शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पश्चिम विदर्भात पाणीसाठा ६५.६९ टक्क्यांवर; विभागातील १८ मोठ्या व मध्यम प्रकल्पांतून विसर्ग

By जितेंद्र दखने | Updated: August 19, 2024 22:59 IST

अद्यापही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्याने धरणांमधून पाणी सोडून देण्यात येत आहे. या विसर्गामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

अमरावती : पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तीन मोठ्या प्रकल्पांसह एकूण १८ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा हा ६५.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. अद्यापही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्याने धरणांमधून पाणी सोडून देण्यात येत आहे. या विसर्गामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

अमरावती विभागातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील पाण्याची पातळी ३४१.२४ मीटरवर पोहोचली आहे. धरणामध्ये ४५५.८८ दशलक्ष घनमीटर जलसाठा (८०.८२ टक्के) झाला आहे. धरणाचे ५ दरवाजे हे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, १९६ क्युसेक पाणी सोडले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस आणि बेंबळा या प्रकल्पांमधूनही पाणी सोडण्यात येत असून, बेंबळा नदी दुथडी भरून वाहत आहे. बेंबळा प्रकल्पाचे २ दरवाजे २५ सेंमी उघडले आहेत. विसर्ग ४२ क्युसेक एवढा आहे.

पूस प्रकल्पातून १९.२५ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ सेंमी उघडले आहेत. या धरणातून ४८.२२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. पश्चिम विदर्भातील एकूण २७ पैकी १४ मध्यम प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा, पूर्णा, सपन, गर्गा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव या प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, घुंगशी बॅरेज तसेच वाशिम जिल्ह्यातील अडाण, सोनल आणि बुलढाणा जिल्ह्यातील मस या मध्यम प्रकल्पांमधूनही विसर्ग सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून पश्चिम विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस पडला आहे. परिणामी पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्वाधिक विसर्ग उर्ध्व वर्धा प्रकल्पातून होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठची गावे तसेच वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.