शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आली जलसमृद्धी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:06 IST

Amravati News water नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्गाच्या कामाला वेग३८ नाला खोलीकरण, १० साठवण तलावाची निर्मिती

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या पाण्याचा मोठा लाभ मिळणार आहे.नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हाय-वे या समृद्धी महामार्गाचे काम जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर अशा तीन तालुक्यात युद्धस्तरावर सुरू झालेले आहे. समृद्ध महामार्गाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या माती मुरुमासोबतच प्रशासनाच्या मृद व जलसंधारण विभागाशी सांगड घालण्यात आलेली आहे.

महामार्ग बांधकामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत माती, मुरूम, दगड या साहित्याचा वापर एनसीसी कंपनी लिमिटेडने जलसंधारणाला २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरुवात केली. धामणगाव तालुक्यातील १२ नाला खोलीकरण व दोन साठवण तलाव, चांदूर तालुक्यातील पाच नाला खोलीकरण व एक साठवण तलाव तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील २१ नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, त्यातील माती-मुरुम मार्गावर उपयोगात येत आहे. सात साठवण तलावांची निर्मिती झाली.

तीनही तालुक्यांत वाढली पाण्याची पातळीधामणगाव तालुक्यातील ६१.४०० मीटर, चांदुर रेल्वे तालुक्यात ९ हजार मीटर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ३० हजार ८१० मीटर अशी एकूण ९१ हजार २१० मीटर लांबीचे नाला खोलीकरण करण्यात आले. त्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नाला खोलीकरणाचा लाभ मिळाला. लगतच्या शेतीतील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाला खोलीकरनामुळे साठवण तलावाची क्षमता ९६८.०० टीएमसीने वाढली आहे. या जलसंधारणाच्या कामांमधून ३ लाख ४१ हजार २५० ब्रास माती मुरूम उपलब्ध झाल्याने याचा वापर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी झाला आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.समृद्धी महामार्गाच्या बाजूला नाला खोलीकरण व साठवण तलाव तयार करण्यात आले आहे. यात साठवणूक झालेल्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. विशेषत: या भागातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.- गजानन पळसकर,कार्यकारी अभियंता, अमरावती

समृद्धी महामार्गाच्या कामाला गती आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेप्रमाणे हा मार्ग पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे या कामावर काही स्थानिक मजुरांनाही प्राधान्य देण्यात आलेले आहे.- नीरजकुमार,जनरल मॅनेजर, एनसीसी कंपनी

टॅग्स :Waterपाणी