शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

जलव्यवस्थापन समिती सभेत दोघांना डच्चू

By admin | Updated: July 23, 2015 00:11 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सध्या विषय समिती निवडीचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना ...

जिल्हा परिषद : निवडीनंतरही बैठकीचे निमंत्रण नाहीअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सध्या विषय समिती निवडीचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना १२ डिसेंबर २०१४ रोजी जलव्यवस्थापन समितीवर अविरोध झालेल्या दोन सदस्यांना समितीच्या सभेला निमंत्रण न देता त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजुरकर यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.जिल्हा परिषद विषय समितीमधील रिक्त जागांसाठी डिसेंबर महिन्यात विविध विषय समितीवर निवडीसाठी पार पडलेल्या सभेत जलव्यस्थापन समितीवर जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गायकवाड, आणि महेंद्रसिंग गैलवार या दोन सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही सदस्यांना जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सुरूवातील कामकाजात सहभागी करण्याचे निमंत्रण देण्यात येत होते. मात्र अचानकच आता जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण न देता त्यांना डच्चू देण्यात आला आहे. या बाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला मौखीक सूचना दिली असल्याने या दोन्ही सदस्यांना सभेतील कामकाजात समावून घेण्यात येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी कांँग्रेस पक्षाचेच सदस्य असतांना त्याच्यावर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन समितीत अविरोध निवडून आलेले सदस्य बाबपुराव गायकवाड यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागीतली आहे. तर, दुसरीकडे विषय समितीच्या निवडी प्रकरणी विभागीय आयुक्तांना जिल्हा परिषद प्रशासनाने मार्गदर्शन मागीतले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी १२ डिसेंबर रोजी झालेल्या सभेतील इतिवृत्त कायम केले आहे. त्यामुळे गायकवाड आणि गैलवार हे अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु कलम ८१(१) नुसार जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी एका विषय समितीवर नियुक्ती देणे बंधकारक आहे. एकाच सदस्याला दोन समितीवर स्थान देण्यात येऊ नये असे सुध्दा शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे बापुराव गायकवाड सध्या या निवड प्रक्रीयेपुर्वी जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीवर प्रतिनिधित्व करीत आहेत. तर, महेंद्रसिंग गैलवार यांची निवड ही केवळ याच समितीवर आहे. अशा सर्व प्रक्रीयेत अचानक या दोन्ही सदस्यांना जलव्यवस्थापन समितीमधून डच्चू देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचेच वरील दोन्ही सदस्य आहेत. मात्र हा निर्णय कशासाठी हे कळू शकले नाही.इतर आठ सदस्यांवरही गंडांतरजिल्हा परिषद विषय समितीवर जलव्यवस्थापन वगळता इतर आठ जिल्हा परिषद आणि काही पंचायत समितीचे सभापतीची निवड करण्यात आली आहे. मात्र, या सदस्यांनाही संबंधित समितीच्या सभेत सहभागी केल्या जात नाही. या सर्व विषय केवळ सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या मौखीक सूचनेमुळे केला जात नाही. त्यामुळे या विषयावर आता अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.