शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात तीन हजार गावांत पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 15:35 IST

४३३५ उपाययोजना प्रस्तावित : आराखडा तयार, ९५.२० कोटींचा खर्च 

अमरावती : सरासरीच्या २५ टक्के कमी पावसामुळे पश्चिम विदर्भात भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नसल्याने भूजलात १२ फुटांपर्यंत कमी आलेली आहे. परिणामी जानेवारी ते जून या कालावधीत तीन हजार दोन गावांना पाणीटंचाई झळ पोहोचणार आहे. यासाठी ४३५१ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. यावर ६०.२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांनी शासनाला सादर केला.

अत्यल्य पावसामुळे यंदा गावागावांतील जलस्त्रोत आटायला सुरुवात झाली आहे. भूजल पातळीदेखील मोठ्या प्रमाणावर घटली आहे. लहान-मोठ्या ५०२ प्रकल्पांच्या साठ्यात घट झाल्याने आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष राहणार असल्याचे वास्तव आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, विभागात पाणीटंचार्ईच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत  १,८५२ गावांमध्ये पाणीटंचाईची धग जाणवणार आहे. यासाठी २९२८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ५१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.

 एप्रिल ते जून या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात ११५० गावांत पाणी टंचाई राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा १३७३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ९.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. कृती आराखड्यानुसार १५२ गावांध्ये ४४१ विहिरी खोल करण्यात येणार आहे. यावर १.९० कोटींचा खर्च होईल, २६५२ गावांत २८९७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. यावर २१.१२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ५२२ गावांतील ४८१ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर १५.९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ११०८ गावांमध्ये १३०८ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येईल. यावर १२.१८ कोटी व २३४ गावांमध्ये २०२ तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी ९.३५ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

 ५०२ प्रकल्पांत ३८ टक्केच जलसाठा

  • विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ३५ टक्के जलसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के जलसाठा आहेत, तर ४६९ लघु प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा आहे. एकूण ५०२ प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहित धरता मार्चअखेर प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. विभागात बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प आताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. 
  • विभागात सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात ५१, अकोला चार व बुलडाणा जिल्ह्यात १२१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात १ व बुलडाणा २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
टॅग्स :water shortageपाणीटंचाईVidarbhaविदर्भ