शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

२५ ठिकाणचे पाणीनमुने दूषित; आरोग्य विभागाने बजाविली नोटीस

By जितेंद्र दखने | Updated: May 9, 2024 21:49 IST

खबरदारीसाठी उपाययोजना करण्याचे ग्रामपंचायतींना निर्देश

अमरावती : वाढत्या तापमानासोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यातल्या त्यात दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधित गटविकास अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

ग्रामीण सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असतांना काही ठिकाणी जलस्त्रोताचे पाणी नमूने दूषित आले आहेत. असे असले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही साथरोगाचा प्रादुर्भाव नसल्याचा माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात अतिसार, टायफाइडचे रुग्ण आढळून येत असतात, खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागांतर्गत साथरोग विभागाकडून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचे पाणी नमुने तपासले जातात.

त्यानुसार मार्चमध्ये १४ तालुक्यांतील १ हजार ४९१ पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यापैकी २५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य आढळून आले आहे. दूषित जलस्रोतांमध्ये अतिरिक्त ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून ते पाणी पिण्यास योग्य केले जाते. गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांमध्ये नियमानुसार ब्लिचिंग पावडरचे प्रमाण असणे गरजेचे आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याने काही ठकाणी पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.११ टॅकरव्दारे पाणी पुरवठासद्यःस्थितीत जिल्ह्यात ११ टँकर सुरू असून त्या माध्यमातून नागरिकांची तहान भागविण्यात घेत आहे. खांदूरेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला, मोथा, धामकडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी एक तर खडीमल येथे चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही झाली नसल्याने या गावांना टँकराद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी टँकरच्या दुषित पाण्यामुळेच चिखलदरा तालुक्यातील पाचङोंगरी,कोयलारी या गावांमध्ये साथजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सद्यःस्थितीत ११ टँकरच्या माध्यमातून गावांची तहान भागविली जात आहे.

तालुकानिहाय दूषित नमुन्यांची संख्याअमरावती ६,अचलपूर ३, चांदूर रेल्वे ३, धामणगाव ३ ,तिवसा १ ,दर्यापूर१,वरूड ४, भातकुली ४

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणAmravatiअमरावती