शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

पाणीटंचाईची धग वाढली, १४३ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:09 IST

उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले असून, टँकरचीही मागणी वाढत आहे.

ठळक मुद्देपाणीस्त्रोत आटले : १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले असून, टँकरचीही मागणी वाढत आहे.गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका नागरिकांना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया योजनांचे जलस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. पाणी टंचाईची समस्या चिखलदरा तालुक्यात टंचाईग्रस्त गावाची संख्या बरीच आहे. त्यानंतर इतर तालुक्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची दाहकता कमी करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार उपायोजना सुरू केल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव परिसरातील पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहित करून ते ग्रामस्थांना पुरविले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. १२ गावांना ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे जि.प. पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले. मेळघाटसोबतच आता सपाटीवरील गावातून विहीर अधिग्रहण, नळदूरूस्ती योजना, कूपनलिका आदींसाठी प्रस्ताव येत आहेत. एकंदर जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून, विहीर अधिग्रहणासोबत टँकरने पाणीपुरवठा करून प्रशासन गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.१२ गावांना टँकरने पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.गत आठ दिवसांत टँकरची संख्याही वाढली असून सध्या १२ गावांना ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात चिखलदरा तालुक्यातील पस्तलाई, भांद्री, सोनापूर, तारूबांदा, पाचडोंगरी, कोयलारी, मनभंग, सोमवारखेडा, गौलखेडा, नागापूर व मोर्शी तालुक्यातील सावरखेडा गावांचा समावेश आहे.१७० गावांत कूपनलिकापाणीस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १८१ कूपनलिकांपैकी ४९ गावांत सध्या कामे सुरू आहे. याशिवाय १८२ गावांमध्ये नळयोजना, दुृरूस्तीची कामे सुरू आहेत. मात्र विहीर खोलीकरण, गाळ काढणे असे एकही काम सध्या तरी सुरू नसल्याचे या अहवालातील माहितीनुसार दिसून येत आहे.अप्परवर्धा प्रक ल्पात ३६.७१ टक्के जलसाठाअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्परवर्धा प्रकल्पामध्ये रविवारअखेर ३२१ दलघमी जलसाठा असून, त्यातील २०७ दलघमी जलसाठा उपयुक्त आहे. उपयुक्त जलसाठ्याची ही टक्केवारी ३६.७१ टक्के असून, गतवर्षी याचवेळी या प्रक ल्पात ३७.५८ टक्के जलसाठा होता.