शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आली जलसमृद्धी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:06 IST

Amravati News water नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्गाच्या कामाला वेग३८ नाला खोलीकरण, १० साठवण तलावाची निर्मिती

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या पाण्याचा मोठा लाभ मिळणार आहे.नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हाय-वे या समृद्धी महामार्गाचे काम जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर अशा तीन तालुक्यात युद्धस्तरावर सुरू झालेले आहे. समृद्ध महामार्गाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या माती मुरुमासोबतच प्रशासनाच्या मृद व जलसंधारण विभागाशी सांगड घालण्यात आलेली आहे.

महामार्ग बांधकामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत माती, मुरूम, दगड या साहित्याचा वापर एनसीसी कंपनी लिमिटेडने जलसंधारणाला २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरुवात केली. धामणगाव तालुक्यातील १२ नाला खोलीकरण व दोन साठवण तलाव, चांदूर तालुक्यातील पाच नाला खोलीकरण व एक साठवण तलाव तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील २१ नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, त्यातील माती-मुरुम मार्गावर उपयोगात येत आहे. सात साठवण तलावांची निर्मिती झाली.

तीनही तालुक्यांत वाढली पाण्याची पातळीधामणगाव तालुक्यातील ६१.४०० मीटर, चांदुर रेल्वे तालुक्यात ९ हजार मीटर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ३० हजार ८१० मीटर अशी एकूण ९१ हजार २१० मीटर लांबीचे नाला खोलीकरण करण्यात आले. त्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नाला खोलीकरणाचा लाभ मिळाला. लगतच्या शेतीतील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाला खोलीकरनामुळे साठवण तलावाची क्षमता ९६८.०० टीएमसीने वाढली आहे. या जलसंधारणाच्या कामांमधून ३ लाख ४१ हजार २५० ब्रास माती मुरूम उपलब्ध झाल्याने याचा वापर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी झाला आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.समृद्धी महामार्गाच्या बाजूला नाला खोलीकरण व साठवण तलाव तयार करण्यात आले आहे. यात साठवणूक झालेल्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. विशेषत: या भागातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.- गजानन पळसकर,कार्यकारी अभियंता, अमरावती

समृद्धी महामार्गाच्या कामाला गती आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेप्रमाणे हा मार्ग पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे या कामावर काही स्थानिक मजुरांनाही प्राधान्य देण्यात आलेले आहे.- नीरजकुमार,जनरल मॅनेजर, एनसीसी कंपनी

टॅग्स :Waterपाणी