शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:27 IST

यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे प्रकल्प, विहिरींच्या भूजलांवर गंभीर परिणाम जाणवत असून ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देआराखडा नाही, बैठकी ढेपाळल्या : दीड मीटरने विहिरींची पातळी खाली

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे प्रकल्प, विहिरींच्या भूजलांवर गंभीर परिणाम जाणवत असून ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद उद्भवणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, पाणीटंचाई या भीषण समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती यंत्रणांनी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला नाही, हे वास्तव आहे.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाइचे स्वरूप लक्षात घेता उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार पाणीपुरवठा निधीची तरतूद करून कृती आराखडा मंजूर केला जातो. परंतु यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाला असताना प्रशासनाने आतापर्यत कृती आराखडा किंवा बैठकी घेण्याची तसदी घेतली नाही. येत्या काळात पाणीटंचाईचे गडद संकट असल्याचे संकेत भुवैज्ञानिकांनी दिले असताना प्रशासकीय यंत्रणा गाफील असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा अल्प आहे. भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. जिल्ह्यात १४४ निरिक्षण विहिरींच्या सर्वेक्षणाअंती भूजल सर्वेक्षण विभागाचे निरिक्षण धक्कादायक आहे. असे असताना मेळघाटातील धारणी व चिखलदरा, वरूड, मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीकडून संभाव्य पाणी टंचाईबाबत अहवाल जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला अप्राप्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचा अंतिम आराखडा तयार झाला नसल्याचे वास्तव आहे. आराखडा तयार नाही. त्यामुळे जिल्हा पाणीटंचाईला जिल्हाधिकारी कशी मान्यता प्रदान करणार? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गतवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी युद्धस्तरावर बैठकी घेऊन आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यंदा पाणीटंचाई आराखड्याबाबत प्रशासकीय स्तरावर कमालीची शांतता आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल, असे संकेत मिळाले आहे.आराखड्याची रक्कम वाढण्याची शक्यतापाणीटंचाई आराखड्यात यंदा चारपट वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी आराखडयानुसार बहुतांश निधी खर्च झाला. मात्र, यावर्षी पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेता आराखड्याची रक्कम वाढेल, यात दुमत नाही. परंतु पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संंबंधित यंत्रणांकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सहा तालुक्याचा भूजलस्तर कमीजिल्ह्यातील १४ पैकी सहा तालुक्यात भूजलस्तर घटला आहे. यात अचलपूर,चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, भातकुली अमरावती आणि दर्यापूर या तालुक्यांचा समावेश आहे.चिखलदरा तालुक्याला टँकरने पाणीपुरवठाभूजलस्तर घटल्याचा सर्वाधिक फटका पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पस्तलई, लवादा, आलाडोह, भांदरी, ढोमणीफाटा, तारूबांदा, मोताखेडा या गावांना बसतो. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ही परिस्थिती येत्या उन्हाळ्यात उद्भवणार, असे संकेत पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांकडून मिळाले आहे.जिल्ह्यातील १४ पैकी ९ पंचायत समितीकडून संभाव्य पाणीटंचाईचे अहवाल प्राप्त झाले. मात्र, वरूड, मोर्शी, धारणी, चिखलदरा व नांदगाव या पाच पंचायत समितींचे अहवाल मिळालेले नाहीत. त्यामुळे अंतिम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली नाही.- संजय येवले,कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, अमरावतीभूजल सर्वेक्षणांती अहवालानुसार दीड मीटर पाणी पातळी कमी झाली आहे. यात सहा तालुक्यांत पाणी टंचाईचा गंभीर सामना करावा लागेल. वरिष्ठांना संभाव्य पाणी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला आहे.- विजय खरड, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग