शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

जलव्यवस्थापन समिती सभेत दोघांना डच्चू

By admin | Updated: July 23, 2015 00:11 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सध्या विषय समिती निवडीचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना ...

जिल्हा परिषद : निवडीनंतरही बैठकीचे निमंत्रण नाहीअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सध्या विषय समिती निवडीचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना १२ डिसेंबर २०१४ रोजी जलव्यवस्थापन समितीवर अविरोध झालेल्या दोन सदस्यांना समितीच्या सभेला निमंत्रण न देता त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजुरकर यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.जिल्हा परिषद विषय समितीमधील रिक्त जागांसाठी डिसेंबर महिन्यात विविध विषय समितीवर निवडीसाठी पार पडलेल्या सभेत जलव्यस्थापन समितीवर जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गायकवाड, आणि महेंद्रसिंग गैलवार या दोन सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही सदस्यांना जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सुरूवातील कामकाजात सहभागी करण्याचे निमंत्रण देण्यात येत होते. मात्र अचानकच आता जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण न देता त्यांना डच्चू देण्यात आला आहे. या बाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला मौखीक सूचना दिली असल्याने या दोन्ही सदस्यांना सभेतील कामकाजात समावून घेण्यात येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी कांँग्रेस पक्षाचेच सदस्य असतांना त्याच्यावर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन समितीत अविरोध निवडून आलेले सदस्य बाबपुराव गायकवाड यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागीतली आहे. तर, दुसरीकडे विषय समितीच्या निवडी प्रकरणी विभागीय आयुक्तांना जिल्हा परिषद प्रशासनाने मार्गदर्शन मागीतले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी १२ डिसेंबर रोजी झालेल्या सभेतील इतिवृत्त कायम केले आहे. त्यामुळे गायकवाड आणि गैलवार हे अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु कलम ८१(१) नुसार जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी एका विषय समितीवर नियुक्ती देणे बंधकारक आहे. एकाच सदस्याला दोन समितीवर स्थान देण्यात येऊ नये असे सुध्दा शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे बापुराव गायकवाड सध्या या निवड प्रक्रीयेपुर्वी जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीवर प्रतिनिधित्व करीत आहेत. तर, महेंद्रसिंग गैलवार यांची निवड ही केवळ याच समितीवर आहे. अशा सर्व प्रक्रीयेत अचानक या दोन्ही सदस्यांना जलव्यवस्थापन समितीमधून डच्चू देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचेच वरील दोन्ही सदस्य आहेत. मात्र हा निर्णय कशासाठी हे कळू शकले नाही.इतर आठ सदस्यांवरही गंडांतरजिल्हा परिषद विषय समितीवर जलव्यवस्थापन वगळता इतर आठ जिल्हा परिषद आणि काही पंचायत समितीचे सभापतीची निवड करण्यात आली आहे. मात्र, या सदस्यांनाही संबंधित समितीच्या सभेत सहभागी केल्या जात नाही. या सर्व विषय केवळ सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या मौखीक सूचनेमुळे केला जात नाही. त्यामुळे या विषयावर आता अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.