शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

पश्चिम विदर्भात तीन हजार गावांत पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 15:35 IST

४३३५ उपाययोजना प्रस्तावित : आराखडा तयार, ९५.२० कोटींचा खर्च 

अमरावती : सरासरीच्या २५ टक्के कमी पावसामुळे पश्चिम विदर्भात भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नसल्याने भूजलात १२ फुटांपर्यंत कमी आलेली आहे. परिणामी जानेवारी ते जून या कालावधीत तीन हजार दोन गावांना पाणीटंचाई झळ पोहोचणार आहे. यासाठी ४३५१ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. यावर ६०.२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांनी शासनाला सादर केला.

अत्यल्य पावसामुळे यंदा गावागावांतील जलस्त्रोत आटायला सुरुवात झाली आहे. भूजल पातळीदेखील मोठ्या प्रमाणावर घटली आहे. लहान-मोठ्या ५०२ प्रकल्पांच्या साठ्यात घट झाल्याने आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष राहणार असल्याचे वास्तव आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, विभागात पाणीटंचार्ईच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत  १,८५२ गावांमध्ये पाणीटंचाईची धग जाणवणार आहे. यासाठी २९२८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ५१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.

 एप्रिल ते जून या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात ११५० गावांत पाणी टंचाई राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा १३७३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ९.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. कृती आराखड्यानुसार १५२ गावांध्ये ४४१ विहिरी खोल करण्यात येणार आहे. यावर १.९० कोटींचा खर्च होईल, २६५२ गावांत २८९७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. यावर २१.१२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ५२२ गावांतील ४८१ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर १५.९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ११०८ गावांमध्ये १३०८ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येईल. यावर १२.१८ कोटी व २३४ गावांमध्ये २०२ तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी ९.३५ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

 ५०२ प्रकल्पांत ३८ टक्केच जलसाठा

  • विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ३५ टक्के जलसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के जलसाठा आहेत, तर ४६९ लघु प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा आहे. एकूण ५०२ प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहित धरता मार्चअखेर प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. विभागात बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प आताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. 
  • विभागात सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात ५१, अकोला चार व बुलडाणा जिल्ह्यात १२१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात १ व बुलडाणा २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
टॅग्स :water shortageपाणीटंचाईVidarbhaविदर्भ