शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अमरावती विभागात १५७ गावात पाणीटंचाई

By admin | Updated: July 7, 2014 00:49 IST

राज्यातील ३४२१ गावांमध्ये ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अकोला : जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपत आला असला तरी पाऊस आला नसल्यामुळे राज्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील विविध विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून, राज्यातील ३४२१ गावांमध्ये ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला असला तरी जल साठवणुकीचे नसलेले नियोजन व पाण्याचा अर्मयाद वापर, यामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. राज्यातील ३४२१ गावांमध्ये तसेच ९२0२ वाड्यांमध्ये सध्या ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक १५६२ गावांमध्ये १९५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सर्वात कमी ३४ गावांमध्ये २७ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी विदर्भात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नाही तर गतवर्षीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षी अर्धा पावसाळा संपत आला तरी पावसाचा थेंबही पडला नसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. मराठवाड्यापाठोपाठ पुणे विभागातही पाणीटंचाईचे संकट जाणवत आहे. या विभागात १0१६ गावांमध्ये १३९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ६५२ गावांमध्ये ७६७ टँकर, अमरावती विभागात १५७ गावांमध्ये १९३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.