शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पाणीटंचाईवर जलव्यवस्थापनात घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:53 IST

सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत सभा : पदाधिकारी, सदस्यांनी विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. पीठासीन सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, सदस्या गौरी देशमुख, पार्वती काठोळे, वित्त अधिकारी रवींद्र येवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, प्रमोद तलवारे व अन्य खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरात पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने ३०३ गावांत ३७३ विहिरी अधिग्रहित केल्यात. मात्र, यापैकी किती विहिरी कोरड्या पडल्या, असा मुद्दा सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख यांनी उपस्थित केला. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांची कोंडी झाली. यावर पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पुढील सभेत माहिती सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांना दिले. शिवाय जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ ४०३ कुपनलिका व विंधनविहीरी मंजूर केल्यात.त्यापैकी ३०७ कुपनलिका व विंधन यशस्वी झाल्या. ३८ विंधनविहिरी कोरड्या पडल्या. १३ ठिकाणचे पाणी स्त्रोत आटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे म्हणणे आहे. याचवेळी सदस्या गौरी देशमुख यांनी सालोरा येथील दिलेल्या स्थळाऐवजी अन्य ठिकाणी बोअर केल्याने या विभागात गौडबंगाल केल्याचा आरोप केला. यावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी आरोप फेटाळला. याप्रकरणी चौकशीचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.रोहयोंतर्गत पांदण रस्त्याची कामे रखडल्यामुळे नागरिकांना अडचणी होत असल्याचा मुद्दा जयंत देशमुख यांनी मांडला. सिंचन विभागाकडील जलयुक्त शिवाय योजना व सिंचन प्रकल्पाचेही मुद्दाकडे पदाधिकाºयांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सभेला पाणीपुरवठा संदीप देशमुख, अनूप खासबागे, दीपेंद्र कोराटे, दीपक डोंगरे व सर्व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई