शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

गाजली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:04 IST

जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईच्या समस्येवर कोणते नियोजन व उपाययोजना केल्या आहेत, या मुद्द्यावर जिल्हा परिषदेतील विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी शुक्रवारी आमसभेत प्रशासनाला धारेवर धरले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद आमसभा : विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईच्या समस्येवर कोणते नियोजन व उपाययोजना केल्या आहेत, या मुद्द्यावर जिल्हा परिषदेतील विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी शुक्रवारी आमसभेत प्रशासनाला धारेवर धरले.मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निधी मंजूर झाला आहे. मग योजना का सुरू केली नाही, असा सवाल सदस्यांनी करीत मजीप्रा व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सध्या दुष्काळग्रस्त वरूड, मोर्शी तालुक्यांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा विभागाची कार्यवाही शून्य आहे. पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. सोबतच वरील दोन्ही तालुक्यांना हातपंप दुरुस्तीसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करू न देण्याची मागणी सभागृहात सदस्यांनी केली.अचलपूर, चांदूर बाजार या तालुक्यांतही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही भागांमध्ये निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा विभागाने काही वर्षांपूर्वी बळेगाव येथे पाण्याची टाकी बांधली आहे. मात्र, या टाकीचे काम निकृ ष्ट दर्जाचे झाल्याचा मुद्दा प्रवीण तायडे यांनी उपस्थित केला. बबलू देशमुख यांनी समर्थन करीत संपूर्ण जिल्ह्यात पाण्याच्या टाकीचे काम असमाधानकारक असून, सखोल चौकशीची मागणी सभागृहात केली.धोतरखेड पाणीपुरवठा योजनेसंदर्भात प्रताप अभ्यंकर यांनी मुद्दा मांडला. यावेळी शिक्षण, बांधकाम, सिंचन, महिला व बाल कल्याण, कृषी, पंचायत याही विभागांचे मुद्दे सदस्य पूजा हाडोळे, प्रियंका दगडकर, विक्रम ठाकरे, प्रकाश साबळे, महेंद्रसिंह गैलवार, वासंती मंगरोळे, दिनेश टेकाम आदींनी मांडले. पीठासीन सभापती नितीन गोंडाणे यांनी या सूचना मान्य केल्या. सभेला सर्व पदाधिकारी, सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.मोर्शी, वरूड तालुक्यांतील पाणीटंचाईचा मुद्दा रेटण्यात उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सारंग खोडस्कर, शरद मोहोड, संजय घुलक्षे, प्रताप अभ्यंकर, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे , सुहासिनी ढेपे, गौरी देशमुख यांचा सहभाग होता.बबलू देशमुख यांनी अध्यक्षांना वाहन खरेदीबाबत प्रस्ताव तयार करावा व शासनाकडे पाठवून व्यवस्था करावी, अशी सूचना केली. ही मागणी पीठासीन सभापतींनी मंजूर केली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे हे होते. प्रशासकीय धुरा प्रभारी सीईओ विनय ठमके यांनी सांभाळली.शिंदी येथील बोअरवेल पळविलीअचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे १६ लाख रुपयातून बोअरवेल मंजूर करण्यात आली होती. ती काकडा गावात करण्यात आल्याने शिंदी येथे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिंदी सर्कलच्या सदस्य शिल्पा भलावी यांनी केल्यावरही प्रशासनाने दखल घेतली नाही. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बबलू देशमुख यांनी केली. त्यानुसार चौकशी करून भलावी यांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यातून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता सावळकर यांनी दिले.तोडगा काढणार, कृषी अधिकाऱ्याचे आश्वासनजिल्हा परिषदेच्या ३० नोव्हेंबरच्या सभेत पटलावरील बरेच मुद्दे सहमतीने मंज़ूर करण्यात आले. जिल्हा परिषद सेस फंड (जिल्हा निधी) मधून लोकपयोगी कामांचे सुमारे सात कोटीचे नियोजन मंजूर करताना प्रत्येक सदस्याच्या सर्कलमध्ये काम मिळावे. बांधकाम विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणाच्या १ कोटी ५४ लाखांच्या नियोजनातही समसमान न्याय द्यावा, अशी मागणी रवींद्र मुंदे यांनी केली. यावर बबलू देशमुख यांनी तसा ठराव तरतुदीनुसार मंजूर करण्यास ठेवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत विहीर मंजूर करताना अंतराचे संमतिपत्र जोडले असताना प्रस्ताव मंजूर होत नसल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर कृषी अधिकारी तडवी यांनी सीईओंच्या मार्गदर्शनात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.