शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२८ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट, १५९ विहिरींची जलपातळी तपासली

By admin | Updated: November 17, 2015 00:12 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली असता २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे.

भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणा विभागाचा अहवाल अमरावती : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली असता २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. यंदा पाऊस सरासरी चांगला झाला असतानाही काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट पाहायला मिळत आहे. दरवर्षी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाकडून मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात जिल्ह्यातील विविध विहिरींची जलपातळी तपासली जाते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १७३ विहिरींवर मॉनिटरिंंग केले असून सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली. त्यामध्ये २८ गावांमधील विहिरींची जलपातळी खालावल्याचे आढळून आले. पाच वर्षांच्या सरासरीचे अनुमान घेऊन ही जलपातळी काढल्यानंतर २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ११ तालुक्यांत पर्जन्यमान घटलेअमरावती : यंदा १४ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात पर्यज्यमान घटले आहे. त्यामध्ये अमरावती, मोर्शी, वरुड, दर्यापूर, चांदुररेल्वे, चांदूरबाजार, चिखलदरा, धामणगाव, अचलपूर, धारणी व भातकुली गावाचा सहभाग आहे. तर पर्यजन्यमान वाढलेली नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी व तिवसा ही गावे आहे. या सर्व गावातील १५९ विहिरीच्या तपासणीत २८ गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. मेळघाट सारख्या उंच ठिकणच्या गावांमध्ये पाऊस अधिक पडल्यावरही विहिरीची जलपातळी कमी असल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले.