शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात १५७ गावात पाणीटंचाई

By admin | Updated: July 7, 2014 00:49 IST

राज्यातील ३४२१ गावांमध्ये ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अकोला : जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपत आला असला तरी पाऊस आला नसल्यामुळे राज्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील विविध विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून, राज्यातील ३४२१ गावांमध्ये ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला असला तरी जल साठवणुकीचे नसलेले नियोजन व पाण्याचा अर्मयाद वापर, यामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. राज्यातील ३४२१ गावांमध्ये तसेच ९२0२ वाड्यांमध्ये सध्या ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक १५६२ गावांमध्ये १९५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सर्वात कमी ३४ गावांमध्ये २७ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी विदर्भात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नाही तर गतवर्षीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षी अर्धा पावसाळा संपत आला तरी पावसाचा थेंबही पडला नसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. मराठवाड्यापाठोपाठ पुणे विभागातही पाणीटंचाईचे संकट जाणवत आहे. या विभागात १0१६ गावांमध्ये १३९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ६५२ गावांमध्ये ७६७ टँकर, अमरावती विभागात १५७ गावांमध्ये १९३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.