शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पाणीटंचाईवर जलव्यवस्थापनात घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:53 IST

सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत सभा : पदाधिकारी, सदस्यांनी विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. पीठासीन सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, सदस्या गौरी देशमुख, पार्वती काठोळे, वित्त अधिकारी रवींद्र येवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, प्रमोद तलवारे व अन्य खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरात पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने ३०३ गावांत ३७३ विहिरी अधिग्रहित केल्यात. मात्र, यापैकी किती विहिरी कोरड्या पडल्या, असा मुद्दा सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख यांनी उपस्थित केला. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांची कोंडी झाली. यावर पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पुढील सभेत माहिती सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांना दिले. शिवाय जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ ४०३ कुपनलिका व विंधनविहीरी मंजूर केल्यात.त्यापैकी ३०७ कुपनलिका व विंधन यशस्वी झाल्या. ३८ विंधनविहिरी कोरड्या पडल्या. १३ ठिकाणचे पाणी स्त्रोत आटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे म्हणणे आहे. याचवेळी सदस्या गौरी देशमुख यांनी सालोरा येथील दिलेल्या स्थळाऐवजी अन्य ठिकाणी बोअर केल्याने या विभागात गौडबंगाल केल्याचा आरोप केला. यावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी आरोप फेटाळला. याप्रकरणी चौकशीचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.रोहयोंतर्गत पांदण रस्त्याची कामे रखडल्यामुळे नागरिकांना अडचणी होत असल्याचा मुद्दा जयंत देशमुख यांनी मांडला. सिंचन विभागाकडील जलयुक्त शिवाय योजना व सिंचन प्रकल्पाचेही मुद्दाकडे पदाधिकाºयांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सभेला पाणीपुरवठा संदीप देशमुख, अनूप खासबागे, दीपेंद्र कोराटे, दीपक डोंगरे व सर्व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई