शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

पश्चिम विदर्भात पाणीसाठा ६५.६९ टक्क्यांवर; विभागातील १८ मोठ्या व मध्यम प्रकल्पांतून विसर्ग

By जितेंद्र दखने | Updated: August 19, 2024 22:59 IST

अद्यापही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्याने धरणांमधून पाणी सोडून देण्यात येत आहे. या विसर्गामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

अमरावती : पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तीन मोठ्या प्रकल्पांसह एकूण १८ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा हा ६५.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. अद्यापही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्याने धरणांमधून पाणी सोडून देण्यात येत आहे. या विसर्गामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

अमरावती विभागातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील पाण्याची पातळी ३४१.२४ मीटरवर पोहोचली आहे. धरणामध्ये ४५५.८८ दशलक्ष घनमीटर जलसाठा (८०.८२ टक्के) झाला आहे. धरणाचे ५ दरवाजे हे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, १९६ क्युसेक पाणी सोडले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस आणि बेंबळा या प्रकल्पांमधूनही पाणी सोडण्यात येत असून, बेंबळा नदी दुथडी भरून वाहत आहे. बेंबळा प्रकल्पाचे २ दरवाजे २५ सेंमी उघडले आहेत. विसर्ग ४२ क्युसेक एवढा आहे.

पूस प्रकल्पातून १९.२५ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ सेंमी उघडले आहेत. या धरणातून ४८.२२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. पश्चिम विदर्भातील एकूण २७ पैकी १४ मध्यम प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा, पूर्णा, सपन, गर्गा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव या प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, घुंगशी बॅरेज तसेच वाशिम जिल्ह्यातील अडाण, सोनल आणि बुलढाणा जिल्ह्यातील मस या मध्यम प्रकल्पांमधूनही विसर्ग सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून पश्चिम विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस पडला आहे. परिणामी पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्वाधिक विसर्ग उर्ध्व वर्धा प्रकल्पातून होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठची गावे तसेच वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.