शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

महानगरात सोमवारी होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 5:00 AM

शनिवारी रात्री २ वाजता ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी केली जाईल, असे मजीप्राचे उपअभियंता यांनी सांगितले. त्यानंतर, महानगरातील जलकुंभात पाणी भरण्यात येणार आहे. त्यानंतर, वेळापत्रकानुसार नागरिकांना सोमवारी पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती महानगरातील जलकुंभात सिंभोरा येथून पाणी पोहोचण्यास वेळ लागेल, अशी माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी रहाटगावनजीक पुन्हा फुटल्याने, ती दुरुस्त होण्यास शनिवारी मध्यरात्र उजाडेल. त्यामुळे अमरावतीकरांना सोमवारी पाणीपुरवठा होईल, असे संकेत उपकार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी अभियंते, कंत्राटदारांसह ३० जणांची चमू घटनास्थळी तळ ठोकून आहे. मात्र, मजीप्राच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.गत आठवड्यात पाच दिवस पाणीपुरवठा नाही. आता शनिवार, रविवार असे दोन दिवस पुन्हा जलवाहिनी लीकेजमुळे पाण्याचे नियोजन बिघडविले आहे. यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यात मजीप्रा सपशेल अपयशी ठरल्याचे वास्तव आहे. किमान पावसाळ्यात तरी पाणीपुरवठा सुरळीत होईल की नाही, हेही गुलदस्त्यात आहे. फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीची कामे शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून निरंतरपणे सुरू आहे. शनिवारी रात्री २ वाजता ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी केली जाईल, असे मजीप्राचे उपअभियंता यांनी सांगितले. त्यानंतर, महानगरातील जलकुंभात पाणी भरण्यात येणार आहे. त्यानंतर, वेळापत्रकानुसार नागरिकांना सोमवारी पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती महानगरातील जलकुंभात सिंभोरा येथून पाणी पोहोचण्यास वेळ लागेल, अशी माहिती आहे. जलहवाहिनी दुरुस्तीचे कामे वेगाने होण्यासाठी घटनास्थळी कार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांच्यासह उपअभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता, कंत्राटदारांसह मजूर वर्ग कार्यरत आहे.

महापालिकेत टँकरची वानवानऊ लाख लाेकसंख्येच्या महानगरात महापालिकेकडे पाण्यासाठी केवळ दोनच टॅंकर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा अशी स्थिती उद्भवली असताना प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने घेण्यात येत नाही. आता कुठे तरी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी पाच नव्याने टॅंकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती महानगरात पाचही झोन अंतर्गत प्रत्येकी एक टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. 

पाण्याच्या कॅन महागल्याकाही दिवसांपासून मजीप्राकडून पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाणी विक्रेत्यांनी ही बाब ‘कॅश’ करण्याला प्राधान्य दिले आहे. पाण्याच्या कॅनचे दर ३० रुपयांहून ४० ते ५० रुपये करण्यात आले आहे. मजीप्राचा पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहरातील काही भागात हँडपंपमध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. पुढील दोन दिवस पाण्यासाठी भटकंती होणार आहे. 

 

टॅग्स :water transportजलवाहतूक