकऱ्यांना थंड पाणी देऊन ग्रामपंचायतला दररोज आवक कमी होईल याचाही विचार ग्रामपंचायतने सुरू केला. त्याप्रमाणे फिल्टर मशीनसोबत चिलर मशीन बसवून २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध व थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करून पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटरच्या कॅनमध्ये शुद्ध थंडगार पाणी गावकऱ्यांना घरपोच पुरवठा करण्याची व्यवस्था करुन पुरवठा सुरू करण्यात आला. आज २० लिटरच्या १०० कॅन पाच रुपये प्रति कॅन दराने गावकऱ्यांना पुरविण्यात येतात. बाजारात २० लिटर प्रमाणे असणारे शुद्ध पाणी ही ग्रामपंचायत आपल्या गावकऱ्यांना फक्त २५ पैसे प्रति लिटर इतक्या कमी दरात पाणी पिण्यासाठी पुरविते हे या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या नाविण्यपूर्ण पाणी पुरवठा योजना राबविल्याबद्दल सरपंच सूरज चव्हाण, उपसरपंच मंगेश देशमुख, सदस्य संगीता हिवराळे, देवका वासनिक, नंदा नवाडे, वैशाली जावरकर, गुलनाज परवीन नवशाद, उमेश कोठाळे, नितीन अलोणे व सचिव धनंजय देशमुख यांचे गावकऱ्यांसह तालुक्यातही सर्वांकडून कौतुक होत आहे. या पिण्याचे पाण्याचे वैशिष्ट्य असे की, ग्रामपंचायतकडून फक्त ४९ टिडीएस असलेले पाणी गावकऱ्यांना देण्यात येत आहे.