शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर जलव्यवस्थापनात घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:53 IST

सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत सभा : पदाधिकारी, सदस्यांनी विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. पीठासीन सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, सदस्या गौरी देशमुख, पार्वती काठोळे, वित्त अधिकारी रवींद्र येवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, प्रमोद तलवारे व अन्य खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरात पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने ३०३ गावांत ३७३ विहिरी अधिग्रहित केल्यात. मात्र, यापैकी किती विहिरी कोरड्या पडल्या, असा मुद्दा सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख यांनी उपस्थित केला. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांची कोंडी झाली. यावर पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पुढील सभेत माहिती सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांना दिले. शिवाय जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ ४०३ कुपनलिका व विंधनविहीरी मंजूर केल्यात.त्यापैकी ३०७ कुपनलिका व विंधन यशस्वी झाल्या. ३८ विंधनविहिरी कोरड्या पडल्या. १३ ठिकाणचे पाणी स्त्रोत आटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे म्हणणे आहे. याचवेळी सदस्या गौरी देशमुख यांनी सालोरा येथील दिलेल्या स्थळाऐवजी अन्य ठिकाणी बोअर केल्याने या विभागात गौडबंगाल केल्याचा आरोप केला. यावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी आरोप फेटाळला. याप्रकरणी चौकशीचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.रोहयोंतर्गत पांदण रस्त्याची कामे रखडल्यामुळे नागरिकांना अडचणी होत असल्याचा मुद्दा जयंत देशमुख यांनी मांडला. सिंचन विभागाकडील जलयुक्त शिवाय योजना व सिंचन प्रकल्पाचेही मुद्दाकडे पदाधिकाºयांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सभेला पाणीपुरवठा संदीप देशमुख, अनूप खासबागे, दीपेंद्र कोराटे, दीपक डोंगरे व सर्व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई