शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:07 IST

पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पक्षेत्रांत चार ते पाच दिवसांतील पावसामुळे पाणीसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ जलसंपदा विभागाने नोंदविली आहे.

- संदीप मानकरअमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पक्षेत्रांत चार ते पाच दिवसांतील पावसामुळे पाणीसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ जलसंपदा विभागाने नोंदविली आहे. मात्र, हा पाऊस पुरेसा नाही. अद्यापही अनेक प्रकल्पांची कोरड कायम असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा प्रकल्पक्षेत्रात आहे. २७ जून रोजी प्रकल्पांतील एकूण जलसाठा १०.८९ टक्के होता. तो आता १२.५२ टक्के झाला आहे.  विभागातील नऊ मध्यम प्रकल्पांमध्ये १३.११ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये १६.८६ टक्के आणि ४६९ लघु प्रकल्पांमध्ये ९.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठ्यात सरासरी दोन टक्क्यांची वाढ झाली असली तरी सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला नसल्याने काही जिल्ह्यांत मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात २९.४१ टक्के, चंद्रभागा २७.९०, पूर्णा २४.६५, सपन ३८.७३, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस १९.४९, सायखेडा १८.६५, गोकी २०.५६, वाघाडी ११.६२, बोरगाव १०.८९, नवरगाव ४०.४६, अडाण ४.६१, अकोला जिल्ह्यातील मोर्णा १०.२३, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी ७.३५, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १५.५०, पलढग ३४.८९, मस ७.२५, मन २१.१२, तोरणा १८, तर उतावळी प्रकल्पात १८.५४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, उमा, घुंगशी, वाशिम जिल्ह्यातील सोनल आणि कोराडी प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. बॉक्स मोठ्या प्रकल्पांची स्थिती मौठ्या प्रकल्पांपैकी अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा धरणात १२.२६ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २१.०१ टक्के, अरुणावती ९.५१, बेंबळा १८.८२, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५.१२, वान २५.७१, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ६.३८ टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात १२.८७ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा शून्य टक्क््यांवर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पेनटाकळी प्रकल्पात ३.८५ टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे.